शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:51 IST

खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनासाठी जाहीर केली जाणारी पीक आणेवारी (पैसेवारी) १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने घोषित केली असून जिल्ह्यात सरासरी ४७.२२ एवढी पैसेवारी जाहीर झाल्याने खरीप हंगामातील पीक नुकसानीवर जिल्हा प्रशासनाची मोहर लागली आहे. त्यामुळे आता या पैसेवारीवर शासन किती प्रमाणात मदत जाहीर करते, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनासाठी जाहीर केली जाणारी पीक आणेवारी (पैसेवारी) १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने घोषित केली असून जिल्ह्यात सरासरी ४७.२२ एवढी पैसेवारी जाहीर झाल्याने खरीप हंगामातील पीक नुकसानीवर जिल्हा प्रशासनाची मोहर लागली आहे. त्यामुळे आता या पैसेवारीवर शासन किती प्रमाणात मदत जाहीर करते, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.कृषी व्यवसाय हा संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असतो. अतिवृष्टी, पावसाचा अनियमितपणा याचा परिणाम पिकांवर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी या दोन हंगामात पीक उत्पादन घेतले जाते. त्यापैकी खरीप हंगामावर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. हा हंगाम शेतकºयांसाठी महत्वपूर्ण मानला जातो. या हंगामात जिल्ह्यामध्ये सरासरी किती उत्पन्न झाले, उत्पन्नाची टक्केवारी किती आहे? याचा आढावा महसूल विभागाकडून घेतला जातो. त्या अनुषंगाने दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी नजर आणेवारी, ३१ आॅक्टोबर रोजी सुधारित आणेवारी आणि १५ डिसेंबर रोजी अंतिम आणेवारी जाहीर केली जाते. या आणेवारीवरुन जिल्ह्यातील पीक उत्पादनाचा ठोक ताळा मांडला जातो. यावर्षी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याची अंतिम आणेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर केली आहे.परभणी जिल्ह्यातील ८४८ गावांमधील खरीप हंगामात पेरणी झालेल्या ५ लाख ३४ हजार ८२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची आणेवारी काढण्यात आली असून ती ४७.२२ पैसे एवढी निघाली आहे. जिल्ह्यात परभणी तालुक्यात सर्वात कमी ४३.५० पैसे आणेवारी जाहीर करण्यात आली. खरीप हंगामामध्ये निघालेल्या प्रत्यक्ष उत्पन्नाचा ठरवून दिलेल्या गुणसूत्रानुसार आढावा घेतला जातो. त्यावरुन आणेवारी निश्चित केली जाते. सर्वसाधारणपणे १०० पैसे आणेवारी निघाली तर त्या जिल्ह्यात पीक उत्पादन १०० टक्के असल्याचे मानले जाते. त्यामुळे पिकांची आणेवारी ही एका अर्थाने प्रत्यक्ष उत्पादनाचा आकडा निश्चित करते. ही आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असेल तर त्या भागात नुकसान झाल्याचे स्पष्ट होते. यावर्षी प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम आणेवारीत ४७.२२ पैसे आणेवारी निघाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पीक उत्पादनाला ५० पैशांपेक्षाही अधिक फटका बसल्याचे निश्चित झाले आहे. आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्याचा फटका पिकांना बसला. त्यामुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी शासनाने सध्या मदत देण्याचे घोषित केले असून जिल्ह्याला या मदतीचा दुसरा टप्पा मिळाला आहे. जिल्ह्यातील पिकांचे नुकसान पाहता शासनाने हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट मदत द्यावी, अशी येथील शेतकºयांची मागणी आहे; परंतु, अद्याप त्यावर शासनाने विचार केला नाही. याच काळात पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी निघाल्याने जिल्ह्यातील पीक नुकसानीवर प्रशासनाकडून शिक्कामोर्तब झाले असून आता शासन या संदर्भात मदत वाढवून देण्यासाठी गांभीर्याने विचार करेल, अशी अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.शासनाच्या भूमिकेकडे लक्ष४मागील काही वर्षापर्यंत जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आणेवारीचा आधार घेऊन दुष्काळाची घोषणा केली जात होती. मात्र मागील वर्षी शासनाने निकषांमध्ये बदल केला. केवळ आणेवारी हा निकष ग्राह्य न धरता त्या भागातील पाऊस, हवामान बदल हे घटकही दुष्काळ जाहीर करताना ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे पूर्वी ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी जाहीर होताच दुष्काळ जाहीर होण्याचे संकेत मिळत असत; परंतु, आता निकष बदलले असून शासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.अतिवृष्टीनंतर घटली आणेवारी४जिल्हा प्रशासनाच्या वतीने खरीप हंगामातील पिकांची आणेवारी तीन टप्प्यात जाहीर केली जाते. त्यात ३० सप्टेंबर रोजी नजर आणेवारीची घोषणा करण्यात आली. त्यावेळी ६१.८४ एवढी आणेवारी निघाली. त्यानंतर ३१ आॅक्टोबर रोजी याच पिकांची सुधारित आणेवारी जाहीर करण्यात आली. ती ५९.३२ पैसे एवढी आली. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी ४७.२२ इतकी जिल्ह्याची आणेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.४आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने पिकांचे नुकसान केले. त्याचा फटका या पिकांना बसल्याचे अंतिम आणेवारीतून दिसून येत आहे. सुधारित आणेवारीपेक्षा अंतिम आणेवारीमध्ये १२.१ पैशाची घट झाली आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे विचार करता आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सिद्ध दिसत असून शासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी