शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मानवतमध्ये पाण्यावरुन खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:21 IST

शहराच्या पाणीप्रश्नावरुन नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार २० आॅक्टोबर रोजी सकाळी मानवत शहरात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): शहराच्या पाणीप्रश्नावरुन नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार २० आॅक्टोबर रोजी सकाळी मानवत शहरात घडला.मानवत शहराला झरी येथील तलावातून पाणी पुरवठा केला जातो. झरी तलावात मूबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र आठ ते दहा दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा विस्कळीत का झाला, याची विचारणा करण्यासाठी कॉंग्रेसचे नगरसेवक शनिवारी पालिकेमध्ये गेले. यावेळी मुख्याधिकाºयांना जाब विचारत असतानाच मुख्याधिकारी आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी नगरसेवकांना आरेरावीची भाषा वापरली, असा आरोप कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. या प्रकरणी नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडेच मुख्याधिकारी ढाकणे यांची तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.झरी तलावामध्ये मूबलक प्रमाणात पाणी असताना नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही बाब मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी आरेरावीची भाषा केली, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या निवेदनावर नगरसेवक शोभा चव्हाण, सरुबाई भदर्गे, संगिता देशमुख, अ.रहीम अ.करीम, स.जमील, विनोद रहाटे, गोपाल गौड, शैलेजा बारहाते, रबियाबी अन्सारी आदींच्या स्वाक्षºया आहेत.कृत्रिम पाणीटंचाईचे संकट४मानवत शहराला झरी येथील तलावातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या जायकवाडी प्रकल्पाचे पाणी कालव्याला सोडले असल्याने या पाण्याने झरी तलावात मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. साधारणत: मे महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी तलावात असताना मानवतकरांना मात्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहरात आठ ते दहा दिवसांना एकवेळ पाणी येते.४झरी तलाव परिसरात एक्सप्रेस फिडर नसल्याने शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. झरी परिसरात एक्सप्रेस फिडर उभारावा, अशी अनेक दिवसांची मागणी आहे;परंतु, त्याकडेही नगरपालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. परिणामी शहराला पाणीपुरवठा करताना अडथळे निर्माण होतात आणि दोन आवर्तनातील कालावधी वाढत चालला आहे.४शहराचा विस्तार वाढला असून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे. मात्र अनेक भागात हे काम ठप्प आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा निर्माण होत आहे. झरी बरोबरच जुन्या इरळद येथून पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित केली तर शहराचा प्रश्न मिटू शकतो. मात्र यावरही हालचाली होत नाहीत.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई