शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

परभणी : पाण्यासाठी घालवावा लागतो दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:21 IST

वसमत रस्त्यावरील खानापूर नगरासह परिसरातील इतर वसाहतींमध्ये जलवाहिनी नसल्याने दोन महिन्यांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी कामधंदा सोडून भटकंती करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. महापालिकेने सुरु केलेले टँकर तोकडे पडत असल्याने मागील काही महिन्यांपासून नागरिक पाण्यासाठी हवालदिल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वसमत रस्त्यावरील खानापूर नगरासह परिसरातील इतर वसाहतींमध्ये जलवाहिनी नसल्याने दोन महिन्यांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी कामधंदा सोडून भटकंती करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. महापालिकेने सुरु केलेले टँकर तोकडे पडत असल्याने मागील काही महिन्यांपासून नागरिक पाण्यासाठी हवालदिल झाले आहेत.शहरात सर्वच वसाहतींमध्ये पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून १४ ते १५ दिवसांतून एकवेळा पाणी मिळते. ज्या भागात जलवाहिनी नाही. त्या भागातील अवस्था तर यापेक्षाही बिकट झाली आहे. खानापूरनगर परिसरात संभाजीनगर, अनुसयानगर, नृसिंहनगर, सारंगनगर, राजरत्ननगर, माळी गल्ली आदी ६ ते ७ वसाहती असून या भागात जलवाहिनीच्या माध्यमातून अद्यापही पाणीपुरवठा सुरु झाला नाही. महापालिकेने काही महिन्यांपूर्वी या भागातील जलवाहिनीचे काम पूर्ण केले आहे. मात्र या जलवाहिनीने पाणीपुरवठा सुरु झाला नसल्याने परिसरातील पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. येथील नागरिकांनी मागील काही महिन्यांपासून महापालिकेकडे पाठपुरावा करुन नवीन जलवाहिनीचा पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी केली आहे; परंतु, त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठीची ओरड कायम आहे.खानापूर परिसरासह इतर वसाहतींमध्ये पाण्याची दाहकता शहरातील अन्य भागापेक्षा अधिक असताना महापालिका मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष घालत नसल्याचे दिसत आहे. सकाळी उठल्यानंतर पहिला प्रश्न निर्माण होतो तो, पाण्याचा. संपूर्ण दिवस पाण्याच्या शोधात घालवावा लागतो. सद्यस्थितीला महापालिकेने या परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे.पाच ते सहा दिवसांतून एकवेळा टँकर येते. मात्र ६ -७ वसाहतींसाठी केवळ दोनच टँकर असल्याने टँकरद्वारे मिळणारे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे अनेकांना विकतचे पाणी घेऊन गुजरान करावी लागत आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही आणि महापालिकेला पाणीटंचाईची तीव्रता निदर्शनास आणून दिल्यानंतरही ठोस उपायोजना झाली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जातो. खानापूर आणि परिसरात टँकर आल्यानंतर ते पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते. अनेकवेळा पाण्यावरुन वादाचे प्रकारही घडत आहेत.मनपाने टँकर सुरु केले असले तरी पाणी वाटपाचे नियोजन नसल्याने नागरिकांना धावपळ करावी लागते. एकवेळा टँकर आल्यानंतर जास्तीत जास्त ४०० लिटरपर्यंत पाणी मिळते. हे पाणी ६ दिवसांपर्यंत पुरत नसल्याने टंचाई अधिक तीव्र झाली आहे. टँकर शिवाय कोणताही पर्याय सध्या तरी या भागात उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेने लक्ष घालून खानापूर परिसरासाठी मूबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.टँकरसाठी करावा लागतो पाठपुरावा४खानापूर आणि परिसरातील वसाहतींमध्ये पाच ते सहा दिवसांतून एकवेळा टँकर येत असले तरी या टँकरची वेळ निश्चित ठरलेली नाही. टँकर न आल्यास येथील नागरिकांना थेट पाण्याची टाकी गाठावी लागते.४ त्या ठिकाणी वसाहतींमध्ये टँकर सोडण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यानंतरच टँकर येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा दिवसातील अर्धा अधिक वेळ टँकरच्या पाण्यासाठी जात आहे. मनपाने याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.... तर निकाली: निघू शकतो प्रश्न४खानापूर नगरासह परिसरातील इतर वसाहतींमध्ये महापालिकेने नवीन जलवाहिनी टाकली आहे. विशेष म्हणजे, या जलवाहिनीला मुख्य जलवाहिनीशी जोडले आहे; परंतु, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरु केला नाही. त्यामुळे या भागात सद्यस्थितीला पाण्याचे हाल होत आहेत. या परिसरातील टंचाईचे गांभीर्य लक्षात घेता महापालिकेने नवीन जलवाहिनीतून तात्काळ पाणीपुरवठा सुरू केला तर या संपूर्ण वसाहतींमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न बऱ्याच अंशी निकाली निघू शकतो. नळाचे पाणी मूबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकते.४नवीन जलवाहिनीला अद्याप पाणीपुरवठा सुरु नसल्याने टंचाई वाढली आहे. मनपाने हे गांभीर्य लक्षात घेऊन नवीन जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई