शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : डिग्रसचे पाणी पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:18 IST

गोदावरी नदीच्या पात्रात बांधलेल्या डिग्रस बंधाऱ्यातून शनिवारी सकाळी ६ वाजता नांदेड शहरासाठी २० दलघमी पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे पात्रात आता केवळ गाळ शिल्लक राहिला असून, गोदावरी काठाचे वाळवंट झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : गोदावरी नदीच्या पात्रात बांधलेल्या डिग्रस बंधाऱ्यातून शनिवारी सकाळी ६ वाजता नांदेड शहरासाठी २० दलघमी पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे पात्रात आता केवळ गाळ शिल्लक राहिला असून, गोदावरी काठाचे वाळवंट झाले आहे़परभणी जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे़ संपूर्ण पालम तालुका दुष्काळी म्हणून जाहीरही करण्यात आला़ त्यामुळे तालुक्यात आॅक्टोबर महिन्यापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे़ अशा परिस्थितीमध्ये तालुक्यातील डिग्रस बंधाºयातील पाणीसाठा तालुकावासियांसाठी आशेचा किरण ठरत होता़ या बंधाºयात ३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्यात आला होता़ यापैकी २५ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते़ २२ डिसेंबर रोजी बंधाºयामध्ये २६ दलघमी पाणीसाठा शिल्लक होता़ या पाणीसाठ्यापैकी २५ दलघमी पाणी नांदेडसाठी सोडावे, अशी मागणी करण्यात आली होती़ मात्र जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी पालम शहर व गोदाकाठावरील गावांतील पिण्याच्या पाण्यासाठी ६ दलघमी पाणी शिल्लक ठेवण्याच्या सूचना दिल्या़ त्यामुळे २६ दलघमी पैकी २० दलघमी पाणी सोडण्यात आले आहे़ २२ डिसेंबर रोजी सकाळी ६़२० वाजता बंधाºयाच्या १६ पैकी ९ दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला़ सकाळी ११़३० वाजेपर्यंत हे पाणी सोडण्यात आले़ बंधाºयातील पाणी नांदेड शहराकडे झेपावले असून, गोदावरी पात्रात आता ६ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़डिग्रस बंधारा पालम तालुक्यात असून, या बंधाºयातील पाणीसाठ्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे़ परंतु, बंधारा बांधतानाच या बंधाºयातील पाणी नांदेडकरांनी आरक्षित करून ठेवले आहे़ त्यामुळे दरवर्षी याबंधाºयातून पाणी पळविले जाते़ तालुक्यातील शेतकºयांनी आपल्या जमिनी या बंधाºयासाठी देऊन परिसराच्या विकासाला हातभार लावला़ मात्र प्रशासकीय दबावातून बंधाºयातून पाणीसाठा नांदेडसाठी आरक्षित केल्याने या बंधाºयातील पाण्याचा वापर तालुक्यासाठी होत नाही़ दुष्काळी परिस्थिती असतानाही पालम तालुक्यातील ग्रामस्थांच्या पाणीटंचाईचा कोणताही विचार न करता, किंवा स्थानिक शेतकºयांना विचारात न घेता प्रशासनाने बळाचा वापर करून अचानक पाणी सोडले़ परिणामी स्थानिक शेतकºयांना विरोध करण्यासाठीही वाव मिळाला नाही़ अखेर या बंधाºयातील पाणी पळविण्यात नांदेडकरांना यश आले़साठा असतानाही डिग्रसच्या पाण्यावर डोळादरवर्षी नांदेड शहराच्या पाण्यासाठी मार्च महिन्यात डिग्रस बंधाºयातून विष्णूपुरी बंधाºयामध्ये पाणी सोडले जाते़ सद्यस्थितीत विष्णूपुरी बंधाºयामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे़ परंतु, तरीही मार्च महिन्याची प्रतीक्षा न करता डिग्रसच्या पाण्यावर डोळा ठेवून डिसेंबर महिन्यातच बंधाºयातील पाणी पळविण्यात आले़ या धोरणामुळे स्थानिक शेतकºयांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे़ नांदेड शहरासाठी पाणी आरक्षित केले असले तरी ते वेळेपूर्वीच उचलण्यात आल्याने तालुक्यातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़आरक्षित पाणीही सोडलेजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पालम आणि पूर्णा तालुक्यासाठी या बंधाºयात पाणीसाठा आरक्षित केला होता़ परंतु, प्रशासकीय दबावामुळे आरक्षित केलेले पाणीही नांदेडकरांसाठी सोडून दिले़ परिणामी टंचाईच भर पडणार आहे़प्रशासनाचे दुर्लक्षतालुक्यामध्ये जनावरांच्या चाºयासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे़ अशा परिस्थितीत उपलब्ध असलेले पाणी स्थानिकांसाठी वापरणे आवश्यक होते़ परंतु, स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी सोडण्याची वेळ आली आहे.गाळच शिल्लकडिग्रस बंधाºयामध्ये असलेल्या २६ दलघमी पैकी २० दलघमी पाणी सोडल्याने कागदोपत्री सहा दलघमी पाणी असल्याचे दाखविले जात आहे़ परंतु, प्रत्यक्षात या बंधाºयात मोठ्या प्रमाणात गाळ असून, पाण्याऐवजी या बंधाºयातच केवळ गाळच शिल्लक राहिला आहे़अधिकाºयांवर कारवाई करा-रोकडेडिग्रस बंधाºयातील पाणी सोडण्याची आवश्यकता नसतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती न देता बंधाºयातील पाणी सोडण्यात आले आहे़ पाणी सोडण्यासाठी मदत करणाºया अधिकारी व कर्मचाºयांनी विश्वासघात केल्याचा आरोप भाजपाचे गणेशराव रोकडे यांनी केला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदी