शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

परभणी : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 00:46 IST

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून, अपेक्षित क्षेत्रापेक्षाही नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात पीक पंचनामे सुरूच आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून, अपेक्षित क्षेत्रापेक्षाही नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात पीक पंचनामे सुरूच आहेत़आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील उभ्या पिकांचे आणि काढून ठेवलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते़ काही भागात अतिवृष्टीने शेत जमिनीत पाणी साचून कापसाचे पीक पिवळे पडले़ या पिकाला बोंडातून कोंब फुटू लागले़ सोयाबीनचे पीकही जागेवर मोड फुटत असल्याने नुकसानग्रस्त झाले आहे़ काही भागात ओढे, नाले आणि नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात काढून सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या आहेत़ या आसमानी संकटांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला आहे़ या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात केली़ मागील आठवड्यातील शुक्रवारपासून हे पंचनामे सुरू करण्यात आले़ साधारणत: आठ दिवसांच्या कालावधीत सर्व पंचनामे पूर्ण झाले आहेत़अतिवृष्टी झाल्यानंतर कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ३ लाख ३८ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या ३ लाख २९ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता़ हा आकडा गृहित धरून प्रशासनाने पंचनाम्यांना सुरुवात केली़ महसूल प्रशासनातील तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी विभागातील कृषी सहाय्यक आणि पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्यात आले़ ९ नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ३ लाख ३३ हजार २८२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ प्रत्यक्षात ३ लाख २९ हजार ३२ हेक्टर एवढे क्षेत्र बाधित आहे़ प्राथमिक अंदाजानुसार बाधीत क्षेत्राचा आकडा प्रशासनाने निश्चित केला होता; परंतु, प्रत्यक्ष पंचनामे करीत असताना बाधित क्षेत्र या पेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास येत आह़े़ त्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी अजूनही पंचनाम्यात गुंतले आहेत़ दरम्यान, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे पाठविला जाणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष मदतीची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे़ त्यमुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रत्यक्ष मदतीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा४जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याला गती दिली आहे़ अपेक्षित नुकसानग्रस्त भागाचे पंचनामेही पूर्ण केले असून, त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल; परंतु, पैसा हातात येण्याच्या काळातच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे़४सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांतून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग रबी पेरण्यासाठी वापरला जाणार होता़ मात्र आता शेतकºयांच्या हातात पैसा नाही़ त्यामुळे रबीच्या पेरण्या करायच्या कशा? असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होत आहे़४ त्यामुळे आगामी काळातील आर्थिक गणिते शासनाच्या मदतीवर अवलंबून असून, शासन किती तत्परतेने शेतकºयांना मदत करते, याकडे जिल्ह्यातील लक्ष लागले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसRevenue Departmentमहसूल विभागFarmerशेतकरी