शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

परभणी जिल्ह्यात कर्जमाफीचे २५८ कोटी शेतकºयांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:14 AM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर अद्यापपर्यंत २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर अद्यापपर्यंत २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकºयाचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल केले. दाखल केलेल्या आॅनलाईन अर्जांचे जिल्ह्यामध्ये १ व २ आॅक्टोबर रोजी ६४४ गावांमध्ये चावडीवाचन पूर्ण करुन ५ आॅक्टोबरपर्यंत आलेल्या आक्षेप अर्जावर तालुकास्तरीय अंमलबजावणी समितीमध्ये कार्यवाही करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या कुटुंबासह प्रातिनिधीक सत्कार सोहळा १८ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला; परंतु, त्यानंतर शासनाने राज्यस्तरावरुन कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांच्या नजरा ग्रीनलिस्टकडे होत्या. या कर्जमाफीवर तब्बल १ महिना कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कर्जमाफी मिळते की नाही, या विचारात जिल्ह्यातील शेतकरी अडकला होता. त्यानंतर शासनाकडून मध्यवर्ती, व्यापारी, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांना ८, २७, २८ नोव्हेंबर व ६ डिसेंबर रोजी पात्र लाभार्थी शेतकºयांच्या ग्रीनलिस्ट याद्या प्राप्त झाल्या. त्यानुसार जिल्ह्यातील ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित १ लाख २७ हजार ५७ शेतकºयांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा करणे बाकी आहे.यासाठीची काही रक्कम जिल्ह्याला मिळाली आहे.बँक निहाय शेतकºयांच्या खात्यावर जमा रक्कमजिल्ह्यातील ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर शासनाने २५८ कोटी ५८ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. यामध्ये स्टेट बँक आॅफ इंडियाने १० हजार ७२८ शेतकºयांच्या खात्यावर ७३ कोटी ३८ लाख रुपये वर्ग केले आहेत. तसेच बँक आॅफ महाराष्ट्रने ४ हजार २७३ शेतकºयांच्या खात्यावर २७ कोटी ९७ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ३१६ शेतकºयांच्या खात्यावर २ कोटी १८ लाख, युनियन बँकने ३२७ शेतकºयांच्या खात्यावर २ कोटी ४३ लाख, बँक आॅफ बडोदाने ३८१ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी १८ लाख, आंध्रा बँकेने ६२ शेतकºयांच्या खात्यावर २९ लाख, अलाहाबाद बँकेने २ हजार ५ शेतकºयांच्या खात्यावर १४ कोटी २७ लाख, कॅनरा बँकेने ६७४ शेतकºयांच्या खात्यावर ४ कोटी ५८ लाख, देना बँकेने १७६ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी २५ लाख, इंडियन ओरसीस बँकेने ९९ शेतकºयांच्या खात्यावर ६८ लाख, सिंडीकेट बँकेने २१४ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी ५१ लाख, युको बँकेने १ हजार ३८० शेतकºयांच्या खात्यावर ६ कोटी ३७ लाख, विजया बँकेने १९३ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी ५० लाख तसेच सर्वाधिक महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १४ हजार १३६ शेतकºयांच्या बँक खात्यावर ८९ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे.प्रोत्साहनपर रक्कमेचा ३१ हजार शेतकºयांना फायदाछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २०१५-१६ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची ३० जून २०१६ पर्यंत पूर्णत: परतफेड केलेल्या शेतकºयांनी २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची पूर्ण रक्कम ३० जून २०१७ पर्यंत परतफेड केल्यास त्यांना पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार होती. यामध्ये जिल्ह्यातील ३१ हजार ८७८ शेतकºयांच्या बँक खात्यावर ४२ कोटी २३ लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे प्रोत्साहनपर रक्कमेचा आतापर्यंत ३१ हजार ८७८ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.‘लोकमत’चा पाठपुरावाकर्जमाफी योजनेअंतर्गत १० डिसेंबरपर्यंत जिल्ह्याला २८७ कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली होती. परंतु, ही रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली नव्हती. १५ नोव्हेंबरच्या अंकात ‘लोकमत’ ने ‘जिल्ह्यात ६० कोटी रुपयांची कर्जमाफी ’या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यासाठी २८७ कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली होती. ‘लोकमत’ने १० डिसेंबरच्या अंकात ‘जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी प्राप्त’या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्याला मिळालेली रक्कम लाभार्थी शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केली.