शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अतिवृष्टीने पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:12 IST

जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठी नासाडी होत असून ऐन दिवाळीच्या सणात आलेल्या संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठी नासाडी होत असून ऐन दिवाळीच्या सणात आलेल्या संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.यावर्षी जिल्ह्यात पावसाने कहर केला असून खरीप हंगामातील पिकांचे अक्षरश: नुकसान झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर बाजारात येणारी पिके शेतातच सडू लागली आहेत. ज्या पिकांच्या भरवशावर दिवाळीचा सण साजरा करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते. तीच पिके निसर्गाने हिरावून घेतली आहेत.सोयाबीन, कापूस या दोन्ही पिकांना नगदी पीक म्हणून पाहिले जाते. खरीप हंगामातील ही पिके दिवाळीपूर्वी बाजारपेठेत येतात आणि या पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळतो. यावर्षी पावसाळ्यात उशिराने पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सोयाबीनची पेरणीही एक महिना उशिराने झाली आहे. हे सोयाबीन काढणीला आले असतानाच पावसाने पिकांची नासाडी केली आहे.आठ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. शुक्रवारी दिवसभर आणि रात्री जिल्हाभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यात पालम तालुक्यात ६७ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात ३६.७६, पूर्णा ६३.६०, गंगाखेड ४४.२५, सोनपेठ ३१, सेलू ४७.६०, पाथरी २७, जिंतूर १८.१७, मानवत २८.६७ असा जिल्हाभरात सरासरी ४०.४५ मि.मी. पाऊस झाला आहे.शुक्रवारच्या पावसाने जिल्ह्याने वार्षिक सरासरीही ओलांडलीही आहे. जिल्ह्यात आतापर्यत ७७७ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मि.मी. एवढी आहे. परभणी तालुक्यात ६१६, पालम ८७३, पूर्णा ८९६, गंगाखेड ७४७, सोनपेठ ६९६, सेलू ८०५, पाथरी ९१८, जिंतूर ६१४ आणि मानवत तालुक्यात ८२५ मि.मी. पाऊस झाला.शनिवारीही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधून-मधून पावसाच्या सरी कोसळल्या. रात्रीच्या सुमारास आणखी पाऊस होण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस ही पिके हातची गेली असून शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.दरम्यान, पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूर्णा नदीसह छोट्या नद्यांना पूर आला आहे. पूर्णा- ताडकळस मार्गावरील पिंगळगड या छोट्या नदीला पूर आल्याने शनिवारी दुपारी ३ वाजेपासून या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पालम तालुक्यात १२५ टक्के पाऊसवार्षिक सरासरीच्या तुलनेत पालम तालुक्यामध्ये १२५ टक्के पाऊस झाला आहे. पूर्णा तालुक्यात १११ टक्के, गंगाखेड १०७ टक्के आणि पाथरी तालुक्यामध्ये ११९ टक्के व मानवत तालुक्यात १०१ टक्के पाऊस झाला. तर परभणी ७१ टक्के, सोनपेठ ९९ टक्के, सेलू ९८ टक्के आणि जिंतूर तालुक्यामध्ये केवळ ७५ टक्के पाऊस झाला आहे.७ मंडळांमध्ये अतिवृष्टीशुक्रवारी रात्री ७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात सेलू तालुक्यातील सेलू मंडळात ९८ मि.मी., पालम तालुक्यातील चाटोरी मंडळात ८९ मि.मी., पालम मंडळात ७२ मि.मी., पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात ६५, चुडावा मंडळात ७२, लिमला मंडळात ६९ आणि ताडकळस मंडळात ६९ मि.मी. पाऊस झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी