शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

परभणी : ३ कोटींच्या कामाचे तुकडे पाडून दिला निविदांना छेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:31 IST

जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या ३ कोटी ८ लाख रुपयांच्या निधीतून ९८ पैकी तब्बल ९५ कामांचे तीन लाखांच्या आत तुकडे पाडून वनविभागाने शासनाच्या निविदा प्रक्रियेला छेद दिल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्तांनाच चौकशीचे आदेश दिले आहेत.

अभिमन्यू कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या ३ कोटी ८ लाख रुपयांच्या निधीतून ९८ पैकी तब्बल ९५ कामांचे तीन लाखांच्या आत तुकडे पाडून वनविभागाने शासनाच्या निविदा प्रक्रियेला छेद दिल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्तांनाच चौकशीचे आदेश दिले आहेत.जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या वतीने २०१८-१९ या वर्षात वन विभागाला मातीनाला बांध, अनगड दगडी बांध, वनतळे, खोल सलग समतपातळी चर आदी कामे करण्यासाठी ३ कोटी ८ लाख रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून निविदा काढून दर्जेदार कामे करण्याच्या अनुषंगाने वनविभागाकडून प्रयत्न होणे आवश्यक असताना चक्क शासन निर्णयाला हरताळ फासून मनमानी पद्धतीने कामे वाटप करण्याचा प्रकार घडला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षातील निधी जून २०१९ च्या प्रारंभी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाला. त्यानंतर सदरील कामांना प्रारंभ होणे आवश्यक असताना मार्च अखेरीस निधी खर्च करण्याचा खटाटोप वनविभागाने केला आहे. ८ मार्च २०१९ रोजी या संदर्भातील १ कोटी ९९ लाख ५ हजार रुपयांच्या कामास प्रशासकीय मंजुरीचा आदेश काढण्यात आला. ३ लाख रुपयांच्या पुढे काम गेल्यास त्याची निविदा काढणे बंधनकारक आहे. निविदेच्या माध्यमातून कंत्राटदारांमध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि दर्जेदार काम होईल, अशी शासनाची रास्त अपेक्षा असली तरी शासनाच्याच निर्णयाला शासनाच्याच अखत्यारित असलेल्या वनविभागाने खो दिला आहे. प्रशासकीय मंजुरी दिलेल्या ७८ कामांपैकी एकही काम तीन लाख रुपयांच्या पुढे गेलेले नाही. जास्तीत जास्त म्हणजे २ लाख ९९ हजार ३९४ रुपयांपर्यंतचे काम काढून फक्त ६०६ रुपये कमी करीत हे कामही ३ लाखांच्या बाहेर जाणार नाही, याची पुरेपुर काळजी वनविभागाने घेतली आहे. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजेच १० मार्च २०१९ रोजी आणखी एक आदेश काढून १ कोटी ८ लाख ९७ हजार रुपयांच्या कामास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही कामांमध्ये मातीनाला बांधाची तब्बल ७६ कामे असून एकूण मंजूर रक्कम ३ कोटी ८ लाखांपैकी तब्बल २ कोटी ५० लाख ७५ हजार ७८९ रुपयांची ही कामे आहेत. आता मातीनाला बांधाच्याच कामाचीच एकत्रित निविदा काढली गेली असती तर शासनाचा फायदा होऊन कंत्राटदार एकच राहिला असता आणि कामाचा दर्जा चांगला राहिला असता; परंतु, शासनापेक्षा खाजगी व्यक्तींची जास्त काळजी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वाटली आणि माताीनाला बांधाची तब्बल ७६ कामे तुकडे पाडून करण्यात आली. विशेष म्हणजे एकाच गावामध्ये अधिक कामे असतानाही तेथेही कामाचे तुकडे पाडण्याचा पायंडा या विभागाने कायम ठेवला. जिंतूर तालुक्यातील भिलज गावात मातीनाला बांधाची ११ लाख ९३ हजार २९४ रुपयांची ४ कामे वेगवेगळी करुन ती खाजगी व्यक्तींना देण्यात आली. साई इटोलीत पहिल्या आदेशात ११ लाख ७३ हजार ६०७ रुपयांची ४ तर दुसºया आदेशात ५ लाख ८७ हजार २७ रुपयांची २ अशी ६ कामे वेगवेगळी केली गेली. मोहखेडा १७ लाख ५० हजार ७५० रुपयांची वेगवेगळी सहा कामे करण्यात आली. नेमगिरी येथील खोल समतल चर, वनतळे १,२,३, अनगड दगडी बांध यांची २७ लाख २३ हजार ५२० रुपयांची ६ कामे वेगवेगळी करण्यात आली. एकाच गावाची फोड करुन काम वाटपाचा अजब फंडा वापरला गेला. जिंतूर तालुक्यात इटोली हे एकच गाव असताना साई इटोली, इटोली १, इटोली २, इटोली ३ असे विभाग करण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीforest departmentवनविभागGovernmentसरकार