शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत; परभणी जिल्ह्यात गहू, ज्वारीचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:05 IST

काढणीला आलेल्या ज्वारी,गहू पिकाचे नुकसान

ठळक मुद्देदोन्ही हंगामात निसर्गाने शेवटच्या टप्प्यात दगा दिलापिकांसोबत भाजीपाला क्षेत्राचे सुद्धा नुकसान

परभणी : सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस अवकाळी पाऊस झाल्याने तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील गहू, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ रबी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़ 

यंदाच्या दोन्ही हंगामात शेतक-यांना शेवटच्या टप्प्यातच निसर्गाने दगा दिला आहे़ खरीपाची सुगी निघण्याच्या तयारीत असताना अतिवृष्टी झाली़ त्यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले़ त्यानंतर आता रबी हंगामातील गहू आणि ज्वारी काढणीला आली असतानाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे़ मागील आठवड्यात आणि आता परत  दोन दिवसांपूर्वी या पावसाने हजेरी लावली़ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वा-यासह झालेल्या पावसाने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ 

गहू आणि ज्वारी ही दोन्ही पिके काढणीला आली आहेत़ अनेक भागांत काढणीचे कामही सुरू आहे; परंतु, त्यातच पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे या दोन्ही पिकांचे नुकसान झाले़ परभणी तालुक्यात सिंगणापूरसह इटलापूर, बोरवंड, ब्राह्मणगाव, पोखर्णी आदी भागांत हा पाऊस झाला आहे़ रबी पिकांबरोबरच यावर्षी परिसरातील शेतक-यांनी भाजीपाला लागवडीवर भर दिला आहे़ मात्र पावसाने भाजीपाल्याचेही अतोनात नुकसान झाले़ प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत, अशी मगणी होत आहे़

टॅग्स :RainपाऊसparabhaniपरभणीFarmerशेतकरी