शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : डिग्रसचे पाणी पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:18 IST

गोदावरी नदीच्या पात्रात बांधलेल्या डिग्रस बंधाऱ्यातून शनिवारी सकाळी ६ वाजता नांदेड शहरासाठी २० दलघमी पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे पात्रात आता केवळ गाळ शिल्लक राहिला असून, गोदावरी काठाचे वाळवंट झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : गोदावरी नदीच्या पात्रात बांधलेल्या डिग्रस बंधाऱ्यातून शनिवारी सकाळी ६ वाजता नांदेड शहरासाठी २० दलघमी पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे पात्रात आता केवळ गाळ शिल्लक राहिला असून, गोदावरी काठाचे वाळवंट झाले आहे़परभणी जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे़ संपूर्ण पालम तालुका दुष्काळी म्हणून जाहीरही करण्यात आला़ त्यामुळे तालुक्यात आॅक्टोबर महिन्यापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे़ अशा परिस्थितीमध्ये तालुक्यातील डिग्रस बंधाºयातील पाणीसाठा तालुकावासियांसाठी आशेचा किरण ठरत होता़ या बंधाºयात ३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्यात आला होता़ यापैकी २५ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते़ २२ डिसेंबर रोजी बंधाºयामध्ये २६ दलघमी पाणीसाठा शिल्लक होता़ या पाणीसाठ्यापैकी २५ दलघमी पाणी नांदेडसाठी सोडावे, अशी मागणी करण्यात आली होती़ मात्र जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी पालम शहर व गोदाकाठावरील गावांतील पिण्याच्या पाण्यासाठी ६ दलघमी पाणी शिल्लक ठेवण्याच्या सूचना दिल्या़ त्यामुळे २६ दलघमी पैकी २० दलघमी पाणी सोडण्यात आले आहे़ २२ डिसेंबर रोजी सकाळी ६़२० वाजता बंधाºयाच्या १६ पैकी ९ दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला़ सकाळी ११़३० वाजेपर्यंत हे पाणी सोडण्यात आले़ बंधाºयातील पाणी नांदेड शहराकडे झेपावले असून, गोदावरी पात्रात आता ६ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़डिग्रस बंधारा पालम तालुक्यात असून, या बंधाºयातील पाणीसाठ्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे़ परंतु, बंधारा बांधतानाच या बंधाºयातील पाणी नांदेडकरांनी आरक्षित करून ठेवले आहे़ त्यामुळे दरवर्षी याबंधाºयातून पाणी पळविले जाते़ तालुक्यातील शेतकºयांनी आपल्या जमिनी या बंधाºयासाठी देऊन परिसराच्या विकासाला हातभार लावला़ मात्र प्रशासकीय दबावातून बंधाºयातून पाणीसाठा नांदेडसाठी आरक्षित केल्याने या बंधाºयातील पाण्याचा वापर तालुक्यासाठी होत नाही़ दुष्काळी परिस्थिती असतानाही पालम तालुक्यातील ग्रामस्थांच्या पाणीटंचाईचा कोणताही विचार न करता, किंवा स्थानिक शेतकºयांना विचारात न घेता प्रशासनाने बळाचा वापर करून अचानक पाणी सोडले़ परिणामी स्थानिक शेतकºयांना विरोध करण्यासाठीही वाव मिळाला नाही़ अखेर या बंधाºयातील पाणी पळविण्यात नांदेडकरांना यश आले़साठा असतानाही डिग्रसच्या पाण्यावर डोळादरवर्षी नांदेड शहराच्या पाण्यासाठी मार्च महिन्यात डिग्रस बंधाºयातून विष्णूपुरी बंधाºयामध्ये पाणी सोडले जाते़ सद्यस्थितीत विष्णूपुरी बंधाºयामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे़ परंतु, तरीही मार्च महिन्याची प्रतीक्षा न करता डिग्रसच्या पाण्यावर डोळा ठेवून डिसेंबर महिन्यातच बंधाºयातील पाणी पळविण्यात आले़ या धोरणामुळे स्थानिक शेतकºयांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे़ नांदेड शहरासाठी पाणी आरक्षित केले असले तरी ते वेळेपूर्वीच उचलण्यात आल्याने तालुक्यातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़आरक्षित पाणीही सोडलेजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पालम आणि पूर्णा तालुक्यासाठी या बंधाºयात पाणीसाठा आरक्षित केला होता़ परंतु, प्रशासकीय दबावामुळे आरक्षित केलेले पाणीही नांदेडकरांसाठी सोडून दिले़ परिणामी टंचाईच भर पडणार आहे़प्रशासनाचे दुर्लक्षतालुक्यामध्ये जनावरांच्या चाºयासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे़ अशा परिस्थितीत उपलब्ध असलेले पाणी स्थानिकांसाठी वापरणे आवश्यक होते़ परंतु, स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी सोडण्याची वेळ आली आहे.गाळच शिल्लकडिग्रस बंधाºयामध्ये असलेल्या २६ दलघमी पैकी २० दलघमी पाणी सोडल्याने कागदोपत्री सहा दलघमी पाणी असल्याचे दाखविले जात आहे़ परंतु, प्रत्यक्षात या बंधाºयात मोठ्या प्रमाणात गाळ असून, पाण्याऐवजी या बंधाºयातच केवळ गाळच शिल्लक राहिला आहे़अधिकाºयांवर कारवाई करा-रोकडेडिग्रस बंधाºयातील पाणी सोडण्याची आवश्यकता नसतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती न देता बंधाºयातील पाणी सोडण्यात आले आहे़ पाणी सोडण्यासाठी मदत करणाºया अधिकारी व कर्मचाºयांनी विश्वासघात केल्याचा आरोप भाजपाचे गणेशराव रोकडे यांनी केला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदी