शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी: पावसासाठी पायी दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:16 IST

पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पाऊस पडावा, यासाठी पुर्णा तालुक्यातील कलमुला येथील महिलांनी ४ जुलै रोजी कलमुला ते चांगेफळ अशी पायी दिंडी काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पाऊस पडावा, यासाठी पुर्णा तालुक्यातील कलमुला येथील महिलांनी ४ जुलै रोजी कलमुला ते चांगेफळ अशी पायी दिंडी काढली.मागील वर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. खरीप आणि रबी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे यावर्षी तरी चांगला पाऊस होऊन नुकसान भरून निघेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र आजपर्यंत तरी शेतकºयांना दिलासा मिळाला नाही. एक महिन्यापासून शेतकरी पेरणी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जून महिन्यापासून पावसाळ्याला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात मान्सून लांबल्याने आज-उद्या पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होते. मात्र मान्सून दाखल होऊन १५ दिवस झाले तरीही परभणी जिल्ह्यात एकही दमदार पाऊस झाला नाही. शेतकºयांनी पेरणीपूर्व शेतीची मशागत करून ठेवली आहे. काही भागात धोका पत्कारत धूळ पेरणी करण्यात आली. मात्र समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे या शेतकºयांना नुकसान सहन करावे लागते की, काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.कलमुलातील महिलांनी पावसासाठी काढली दिंडी४आलेगाव- कलमूला येथील महिलांनी ४ जुलै रोजी कलमूला ते चांगेफळ पायी दिंडी काढून पावसासाठी देवाला साकडे घातले.४आलेगाव परिसरात पाऊस होत नसल्याने पेरण्या थांबल्या आहेत. या भागात बहुतांश ग्रामस्थांचा शेती हाच व्यवसाय आहे. पाऊस पडावा म्हणून आता देवाला साकडे घातले जात आहेत. त्यातूनच कलमूला येथील २५ ते ३० महिलांनी गुुरुवारी कलमूला ते चांगेफळ अशी १० कि.मी. अंतराची पायी दिंडी काढली. दत्तात्रयाच्या भजनांचे गायन करीत या महिलांनी चांगेफळ गाठले. या ठिकाणी मंदिरात जाऊन देवाला पावसाचे साकडे घातले.एक महिन्यात ७८ मि.मी. पाऊस४१ ते ३० जून या एक महिन्यामध्ये जिल्ह्यात केवळ ७८.९६ मि.मी. पाऊस झाला आहे. महिनाभरात १२६.६१ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. मात्र अपेक्षित पावसाच्या ६२ टक्केच पाऊस झाला आहे.४जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यामध्ये सर्वाधिक ९७.२५ मि. मी. पाऊस झाला. अपेक्षित पावसाच्या तुलनेत या तालुक्यात ९१ टक्के पाऊस झाला. मानवत तालुक्यात १०५.६७ मि.मी. पाऊस झाला असला तरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ८७ टक्के पाऊस या तालुक्यात नोंद झाला आहे.४पूर्णा तालुक्यात ८९.६० मि.मी., जिंतूर तालुक्यात ८४ मि.मी., परभणी ७१.७५ मि.मी., पूर्णा तालुक्यात ८९.६० मि.मी. , सोनपेठ ८७.५० मि.मी., जिंतूर ८४ मि.मी., पाथरी ६० मि.मी., पालम ५८.६७ मि.मी., परभणी ७१.७५ मि.मी. आणि सेलू तालुक्यात ५६.२० मि.मी. पाऊस झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWomenमहिलाRainपाऊसdroughtदुष्काळ