शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत; परभणी जिल्ह्यात गहू, ज्वारीचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:05 IST

काढणीला आलेल्या ज्वारी,गहू पिकाचे नुकसान

ठळक मुद्देदोन्ही हंगामात निसर्गाने शेवटच्या टप्प्यात दगा दिलापिकांसोबत भाजीपाला क्षेत्राचे सुद्धा नुकसान

परभणी : सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस अवकाळी पाऊस झाल्याने तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील गहू, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ रबी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़ 

यंदाच्या दोन्ही हंगामात शेतक-यांना शेवटच्या टप्प्यातच निसर्गाने दगा दिला आहे़ खरीपाची सुगी निघण्याच्या तयारीत असताना अतिवृष्टी झाली़ त्यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले़ त्यानंतर आता रबी हंगामातील गहू आणि ज्वारी काढणीला आली असतानाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे़ मागील आठवड्यात आणि आता परत  दोन दिवसांपूर्वी या पावसाने हजेरी लावली़ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वा-यासह झालेल्या पावसाने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ 

गहू आणि ज्वारी ही दोन्ही पिके काढणीला आली आहेत़ अनेक भागांत काढणीचे कामही सुरू आहे; परंतु, त्यातच पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे या दोन्ही पिकांचे नुकसान झाले़ परभणी तालुक्यात सिंगणापूरसह इटलापूर, बोरवंड, ब्राह्मणगाव, पोखर्णी आदी भागांत हा पाऊस झाला आहे़ रबी पिकांबरोबरच यावर्षी परिसरातील शेतक-यांनी भाजीपाला लागवडीवर भर दिला आहे़ मात्र पावसाने भाजीपाल्याचेही अतोनात नुकसान झाले़ प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत, अशी मगणी होत आहे़

टॅग्स :RainपाऊसparabhaniपरभणीFarmerशेतकरी