शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

परभणी : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 00:46 IST

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून, अपेक्षित क्षेत्रापेक्षाही नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात पीक पंचनामे सुरूच आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून, अपेक्षित क्षेत्रापेक्षाही नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात पीक पंचनामे सुरूच आहेत़आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील उभ्या पिकांचे आणि काढून ठेवलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते़ काही भागात अतिवृष्टीने शेत जमिनीत पाणी साचून कापसाचे पीक पिवळे पडले़ या पिकाला बोंडातून कोंब फुटू लागले़ सोयाबीनचे पीकही जागेवर मोड फुटत असल्याने नुकसानग्रस्त झाले आहे़ काही भागात ओढे, नाले आणि नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात काढून सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या आहेत़ या आसमानी संकटांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला आहे़ या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात केली़ मागील आठवड्यातील शुक्रवारपासून हे पंचनामे सुरू करण्यात आले़ साधारणत: आठ दिवसांच्या कालावधीत सर्व पंचनामे पूर्ण झाले आहेत़अतिवृष्टी झाल्यानंतर कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ३ लाख ३८ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या ३ लाख २९ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता़ हा आकडा गृहित धरून प्रशासनाने पंचनाम्यांना सुरुवात केली़ महसूल प्रशासनातील तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी विभागातील कृषी सहाय्यक आणि पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्यात आले़ ९ नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ३ लाख ३३ हजार २८२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ प्रत्यक्षात ३ लाख २९ हजार ३२ हेक्टर एवढे क्षेत्र बाधित आहे़ प्राथमिक अंदाजानुसार बाधीत क्षेत्राचा आकडा प्रशासनाने निश्चित केला होता; परंतु, प्रत्यक्ष पंचनामे करीत असताना बाधित क्षेत्र या पेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास येत आह़े़ त्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी अजूनही पंचनाम्यात गुंतले आहेत़ दरम्यान, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे पाठविला जाणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष मदतीची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे़ त्यमुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रत्यक्ष मदतीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा४जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याला गती दिली आहे़ अपेक्षित नुकसानग्रस्त भागाचे पंचनामेही पूर्ण केले असून, त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल; परंतु, पैसा हातात येण्याच्या काळातच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे़४सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांतून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग रबी पेरण्यासाठी वापरला जाणार होता़ मात्र आता शेतकºयांच्या हातात पैसा नाही़ त्यामुळे रबीच्या पेरण्या करायच्या कशा? असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होत आहे़४ त्यामुळे आगामी काळातील आर्थिक गणिते शासनाच्या मदतीवर अवलंबून असून, शासन किती तत्परतेने शेतकºयांना मदत करते, याकडे जिल्ह्यातील लक्ष लागले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसRevenue Departmentमहसूल विभागFarmerशेतकरी