शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

परभरणीजिल्ह्यात उरला केवळ ०.७२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:36 IST

आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पामध्ये आज घडीला केवळ ०.७६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या साठ्याची टक्केवारीही केवळ ०.७२ इतकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पामध्ये आज घडीला केवळ ०.७६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या साठ्याची टक्केवारीही केवळ ०.७२ इतकी आहे.जिल्ह्यात चार उच्चपातळी बंधारे असून या बंधाऱ्याची पूर्ण जलक्षमता ही १०१.९४ दलघमी इतकी आहे. आजघडीला या उच्च पातळी बंधाºयामध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. तीन लघु प्रकल्पही जिल्ह्यात असून या लघुप्रकल्पांची क्षमता ४.८४ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात हे तिन्हीही लघु प्रकल्प कोरडे आहेत. जिल्ह्यात असलेल्या दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये काही अंशी पाणी शिल्लक आहे. ०.७६ दलघमी जलसाठा या बंधाºयामध्ये असून पूर्ण जलक्षमता ही २.८० इतकी आहे.जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पांची साठवण क्षमता ही १०९.५८ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात केवळ ०.७६ दलघमी जलसाठा या प्रकल्पामध्ये उरला आहे. एकूणच जिल्ह्यातील प्रकल्पामधील पाणी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. जिल्ह्यात असलेल्या गोदावरी, दुधना, करपरा, मासोळी, पूर्णा या प्रमुख नद्या अद्याप कोरड्याच आहेत. दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पूर्णा नदी शनिवार पासून वाहती झाली आहे. येलदरी प्रकल्पातील जलसाठ्यातही काही अंशी पाणी वाढले आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांची परिस्थिती चांगली आहे. पण त्याचवेळी जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे असल्याने चिंता वाढली आहे. आगामी काळात मोठा पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी