शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाण्यासाठी घालवावा लागतो दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:21 IST

वसमत रस्त्यावरील खानापूर नगरासह परिसरातील इतर वसाहतींमध्ये जलवाहिनी नसल्याने दोन महिन्यांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी कामधंदा सोडून भटकंती करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. महापालिकेने सुरु केलेले टँकर तोकडे पडत असल्याने मागील काही महिन्यांपासून नागरिक पाण्यासाठी हवालदिल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वसमत रस्त्यावरील खानापूर नगरासह परिसरातील इतर वसाहतींमध्ये जलवाहिनी नसल्याने दोन महिन्यांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी कामधंदा सोडून भटकंती करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. महापालिकेने सुरु केलेले टँकर तोकडे पडत असल्याने मागील काही महिन्यांपासून नागरिक पाण्यासाठी हवालदिल झाले आहेत.शहरात सर्वच वसाहतींमध्ये पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून १४ ते १५ दिवसांतून एकवेळा पाणी मिळते. ज्या भागात जलवाहिनी नाही. त्या भागातील अवस्था तर यापेक्षाही बिकट झाली आहे. खानापूरनगर परिसरात संभाजीनगर, अनुसयानगर, नृसिंहनगर, सारंगनगर, राजरत्ननगर, माळी गल्ली आदी ६ ते ७ वसाहती असून या भागात जलवाहिनीच्या माध्यमातून अद्यापही पाणीपुरवठा सुरु झाला नाही. महापालिकेने काही महिन्यांपूर्वी या भागातील जलवाहिनीचे काम पूर्ण केले आहे. मात्र या जलवाहिनीने पाणीपुरवठा सुरु झाला नसल्याने परिसरातील पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. येथील नागरिकांनी मागील काही महिन्यांपासून महापालिकेकडे पाठपुरावा करुन नवीन जलवाहिनीचा पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी केली आहे; परंतु, त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठीची ओरड कायम आहे.खानापूर परिसरासह इतर वसाहतींमध्ये पाण्याची दाहकता शहरातील अन्य भागापेक्षा अधिक असताना महापालिका मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष घालत नसल्याचे दिसत आहे. सकाळी उठल्यानंतर पहिला प्रश्न निर्माण होतो तो, पाण्याचा. संपूर्ण दिवस पाण्याच्या शोधात घालवावा लागतो. सद्यस्थितीला महापालिकेने या परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे.पाच ते सहा दिवसांतून एकवेळा टँकर येते. मात्र ६ -७ वसाहतींसाठी केवळ दोनच टँकर असल्याने टँकरद्वारे मिळणारे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे अनेकांना विकतचे पाणी घेऊन गुजरान करावी लागत आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही आणि महापालिकेला पाणीटंचाईची तीव्रता निदर्शनास आणून दिल्यानंतरही ठोस उपायोजना झाली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जातो. खानापूर आणि परिसरात टँकर आल्यानंतर ते पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते. अनेकवेळा पाण्यावरुन वादाचे प्रकारही घडत आहेत.मनपाने टँकर सुरु केले असले तरी पाणी वाटपाचे नियोजन नसल्याने नागरिकांना धावपळ करावी लागते. एकवेळा टँकर आल्यानंतर जास्तीत जास्त ४०० लिटरपर्यंत पाणी मिळते. हे पाणी ६ दिवसांपर्यंत पुरत नसल्याने टंचाई अधिक तीव्र झाली आहे. टँकर शिवाय कोणताही पर्याय सध्या तरी या भागात उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेने लक्ष घालून खानापूर परिसरासाठी मूबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.टँकरसाठी करावा लागतो पाठपुरावा४खानापूर आणि परिसरातील वसाहतींमध्ये पाच ते सहा दिवसांतून एकवेळा टँकर येत असले तरी या टँकरची वेळ निश्चित ठरलेली नाही. टँकर न आल्यास येथील नागरिकांना थेट पाण्याची टाकी गाठावी लागते.४ त्या ठिकाणी वसाहतींमध्ये टँकर सोडण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यानंतरच टँकर येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा दिवसातील अर्धा अधिक वेळ टँकरच्या पाण्यासाठी जात आहे. मनपाने याचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.... तर निकाली: निघू शकतो प्रश्न४खानापूर नगरासह परिसरातील इतर वसाहतींमध्ये महापालिकेने नवीन जलवाहिनी टाकली आहे. विशेष म्हणजे, या जलवाहिनीला मुख्य जलवाहिनीशी जोडले आहे; परंतु, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरु केला नाही. त्यामुळे या भागात सद्यस्थितीला पाण्याचे हाल होत आहेत. या परिसरातील टंचाईचे गांभीर्य लक्षात घेता महापालिकेने नवीन जलवाहिनीतून तात्काळ पाणीपुरवठा सुरू केला तर या संपूर्ण वसाहतींमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न बऱ्याच अंशी निकाली निघू शकतो. नळाचे पाणी मूबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकते.४नवीन जलवाहिनीला अद्याप पाणीपुरवठा सुरु नसल्याने टंचाई वाढली आहे. मनपाने हे गांभीर्य लक्षात घेऊन नवीन जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई