शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

परभणी :घरकुल सर्वेक्षणासाठी मिळाली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:57 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांना या योजनेत प्रपत्र ड भरुन लाभ घेता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांना या योजनेत प्रपत्र ड भरुन लाभ घेता येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत प्रधानमंत्री घरकुल आवास योजना कार्यान्वित केली. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र अनेक लाभार्थी पात्र असतानाही त्यांची नावे योजनेत समाविष्ट झाली नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांत शासनाविरुद्ध तीव्र संताप होता. त्यामुळे जिल्हा परिषदस्तरावर ग्रामीण भागामध्ये लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण करुन त्यांच्याकडून प्रपत्र ड भरुन घेण्याची मोहीम राबविण्यात आली. १ ते ३० सप्टेंबर या काळात प्रत्येक पंचायत समितीअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडून प्रपत्र ड भरुन घेण्याचे काम करण्यात आले. प्रपत्र ड आॅनलाईन अपलोड करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावरील संगणक आॅपरेटर व कंत्राटी तत्वावर संगणक चालक नियुक्त करण्यात आले आहेत.लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन प्रपत्र ड भरुन घेण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या काळात जिल्ह्यात युद्धपातळीवर लाभार्थ्यांची माहिती गोळा केली; परंतु, जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले होते. त्यामुळे या लाभार्थ्यांचेही प्रपत्र ड भरुन घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्य शासनाने या योजनेंतर्गत ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केंद्र शासनाकडे केली होती. त्यानंतर केंद्र शासनाने चार दिवसांचा अवधी घेत ४ आॅक्टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या कालावधीत उर्वरित लाभार्थ्यांचे प्रपत्र ड भरुन घेण्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.योजनेच्या नावाखाली लूटप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांचे प्रपत्र ड भरुन घेण्यासाठी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे आॅपरेटर व कंत्राटी संगणक चालक काम करीत आहेत. यासाठी शासनाच्या वतीने प्रति लाभार्थी जवळपास २० रुपयांचे मानधनही देण्यात येत आहे; परंतु, जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये १०० ते ५०० रुपये उखळले जात आहे. त्यामुळे या योजनेच्या नावाखाली लाभार्थ्याची मोठी लूट केली जात आहे. याकडे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन होणारी लाभार्थ्यांनी लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीHomeघरprime ministerपंतप्रधान