शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पालम तालुक्यात बोअरवेलने जमिनीची अक्षरश: चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:53 IST

तालुक्यात मागील १५ दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात बोअर घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे जमिनीची अक्षरश: चाळणी होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यात मागील १५ दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात बोअर घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे जमिनीची अक्षरश: चाळणी होत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात यावर्षी पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना सर्वाधिक बसला आहे. खरीप व रबी या दोन्ही हंगामातील पिकांनी शेतकऱ्यांना धोका दिल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. घागरभर पाण्यासाठी रात्र-रात्र जागून काढण्याची वेळ आलेली आहे. त्याच बरोबर शेतात जनावरांना पिण्याचे पाणी, चारा व थोडीफार बागायती पिके, भाजीपाला जगविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू झालेली आहे. बहुतांश शेतकºयांकडे सिंचन विहिरी नाहीत. तर ज्यांच्याकडे सिंचन विहिरी आहेत, त्या शेतकºयांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावलेली आहे. त्यामुळे पाण्याचा शोध घेत शेतकरी बोअरवेल घेण्याकडे वळले आहेत. नवीन बोअरवेल घेतले जात आहेत. लागेल तेवढ्या पाण्याचा काटेकोर वापर केला जात आहे. बोअरवेलची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जमिनीची मात्र अक्षरश: चाळणी होत असल्याचे दिसत आहे. तालुक्यात गोदावरीचे पात्र कोरडे पडले असून इतरत्र एकही साठवण तलाव नाही. त्यामुळे शेतकºयांना पाण्यासाठी बोअरवेल घेण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध राहिलेला नाही.बोअरवेल : किमान ६० हजारांचा खर्चनवीन बोअरवेल घेण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू झालेली आहे. मशीन एजंटाच्या मागे शेतकरी पंधरा-पंधरा दिवस फिरत आहेत. एक बोअरवेल खोदण्यासाठी जेमतेम २५ ते ३० हजार रुपयांचा खर्च केला जात आहे. तसेच या बोअरवेलवर पाईप व विद्युत मोटार टाकण्यासाठी ३० हजारांचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकºयांना पाण्यासाठी पदरमोड करीत ६० हजार रुपयांचा खर्च करावा लागत असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत.अधिकाºयांनी लावली शेतकºयांची वाटदुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकºयांनी पंचायत समितीकडे ७०० प्रस्ताव दाखल केले होते. या प्रस्तावांना छाननी समितीने मंजुरी दिली होती. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी ३८० सिंचन विहिरींच्या मंजुरीसाठी पुढाकार घेतला होता. मात्र ही कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी झाली असती तर बोअरवेल घेण्याचे प्रमाण कमी झाले असते; परंतु, जनतेची सेवा करण्यासाठी शासनाने नेमलेल्या अधिकाºयांनीच शेतकºयांचा घात केला असून दुष्काळी परिस्थितीत वाट लावण्याचे काम केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई