शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

परभणी : पाण्यासाठी घालवावा लागतो दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:21 IST

वसमत रस्त्यावरील खानापूर नगरासह परिसरातील इतर वसाहतींमध्ये जलवाहिनी नसल्याने दोन महिन्यांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी कामधंदा सोडून भटकंती करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. महापालिकेने सुरु केलेले टँकर तोकडे पडत असल्याने मागील काही महिन्यांपासून नागरिक पाण्यासाठी हवालदिल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वसमत रस्त्यावरील खानापूर नगरासह परिसरातील इतर वसाहतींमध्ये जलवाहिनी नसल्याने दोन महिन्यांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी कामधंदा सोडून भटकंती करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. महापालिकेने सुरु केलेले टँकर तोकडे पडत असल्याने मागील काही महिन्यांपासून नागरिक पाण्यासाठी हवालदिल झाले आहेत.शहरात सर्वच वसाहतींमध्ये पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून १४ ते १५ दिवसांतून एकवेळा पाणी मिळते. ज्या भागात जलवाहिनी नाही. त्या भागातील अवस्था तर यापेक्षाही बिकट झाली आहे. खानापूरनगर परिसरात संभाजीनगर, अनुसयानगर, नृसिंहनगर, सारंगनगर, राजरत्ननगर, माळी गल्ली आदी ६ ते ७ वसाहती असून या भागात जलवाहिनीच्या माध्यमातून अद्यापही पाणीपुरवठा सुरु झाला नाही. महापालिकेने काही महिन्यांपूर्वी या भागातील जलवाहिनीचे काम पूर्ण केले आहे. मात्र या जलवाहिनीने पाणीपुरवठा सुरु झाला नसल्याने परिसरातील पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. येथील नागरिकांनी मागील काही महिन्यांपासून महापालिकेकडे पाठपुरावा करुन नवीन जलवाहिनीचा पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी केली आहे; परंतु, त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठीची ओरड कायम आहे.खानापूर परिसरासह इतर वसाहतींमध्ये पाण्याची दाहकता शहरातील अन्य भागापेक्षा अधिक असताना महापालिका मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष घालत नसल्याचे दिसत आहे. सकाळी उठल्यानंतर पहिला प्रश्न निर्माण होतो तो, पाण्याचा. संपूर्ण दिवस पाण्याच्या शोधात घालवावा लागतो. सद्यस्थितीला महापालिकेने या परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे.पाच ते सहा दिवसांतून एकवेळा टँकर येते. मात्र ६ -७ वसाहतींसाठी केवळ दोनच टँकर असल्याने टँकरद्वारे मिळणारे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे अनेकांना विकतचे पाणी घेऊन गुजरान करावी लागत आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही आणि महापालिकेला पाणीटंचाईची तीव्रता निदर्शनास आणून दिल्यानंतरही ठोस उपायोजना झाली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जातो. खानापूर आणि परिसरात टँकर आल्यानंतर ते पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते. अनेकवेळा पाण्यावरुन वादाचे प्रकारही घडत आहेत.मनपाने टँकर सुरु केले असले तरी पाणी वाटपाचे नियोजन नसल्याने नागरिकांना धावपळ करावी लागते. एकवेळा टँकर आल्यानंतर जास्तीत जास्त ४०० लिटरपर्यंत पाणी मिळते. हे पाणी ६ दिवसांपर्यंत पुरत नसल्याने टंचाई अधिक तीव्र झाली आहे. टँकर शिवाय कोणताही पर्याय सध्या तरी या भागात उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेने लक्ष घालून खानापूर परिसरासाठी मूबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.टँकरसाठी करावा लागतो पाठपुरावा४खानापूर आणि परिसरातील वसाहतींमध्ये पाच ते सहा दिवसांतून एकवेळा टँकर येत असले तरी या टँकरची वेळ निश्चित ठरलेली नाही. टँकर न आल्यास येथील नागरिकांना थेट पाण्याची टाकी गाठावी लागते.४ त्या ठिकाणी वसाहतींमध्ये टँकर सोडण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यानंतरच टँकर येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा दिवसातील अर्धा अधिक वेळ टँकरच्या पाण्यासाठी जात आहे. मनपाने याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.... तर निकाली: निघू शकतो प्रश्न४खानापूर नगरासह परिसरातील इतर वसाहतींमध्ये महापालिकेने नवीन जलवाहिनी टाकली आहे. विशेष म्हणजे, या जलवाहिनीला मुख्य जलवाहिनीशी जोडले आहे; परंतु, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरु केला नाही. त्यामुळे या भागात सद्यस्थितीला पाण्याचे हाल होत आहेत. या परिसरातील टंचाईचे गांभीर्य लक्षात घेता महापालिकेने नवीन जलवाहिनीतून तात्काळ पाणीपुरवठा सुरू केला तर या संपूर्ण वसाहतींमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न बऱ्याच अंशी निकाली निघू शकतो. नळाचे पाणी मूबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकते.४नवीन जलवाहिनीला अद्याप पाणीपुरवठा सुरु नसल्याने टंचाई वाढली आहे. मनपाने हे गांभीर्य लक्षात घेऊन नवीन जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई