शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

परभरणीजिल्ह्यात उरला केवळ ०.७२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:36 IST

आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पामध्ये आज घडीला केवळ ०.७६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या साठ्याची टक्केवारीही केवळ ०.७२ इतकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पामध्ये आज घडीला केवळ ०.७६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या साठ्याची टक्केवारीही केवळ ०.७२ इतकी आहे.जिल्ह्यात चार उच्चपातळी बंधारे असून या बंधाऱ्याची पूर्ण जलक्षमता ही १०१.९४ दलघमी इतकी आहे. आजघडीला या उच्च पातळी बंधाºयामध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. तीन लघु प्रकल्पही जिल्ह्यात असून या लघुप्रकल्पांची क्षमता ४.८४ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात हे तिन्हीही लघु प्रकल्प कोरडे आहेत. जिल्ह्यात असलेल्या दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये काही अंशी पाणी शिल्लक आहे. ०.७६ दलघमी जलसाठा या बंधाºयामध्ये असून पूर्ण जलक्षमता ही २.८० इतकी आहे.जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पांची साठवण क्षमता ही १०९.५८ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात केवळ ०.७६ दलघमी जलसाठा या प्रकल्पामध्ये उरला आहे. एकूणच जिल्ह्यातील प्रकल्पामधील पाणी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. जिल्ह्यात असलेल्या गोदावरी, दुधना, करपरा, मासोळी, पूर्णा या प्रमुख नद्या अद्याप कोरड्याच आहेत. दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पूर्णा नदी शनिवार पासून वाहती झाली आहे. येलदरी प्रकल्पातील जलसाठ्यातही काही अंशी पाणी वाढले आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांची परिस्थिती चांगली आहे. पण त्याचवेळी जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे असल्याने चिंता वाढली आहे. आगामी काळात मोठा पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी