शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :घरकुल सर्वेक्षणासाठी मिळाली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:57 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांना या योजनेत प्रपत्र ड भरुन लाभ घेता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांना या योजनेत प्रपत्र ड भरुन लाभ घेता येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत प्रधानमंत्री घरकुल आवास योजना कार्यान्वित केली. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र अनेक लाभार्थी पात्र असतानाही त्यांची नावे योजनेत समाविष्ट झाली नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांत शासनाविरुद्ध तीव्र संताप होता. त्यामुळे जिल्हा परिषदस्तरावर ग्रामीण भागामध्ये लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण करुन त्यांच्याकडून प्रपत्र ड भरुन घेण्याची मोहीम राबविण्यात आली. १ ते ३० सप्टेंबर या काळात प्रत्येक पंचायत समितीअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडून प्रपत्र ड भरुन घेण्याचे काम करण्यात आले. प्रपत्र ड आॅनलाईन अपलोड करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावरील संगणक आॅपरेटर व कंत्राटी तत्वावर संगणक चालक नियुक्त करण्यात आले आहेत.लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन प्रपत्र ड भरुन घेण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या काळात जिल्ह्यात युद्धपातळीवर लाभार्थ्यांची माहिती गोळा केली; परंतु, जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले होते. त्यामुळे या लाभार्थ्यांचेही प्रपत्र ड भरुन घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्य शासनाने या योजनेंतर्गत ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केंद्र शासनाकडे केली होती. त्यानंतर केंद्र शासनाने चार दिवसांचा अवधी घेत ४ आॅक्टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या कालावधीत उर्वरित लाभार्थ्यांचे प्रपत्र ड भरुन घेण्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.योजनेच्या नावाखाली लूटप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांचे प्रपत्र ड भरुन घेण्यासाठी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे आॅपरेटर व कंत्राटी संगणक चालक काम करीत आहेत. यासाठी शासनाच्या वतीने प्रति लाभार्थी जवळपास २० रुपयांचे मानधनही देण्यात येत आहे; परंतु, जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये १०० ते ५०० रुपये उखळले जात आहे. त्यामुळे या योजनेच्या नावाखाली लाभार्थ्याची मोठी लूट केली जात आहे. याकडे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन होणारी लाभार्थ्यांनी लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीHomeघरprime ministerपंतप्रधान