शहरं
Join us  
Trending Stories
1
भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
2
Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु
3
बॅटिंगवेळी रोहितची अय्यरसमोर 'बोलंदाजी'; तो सातवी ओव्हर टाकतोय यार... मैदानात नेमकं काय घडलं (VIDEO)
4
बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स
5
Rohit Sharma Record: हिटमॅन रोहितनं वेळ घेतला; मग पुल शॉटसह बॅक टू बॅक सिक्सर मारत सेट केला महारेकॉर्ड
6
"ते मनापासून बोलले, म्हणूनच..."; मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा महेश कोठारेंना पाठिंबा, म्हणाली-
7
रशियाच्या अर्थकारणाला थेट धक्का; जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला!
8
तुमच्या कुंडलीत आहे का महाभाग्य योग? अकल्पनीय यश, अमाप धन; अनपेक्षित लाभ, भाग्योदय-भरभराट!
9
मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक!
10
Pak General On India: भारताची ताकद बघून पाकिस्तान हादरला! पाकिस्तानी जनरल म्हणाले, "आम्ही एकटे..."
11
Diwali Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी
12
माकड आलं अन् दुचाकीची चावी घेऊन गेलं, इचलकरंजी येथील गमतीशीर प्रकार
13
वालूरात दोन ठिकाणी दरोडेखोरांचा हल्ला; एका घटनेत आजी गभीर जखमी, नातू ठार, दुसऱ्या घटनेत वृद्ध दांपत्य जखमी
14
भारतासाठी बांगलादेशमधून खुशखबर! निवडणुकीपूर्वी हंगामी युनूस सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
15
"बंदुकीचा धाक दाखवून रशियासाठी युद्ध लढण्यास..."; भारतीय तरुणाचा धक्कादायक Video
16
केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम
17
Virat Kohli : पहिल्यांदाच आली ही वेळ! चाहत्यांचे आभार मानत कोहलीनं ॲडलेडला केलं अलविदा? (VIDEO)
18
टाटा ट्रस्टमधील वाद थांबेनात! आता ट्रस्टी मेहली मिस्त्रींनी ठेवली नवी अट, काय होणार बदल?
19
"फटाका इन्व्हर्टरवर पडला, संपूर्ण इमारतीची राख..."; इंदिरापुरममध्ये भीषण आग, नेमकं काय घडलं?
20
दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट

परभणी : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:29 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत मोठ्या कष्टाने कापसाचे पीक घेतले. मात्र वेचणीसाठी मजूर अव्वाच्या सव्वा दराने मजुरी मागत असल्याने कापूस घरी आणायचा कसा? असा प्रश्न पडला आहे. परतीचा पावसाने आर्थिक फटका बसलेल्या शेतकºयांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत मोठ्या कष्टाने कापसाचे पीक घेतले. मात्र वेचणीसाठी मजूर अव्वाच्या सव्वा दराने मजुरी मागत असल्याने कापूस घरी आणायचा कसा? असा प्रश्न पडला आहे. परतीचा पावसाने आर्थिक फटका बसलेल्या शेतकºयांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.तालुक्यातील शेतकरी कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसावर शेतकºयांनी आर्थिक भार सहन करीत कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत पिकाला खत, फवारणी, निगराणी केल्याने पिकेही जोमदार वाढली; परंतु, कापसाचे पीक हातात यायच्या वेळेसच परतीच्या पावसाने तालुक्यात हजेरी लावली आणि होत्याचे नव्हते झाले. परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला. पावसाने नुकसान झाल्याने फुटलेल्या कापसाचे तीन तेरा वाजले. ज्या शेतकºयांच्या शेतात कापूस वेचणी बाकी आहे, ते शेतकरी मजुरांअभावी त्रस्त झाले आहेत. यंदा मजुरीने शेतकºयांचे कंबरडे मोडले असून सव्वाशे रुपये असलेला मजुरीचा दर दोनशे रुपयांवर गेला आहे. ७ ते १० रुपयाने किलोने कापसाची वेचणी केली जात आहे. परिणामी उत्पादनापेक्षा उत्पादन खर्चच अधिक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकºयांना वेचणीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. मजुरांना शेतात ने -आण करण्यासाठी शेतकºयाला वाहनांची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. ज्या शेतकºयांनी वेचणी पूर्ण करुन माल बाजारात विक्रीसाठी आणला आहे, त्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकºयांची कोंडी झाली आहे. एकूणच यंदा कापूस उत्पादक शेतकºयांचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे चित्र तालुक्यासह परिसरात दिसून येत आहे.खर्च, उत्पादनाची: गोळाबेरीज जुळेना४कापसाच्या पिकाला केलेला खर्च व त्यातून मिळणाºया उत्पन्नाचा ताळमेळ बसविणे अवघड झाले आहे. झालेल्या खर्चा एवढे उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे. पाऊस, मजुरीचे वाढलेले दर व मिळत असलेला कमी भाव या तिहेरी संकटाने शेतकºयांना आर्थिक गणित जुळविणे अवघड झाले आहे.४कापूस उत्पादक शेतकºयांची अवस्था पाहाता त्याच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्यसरकाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.सोयाबीनची आवक घटली४या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात सर्वच मालाची आवक घटली आहे.४ विशेषत: सोयाबीनची आवक गतवर्षी आॅक्टोबर अखेर ३० हजार क्विंटल झाली होती. या वर्षी यामध्ये घट झाली असून ११ नोव्हेंबरपर्यंत १९ हजार क्विंटल आवक बाजार समितीच्या यार्डात झाली आहे. या आकड्यावरुन आवक घटल्याचे दिसून येत आहे.२३ हजार हेक्टरवर कापूस४तालुक्यात एकूण ४२ हजार २१० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात असून एकूण २३ हजार ७३३ हेक्टरवर लागवड करण्यात आली. त्या खालोखाल १२ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूसRainपाऊस