शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: आचारसंहितेत दुष्काळी उपाययोजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:05 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी दुष्काळी भागांमध्ये विविध उपाययोजना सुरु करण्यास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी दुष्काळी भागांमध्ये विविध उपाययोजना सुरु करण्यास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.२०१८ च्या खरीप हंगामात परभणीसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यात राज्यातील २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुके व २६८ महसूल मंडळांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीची १० मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुष्काळी भागामध्ये उपाययोजना लागू करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर संभ्रमाचे वातावरण होते. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी भारत निवडणूक आयोगाने या उपाययोजना राबविण्यास काही नियमांच्या आधारे मंजुरी दिली आहे. त्यामध्ये जनावरांच्या चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ निकष लावून स्थानिक परिस्थिती व गरज लक्षात घेऊन चारा छावण्या सुरु करण्यास मान्यता देण्यात यावी. त्यासाठी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांची मान्यता घेण्याची आवश्यकता राहणार नाही. दुष्काळी भागातील पाणीटंचाई विचारात घेऊन स्थानिक गरज व परिस्थिती पाहून टँकर सुरु करावेत. या प्रक्रियेत लोकप्रतिनिधी किंवा अशासकीय सदस्यांची मान्यता घेऊ नये. तसेच नवीन विंधन विहिरी घेण्याबाबत स्थानिक परिस्थिती व गरज पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा. मनरेगा योजनेंतर्गत रोजगार निर्मितीसाठी हाती घेतलेली कामे पूर्ण झाल्यानंतर स्थानिक मागणी व गरज लक्षात घेऊन नवीन कामे घेता येतील. या सर्व बाबींसाठी पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधींची मंजुरी घेण्याची गरज नाही, असेही या संदर्भात २२ मार्च रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाचे उपसचिव एस.एच.उमराणीकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.४ जिल्ह्यात राणी सावरगाव येथील एका चारा छावणीचा अपवाद वगळता इतर ठिकाणी छावण्या सुरु झाल्या नाहीत. या आदेशामुळे चारा छावणी सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला तशी हालचाल सुरु करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकारElectionनिवडणूक