शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
3
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
4
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
5
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
6
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
7
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
8
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
9
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
10
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
11
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
12
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
13
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
14
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
15
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
16
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
17
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
18
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
19
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
20
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण

परभणी : ‘जलसिंचन’ योजनेतून जिल्ह्याला वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:29 IST

राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलसिंचन प्रकल्प योजनेतून परभणी जिल्ह्याला निकषात बसत नसल्याच्या कारणावरुन वगळण्यात आले आहे. दीड वर्षात जिल्ह्यात १६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करुनही शासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलसिंचन प्रकल्प योजनेतून परभणी जिल्ह्याला निकषात बसत नसल्याच्या कारणावरुन वगळण्यात आले आहे. दीड वर्षात जिल्ह्यात १६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करुनही शासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहे.राज्य शासनाच्या ‘बळीराजा संजीवनी’ योजनेंतर्गत राज्यातील दुष्काग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी जलसिंचन प्रकल्प योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी केंद्र शासनाने राज्याकरीता ३ हजार ८५१.४१ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य विशेष पॅकेजअंतर्गत देण्याचा निर्णय घेतला होता. या निधीतून शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी १७ प्रकल्पांची निवड करण्यात आली. त्यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील ५, जालना जिल्ह्यातील ६, नांदेड जिल्ह्यातील २, बीड जिल्ह्यातील १, लातूर जिल्ह्यातील ३, विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील १, अमरावती जिल्ह्यातील १८, अकोल्यातील ७, वाशिममधील १८, यवतमाळमधील १४ व बुलढाणा जिल्ह्यातील ८ अशा एकूण ८३ प्रकल्पांचा समावेश होता. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातील ज्या प्रकल्पांना केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता आहे, असे तसेच बांधकामाधीन लघु प्रकल्प जे पुढील तीन वर्षात पूर्ण होऊ शकतील, अशा प्रकल्पांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता. हे प्रकल्प २०२०-२१ वर्षापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आले होते. या निकषामध्ये मराठवाड्यातील परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यातील बांधकामाधीन प्रकल्प बसत नसल्याने त्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला नसल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.परभणी जिल्ह्यात गतवर्षी १२९ शेतकºयांनी नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केल्या. यावर्षी जानेवारी ते १२ जुलै २०१९ पर्यंत ३९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. दीड वर्षात जिल्ह्यातील १६८ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असतानाही शासनाला मात्र या संदर्भात गांभीर्य वाटत नाही. परिणामी जलसिंचन प्रकल्प योजनेतून जिल्हा वगळला गेला आहे.जिल्ह्यातील अनेक प्रकल्पाची कामे राहिली अपूर्ण४जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या चाºयांची अनेक कामे अपूर्ण आहेत. डिग्रस मध्यम प्रकल्पाचेही काम अपूर्ण आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या अखत्यारित येणाºया डाव्या व उजव्या कालव्याच्या चाºयांचीही अनेक वर्षापासून दुरुस्ती झालेली नाही. गोदावरी नदीवरील मुळी बंधाºयास दरवाजे नाहीत. तारुगव्हाण येथील बंधाºयाचे काम अर्धवट अवस्थेत आहे.४ ही मोजकी उदाहरणे असली तरी यापेक्षाही अनेक मोठे, लघु व मध्यम प्रकल्पाची कामे पूर्ण होणे बाकी आहेत. असे असताना जिल्ह्याला निधी मिळण्याची अपेक्षा आहे; परंतु, प्रशासकीय स्तरावरुन कागदीमेळ घालून निधी मिळविण्याासठी अडथळा निर्माण केला जात आहे.४ लघु पाटबंधारे विभागाने २०१६-१७ मध्ये दिलेल्या अहवालात परभणी, सोनपेठ, गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यांमध्ये एकूण २६८ लघु पाटबंधाºयांची कामे पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. मार्च २०१६ अखेर जिल्ह्यातील ५९ तर मार्च २०१७ अखेर ३४७ कामे पूर्ण झाली आहेत. वापरात असलेल्या कामाचे २७ हजार ४४३ हेक्टर लाभक्षेत्र असून ९ हजार ६९० हेक्टर जमीन यामुळे ओलिताखाली आल्याचा या विभागाचा दावा आहे. प्रत्यक्षात फिल्डवरील परिस्थिती वेगळी आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प