शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

परभणी जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:51 IST

खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनासाठी जाहीर केली जाणारी पीक आणेवारी (पैसेवारी) १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने घोषित केली असून जिल्ह्यात सरासरी ४७.२२ एवढी पैसेवारी जाहीर झाल्याने खरीप हंगामातील पीक नुकसानीवर जिल्हा प्रशासनाची मोहर लागली आहे. त्यामुळे आता या पैसेवारीवर शासन किती प्रमाणात मदत जाहीर करते, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनासाठी जाहीर केली जाणारी पीक आणेवारी (पैसेवारी) १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने घोषित केली असून जिल्ह्यात सरासरी ४७.२२ एवढी पैसेवारी जाहीर झाल्याने खरीप हंगामातील पीक नुकसानीवर जिल्हा प्रशासनाची मोहर लागली आहे. त्यामुळे आता या पैसेवारीवर शासन किती प्रमाणात मदत जाहीर करते, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.कृषी व्यवसाय हा संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असतो. अतिवृष्टी, पावसाचा अनियमितपणा याचा परिणाम पिकांवर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी या दोन हंगामात पीक उत्पादन घेतले जाते. त्यापैकी खरीप हंगामावर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. हा हंगाम शेतकºयांसाठी महत्वपूर्ण मानला जातो. या हंगामात जिल्ह्यामध्ये सरासरी किती उत्पन्न झाले, उत्पन्नाची टक्केवारी किती आहे? याचा आढावा महसूल विभागाकडून घेतला जातो. त्या अनुषंगाने दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी नजर आणेवारी, ३१ आॅक्टोबर रोजी सुधारित आणेवारी आणि १५ डिसेंबर रोजी अंतिम आणेवारी जाहीर केली जाते. या आणेवारीवरुन जिल्ह्यातील पीक उत्पादनाचा ठोक ताळा मांडला जातो. यावर्षी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याची अंतिम आणेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर केली आहे.परभणी जिल्ह्यातील ८४८ गावांमधील खरीप हंगामात पेरणी झालेल्या ५ लाख ३४ हजार ८२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची आणेवारी काढण्यात आली असून ती ४७.२२ पैसे एवढी निघाली आहे. जिल्ह्यात परभणी तालुक्यात सर्वात कमी ४३.५० पैसे आणेवारी जाहीर करण्यात आली. खरीप हंगामामध्ये निघालेल्या प्रत्यक्ष उत्पन्नाचा ठरवून दिलेल्या गुणसूत्रानुसार आढावा घेतला जातो. त्यावरुन आणेवारी निश्चित केली जाते. सर्वसाधारणपणे १०० पैसे आणेवारी निघाली तर त्या जिल्ह्यात पीक उत्पादन १०० टक्के असल्याचे मानले जाते. त्यामुळे पिकांची आणेवारी ही एका अर्थाने प्रत्यक्ष उत्पादनाचा आकडा निश्चित करते. ही आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असेल तर त्या भागात नुकसान झाल्याचे स्पष्ट होते. यावर्षी प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम आणेवारीत ४७.२२ पैसे आणेवारी निघाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पीक उत्पादनाला ५० पैशांपेक्षाही अधिक फटका बसल्याचे निश्चित झाले आहे. आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्याचा फटका पिकांना बसला. त्यामुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी शासनाने सध्या मदत देण्याचे घोषित केले असून जिल्ह्याला या मदतीचा दुसरा टप्पा मिळाला आहे. जिल्ह्यातील पिकांचे नुकसान पाहता शासनाने हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट मदत द्यावी, अशी येथील शेतकºयांची मागणी आहे; परंतु, अद्याप त्यावर शासनाने विचार केला नाही. याच काळात पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी निघाल्याने जिल्ह्यातील पीक नुकसानीवर प्रशासनाकडून शिक्कामोर्तब झाले असून आता शासन या संदर्भात मदत वाढवून देण्यासाठी गांभीर्याने विचार करेल, अशी अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.शासनाच्या भूमिकेकडे लक्ष४मागील काही वर्षापर्यंत जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आणेवारीचा आधार घेऊन दुष्काळाची घोषणा केली जात होती. मात्र मागील वर्षी शासनाने निकषांमध्ये बदल केला. केवळ आणेवारी हा निकष ग्राह्य न धरता त्या भागातील पाऊस, हवामान बदल हे घटकही दुष्काळ जाहीर करताना ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे पूर्वी ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी जाहीर होताच दुष्काळ जाहीर होण्याचे संकेत मिळत असत; परंतु, आता निकष बदलले असून शासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.अतिवृष्टीनंतर घटली आणेवारी४जिल्हा प्रशासनाच्या वतीने खरीप हंगामातील पिकांची आणेवारी तीन टप्प्यात जाहीर केली जाते. त्यात ३० सप्टेंबर रोजी नजर आणेवारीची घोषणा करण्यात आली. त्यावेळी ६१.८४ एवढी आणेवारी निघाली. त्यानंतर ३१ आॅक्टोबर रोजी याच पिकांची सुधारित आणेवारी जाहीर करण्यात आली. ती ५९.३२ पैसे एवढी आली. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी ४७.२२ इतकी जिल्ह्याची आणेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.४आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने पिकांचे नुकसान केले. त्याचा फटका या पिकांना बसल्याचे अंतिम आणेवारीतून दिसून येत आहे. सुधारित आणेवारीपेक्षा अंतिम आणेवारीमध्ये १२.१ पैशाची घट झाली आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे विचार करता आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सिद्ध दिसत असून शासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी