शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

परभणी : मानवतमध्ये पाण्यावरुन खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:21 IST

शहराच्या पाणीप्रश्नावरुन नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार २० आॅक्टोबर रोजी सकाळी मानवत शहरात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): शहराच्या पाणीप्रश्नावरुन नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार २० आॅक्टोबर रोजी सकाळी मानवत शहरात घडला.मानवत शहराला झरी येथील तलावातून पाणी पुरवठा केला जातो. झरी तलावात मूबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र आठ ते दहा दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा विस्कळीत का झाला, याची विचारणा करण्यासाठी कॉंग्रेसचे नगरसेवक शनिवारी पालिकेमध्ये गेले. यावेळी मुख्याधिकाºयांना जाब विचारत असतानाच मुख्याधिकारी आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी नगरसेवकांना आरेरावीची भाषा वापरली, असा आरोप कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. या प्रकरणी नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडेच मुख्याधिकारी ढाकणे यांची तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.झरी तलावामध्ये मूबलक प्रमाणात पाणी असताना नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही बाब मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी आरेरावीची भाषा केली, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या निवेदनावर नगरसेवक शोभा चव्हाण, सरुबाई भदर्गे, संगिता देशमुख, अ.रहीम अ.करीम, स.जमील, विनोद रहाटे, गोपाल गौड, शैलेजा बारहाते, रबियाबी अन्सारी आदींच्या स्वाक्षºया आहेत.कृत्रिम पाणीटंचाईचे संकट४मानवत शहराला झरी येथील तलावातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या जायकवाडी प्रकल्पाचे पाणी कालव्याला सोडले असल्याने या पाण्याने झरी तलावात मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. साधारणत: मे महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी तलावात असताना मानवतकरांना मात्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहरात आठ ते दहा दिवसांना एकवेळ पाणी येते.४झरी तलाव परिसरात एक्सप्रेस फिडर नसल्याने शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. झरी परिसरात एक्सप्रेस फिडर उभारावा, अशी अनेक दिवसांची मागणी आहे;परंतु, त्याकडेही नगरपालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. परिणामी शहराला पाणीपुरवठा करताना अडथळे निर्माण होतात आणि दोन आवर्तनातील कालावधी वाढत चालला आहे.४शहराचा विस्तार वाढला असून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे. मात्र अनेक भागात हे काम ठप्प आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा निर्माण होत आहे. झरी बरोबरच जुन्या इरळद येथून पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित केली तर शहराचा प्रश्न मिटू शकतो. मात्र यावरही हालचाली होत नाहीत.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई