शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परभणी : अतिवृष्टीने पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:12 IST

जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठी नासाडी होत असून ऐन दिवाळीच्या सणात आलेल्या संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठी नासाडी होत असून ऐन दिवाळीच्या सणात आलेल्या संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.यावर्षी जिल्ह्यात पावसाने कहर केला असून खरीप हंगामातील पिकांचे अक्षरश: नुकसान झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर बाजारात येणारी पिके शेतातच सडू लागली आहेत. ज्या पिकांच्या भरवशावर दिवाळीचा सण साजरा करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते. तीच पिके निसर्गाने हिरावून घेतली आहेत.सोयाबीन, कापूस या दोन्ही पिकांना नगदी पीक म्हणून पाहिले जाते. खरीप हंगामातील ही पिके दिवाळीपूर्वी बाजारपेठेत येतात आणि या पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळतो. यावर्षी पावसाळ्यात उशिराने पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सोयाबीनची पेरणीही एक महिना उशिराने झाली आहे. हे सोयाबीन काढणीला आले असतानाच पावसाने पिकांची नासाडी केली आहे.आठ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. शुक्रवारी दिवसभर आणि रात्री जिल्हाभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यात पालम तालुक्यात ६७ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात ३६.७६, पूर्णा ६३.६०, गंगाखेड ४४.२५, सोनपेठ ३१, सेलू ४७.६०, पाथरी २७, जिंतूर १८.१७, मानवत २८.६७ असा जिल्हाभरात सरासरी ४०.४५ मि.मी. पाऊस झाला आहे.शुक्रवारच्या पावसाने जिल्ह्याने वार्षिक सरासरीही ओलांडलीही आहे. जिल्ह्यात आतापर्यत ७७७ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मि.मी. एवढी आहे. परभणी तालुक्यात ६१६, पालम ८७३, पूर्णा ८९६, गंगाखेड ७४७, सोनपेठ ६९६, सेलू ८०५, पाथरी ९१८, जिंतूर ६१४ आणि मानवत तालुक्यात ८२५ मि.मी. पाऊस झाला.शनिवारीही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधून-मधून पावसाच्या सरी कोसळल्या. रात्रीच्या सुमारास आणखी पाऊस होण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस ही पिके हातची गेली असून शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.दरम्यान, पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूर्णा नदीसह छोट्या नद्यांना पूर आला आहे. पूर्णा- ताडकळस मार्गावरील पिंगळगड या छोट्या नदीला पूर आल्याने शनिवारी दुपारी ३ वाजेपासून या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पालम तालुक्यात १२५ टक्के पाऊसवार्षिक सरासरीच्या तुलनेत पालम तालुक्यामध्ये १२५ टक्के पाऊस झाला आहे. पूर्णा तालुक्यात १११ टक्के, गंगाखेड १०७ टक्के आणि पाथरी तालुक्यामध्ये ११९ टक्के व मानवत तालुक्यात १०१ टक्के पाऊस झाला. तर परभणी ७१ टक्के, सोनपेठ ९९ टक्के, सेलू ९८ टक्के आणि जिंतूर तालुक्यामध्ये केवळ ७५ टक्के पाऊस झाला आहे.७ मंडळांमध्ये अतिवृष्टीशुक्रवारी रात्री ७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात सेलू तालुक्यातील सेलू मंडळात ९८ मि.मी., पालम तालुक्यातील चाटोरी मंडळात ८९ मि.मी., पालम मंडळात ७२ मि.मी., पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात ६५, चुडावा मंडळात ७२, लिमला मंडळात ६९ आणि ताडकळस मंडळात ६९ मि.मी. पाऊस झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी