शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

परभणी: आचारसंहितेत दुष्काळी उपाययोजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:05 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी दुष्काळी भागांमध्ये विविध उपाययोजना सुरु करण्यास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी दुष्काळी भागांमध्ये विविध उपाययोजना सुरु करण्यास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.२०१८ च्या खरीप हंगामात परभणीसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यात राज्यातील २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुके व २६८ महसूल मंडळांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीची १० मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुष्काळी भागामध्ये उपाययोजना लागू करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर संभ्रमाचे वातावरण होते. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी भारत निवडणूक आयोगाने या उपाययोजना राबविण्यास काही नियमांच्या आधारे मंजुरी दिली आहे. त्यामध्ये जनावरांच्या चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ निकष लावून स्थानिक परिस्थिती व गरज लक्षात घेऊन चारा छावण्या सुरु करण्यास मान्यता देण्यात यावी. त्यासाठी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांची मान्यता घेण्याची आवश्यकता राहणार नाही. दुष्काळी भागातील पाणीटंचाई विचारात घेऊन स्थानिक गरज व परिस्थिती पाहून टँकर सुरु करावेत. या प्रक्रियेत लोकप्रतिनिधी किंवा अशासकीय सदस्यांची मान्यता घेऊ नये. तसेच नवीन विंधन विहिरी घेण्याबाबत स्थानिक परिस्थिती व गरज पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा. मनरेगा योजनेंतर्गत रोजगार निर्मितीसाठी हाती घेतलेली कामे पूर्ण झाल्यानंतर स्थानिक मागणी व गरज लक्षात घेऊन नवीन कामे घेता येतील. या सर्व बाबींसाठी पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधींची मंजुरी घेण्याची गरज नाही, असेही या संदर्भात २२ मार्च रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाचे उपसचिव एस.एच.उमराणीकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.४ जिल्ह्यात राणी सावरगाव येथील एका चारा छावणीचा अपवाद वगळता इतर ठिकाणी छावण्या सुरु झाल्या नाहीत. या आदेशामुळे चारा छावणी सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला तशी हालचाल सुरु करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकारElectionनिवडणूक