शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

परभणी : ग्रामपंचायतस्तरावर होणार विकास आराखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:55 IST

केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करून २०१९-२० या वर्षांत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असून, शासनाकडून सबकी योजना सबका विकास अभियान राबविले जात आहे़ या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर जबाबदाºया सोपविण्यात आल्या आहेत. २ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामपंचायतस्तरावर विकास आराखडे तयार करण्यात येणार आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करून २०१९-२० या वर्षांत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असून, शासनाकडून सबकी योजना सबका विकास अभियान राबविले जात आहे़ या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर जबाबदाºया सोपविण्यात आल्या आहेत. २ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामपंचायतस्तरावर विकास आराखडे तयार करण्यात येणार आहेत़गाव आणि ग्रामपंचायत मुख्य केंद्र बिंदू मानून केंद्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज मंत्रालयाने २०१९-२० या वर्षांत विविध योजनांचे अभिसरण करून गाव पातळीवर विकास आराखडा तयार करण्याचे धोरण आखले आहे़ त्यासाठी सबकी योजना सबका विकास या योजनेंतर्गत लोकसहभागातून लोकांचा ग्रामपंचायत आराखडा हे विशेष अभियान राबविले जात आहे़ या अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत़ त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़आराखडा तयार करताना ग्रामपंचायतीसाठी दलित वस्ती, तांडा वस्ती, समाजकल्याण, आमदार, खासदार निधी, पाणंद रस्ता, २५:१५, जनसुविधा या कामांचे नियोजन केले जाणार आहे़ तसेच २०१८-१९ या वर्षाच्या आराखड्यात समाविष्ट नसलेली शाळा, अंगणवाडी, शौचालय बांधकाम हेही कामे ग्रामपंचायतींना घ्यावी लागणार आहेत़ त्यासाठी ग्रामसभेत याचे नियोजन करावे लागणार आहे़ग्रामपंचायतीने पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखड्यापैकी आतापर्यंत हाती घेण्यात आलेली कामे, उपक्रम, त्यावर झालेला खर्च, शिल्लक निधी आणि ग्रामपंचायतीसाठी २०१९-२० या वर्षांत मिळणारे उत्पन्न, इतर निधीची सविस्तर माहिती ग्रामसभेत द्यायची आहे़त्याचबरोबर या पूर्वी ग्रामसभेने ठरविलेला उपक्रम, गावच्या गरजा, अडचणी, त्यावरील उपाययोजना, आराखडा आणि इतर योजनांची आराखड्यात सांगड घालण्यात येणार आहे़ग्रामपंचायत विकास आराखड्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांचा समावेश असल्याने त्यानुसार मनरेगाचाही आराखडा तयार केला जाणार आहे़अधिकाºयांना दिल्या जबाबदाºया४या अभियानात सुसंगतता यावी, यासाठी शासनाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक यांना जबाबदाºया वाटून दिल्या आहेत़; परंतु, विकास आराखडा तयार करताना गाव पातळीवर प्रत्येक विभागाने विहित नमुन्यातील अहवाल उपस्थित राहून ग्रामसभेला देणे बंधनकारक आहे़ यात ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, पशूसंवर्धन, महिला बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे, बाधंकाम, सामाजिक न्याय, कृषी, महसूल, गृह, वन, वीज पुरवठा, एसटी महामंडळ या विभागाने मात्र योजनेच्या प्रारंभीच ग्रामसभेकडे पाठ फिरविली आहे. विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी ग्रामसभांना उपस्थित रहात नसल्याचे दिसत आहे.विशेष म्हणजे पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथील १७ नोव्हेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात आली़ या ग्रामसभेला उपस्थित राहण्याबाबत सर्वच विभागांना नोटिसा देण्यात आल्या होत्या़ मात्र इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी ग्रामसभेकडे फिरकलेच नाहीत़ त्यामुळे ग्रामसेवक, सरपंच आणि संपर्क अधिकारी यांच्या उपस्थितीत सभा झाली़ अनुस्थितीत कर्मचाºयांना नोटिसा काढल्या जाणार असल्याची माहिती ग्रामसेवक फंड यांनी दिली़असा आहे ग्रामसभेचा कार्यक्रम४पाथरी तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींतर्गत शासनाच्या सबकी योजना सबका विकास आराखडा यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे़ शासन निर्णयाप्रमाणे १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ग्रामसभेचे नियोजन पूर्ण होणे अपेक्षित आहे़ पाथरी पंचायत समितीच्या वतीने १२ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजित करण्याचे नियोजन केले आहे़ त्यासाठी ग्रामसेवकांसोबत संपर्क अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीgram panchayatग्राम पंचायत