शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

परभणी जिल्ह्यात फक्त १६.५ टक्के पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:44 IST

जिल्ह्यात २०१९-२० या खरीप हंगामात १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असताना आतापर्यंत फक्त १६.५८ टक्केच पीक कर्ज वाटप विविध बँकांनी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी दाखविलेला कंजुषपणा समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात २०१९-२० या खरीप हंगामात १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असताना आतापर्यंत फक्त १६.५८ टक्केच पीक कर्ज वाटप विविध बँकांनी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी दाखविलेला कंजुषपणा समोर आला आहे.परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकºयांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी हातात पैशांची आवश्यकता असताना बँकांनी मात्र आखडता हात घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामात वाटप करावयाच्या कर्जाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले होते.त्यामुळे जुलैअखेरपर्यंत बँकांनी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणे अपेक्षित असताना ३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ १६.५८ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण होऊन पिकांना पाते, फुले लागले आहेत. पेरणीसाठीच शेतकºयांना पैशांची आवश्यकता भासते. मात्र बँकांना उद्दीष्ट देऊनही वेळेत कर्ज वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा कुठलाही फायदा झाला नाही.शेतकºयांनी खाजगी सावकारांची दारे ठोठावून पैसा जमा केला. जर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळत नसेल तर उपयोग काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील वाणिज्य, खाजगी, जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखांनी ४३ हजार ९०९ शेतकºयांना २४३ कोटी ८३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. अद्यापही अर्ध्याहून अधिक शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देऊन पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांतून होत आहे.असे वाटप झाले पीक कर्ज४यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले होते. मात्र त्या तुलनेत वाणिज्य बँकांनी केवळ ६ हजार ८३० शेतकºयांना ६६ कोटी ९२ लाख रुपये दिले.४ खाजगी बँकांनी १ हजार ६९२ शेतकºयांना २७ कोटी ५५ लाख रुपये, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ५ हजार ५७७ शेतकºयांना ५५ कोटी ८७ लाख रुपये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २९ हजार ८१६ शेतकºयांना ९३ कोटी ४९ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे, आता खरीप हंगाम संपत आला आहे; परंतु, बँकांनी अद्यापपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केलेले नाही.दीड लाख शेतकरी अद्यापही वंचित४गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील जवळपास २ लाख शेतकºयांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप केले होते; परंतु, यावर्षीचा खरीप हंगाम संपत आलेला असताना आतापर्यंत केवळ ४४ हजार शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे.४त्यामुळे अद्यापही जवळपास दीड लाख शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. याकडे बँक प्रशासनाने लक्ष देऊन पीक कर्ज वाटपासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करुन लाभार्थी शेतकºयाला लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक