शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परभणी : हमीभाव खरेदी केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:11 IST

जिल्ह्यातील नाफेडच्या सात हमीभाव खरेदी केंद्रावर १८ हजार १७३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी ३ हजार ३२१ शेतकºयांचीच ५५ हजार ४०१ क्विंटल तुर १८ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आली आहे़ त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १४ हजार ८५२ शेतकºयांची तूर खरेदीअभावी पडून आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील नाफेडच्या सात हमीभाव खरेदी केंद्रावर १८ हजार १७३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी ३ हजार ३२१ शेतकºयांचीच ५५ हजार ४०१ क्विंटल तुर १८ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आली आहे़ त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १४ हजार ८५२ शेतकºयांची तूर खरेदीअभावी पडून आहे़जिल्ह्यात यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे़ मात्र सुरुवातीच्या काळात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांना खाजगी बाजारपेठेत तूर विक्री करावी लागली; परंतु, व्यापाºयांनी शेतकºयांच्या तुरीची कवडीमोल दराने खरेदी सुरू केली़ त्यामुळे तूर उत्पादक अडचणीत आला़ त्यानंतर शेतकरी व काही संघटनांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर शासनाने फेब्रुवारी महिन्यात नाफेडचे सहा हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले़ तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाथरी येथे सातवे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पूर्णा आणि बोरी व पाथरीचा समावेश आहे़ या केंद्रांवर तुरीची खरेदी करण्याची गती कमी होती़ १८ एप्रिलपर्यंत हमीभावाने तूर खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले होते़ त्यानुसार जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडे १८ हजार १७३ शेतकºयांनी तूर विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली होती़ त्यापैकी १४ हजार ८५२ शेतकºयांची तूर खरेदी करणे शिल्लक आहे़ त्यातच राज्य शासनाने तूर खरेदीसाठी दिलेली मुदत १८ एप्रिल रोजी संपली आहे़ त्यामुळे उर्वरित तूर उत्पादकांची तूर खेरदी करण्यासाठी मुदत वाढून द्यावी, अशी मागणी होत आहे़अशी झाली नोंदणीतूर हमीभाव खरेदी केंद्रावर तूर उत्पादकांनी केलेली केंद्रनिहाय नोंदणी परभणी- ४०८९, जिंतूर- २९१७, गंगाखेड-३५१७, सेलू- ३०१८, पूर्णा- ८४९, बोरी-२७३२ तर नव्याने सुरू झालेल्या पाथरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर १८४ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ त्यापैकी केवळ १० शेतकºयांची तूर खरेदी झाली आहे़ उर्वरित १७४ शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत़हरभºयाला दोन केंद्रावर मुहूर्त मिळेनाराज्य शासनाने नाफेडच्या माध्यमातून जिल्ह्यातील सात हमीभाव खरेदी केंद्रावर तुरीबरोबरच हरभºयाची खरेदी करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार परभणी येथील केंद्रावर १८ शेतकºयांचा ३२६ क्विंटल, जिंतूर येथील १७ शेतकºयांचा २२७ क्विंटल, सेलू येथील २९ शेतकºयांचा ३७७ क्विंटल, पूर्णा येथील १६ शेतकºयांचा २०६ क्विंटल तर पाथरी येथील १० शेतकºयांचा १२० क्विंटल ५० किलो हरभºयाची खरेदी करण्यात आली आहे़ यासाठी राज्य शासनाने मे महिन्यापर्यंत मुदवाढ दिली आहे़जिल्ह्यातील गंगाखेड व बोरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर अद्यापपर्यंत हरभºयाची खरेदी सुरू झालेली नाही़ त्यामुळे नोंदणी केलेले हरभरा उत्पादक मुदतीअभावी अडचणीत येण्याची शक्यता आहे़ त्यामुळे हरभरा खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे़५५ हजार क्विंटल तुरीची खरेदीनाफेडकडून जिल्ह्यातील सात हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले होते़ या हमीभाव खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील १८ हजार १७३ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ राज्य शासनाने दिलेल्या १८ एप्रिलपर्यंतच्या मुदतीत केवळ ३ हजार ३२१ शेतकºयांची ५५ हजार ४०१ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली़यामध्ये परभणी केंद्रावर ३२० शेतकºयांची ५ हजार ९९१ क्विंटल, जिंतूर ७०३ शेतकºयांची १२ हजार ९, गंगाखेड ५७३ शेतकºयांची ८ हजार ७९७ क्विंटल ५० किलो, सेलू ७८१ शेतकºयांची ११ हजार ८५४ क्विंटल ५० किलो, पूर्णा ४८० शेतकºयांची ८ हजार १२५ क्विंटल, बोरी येथे ४३२ शेतकºयांची ८३२० क्विंटल तर पाथरी येथील १७ शेतकºयांची ३२३ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे़उर्वरित १४ हजार ८५२ शेतकºयांनी नोंदणी करूनही हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाकडून तुरीची खरेदी करण्यात आलेली नाही़ त्यामुळे या शेतकºयांमध्ये राज्य शासनाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे़ त्यामुळे १५ दिवसांत या शेतकºयांची तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे़शेतकरी अडचणीतहमीभाव खरेदी केंद्रावर वेळेत तुरीची खरेदी होईल अशी अपेक्षा तूर उत्पादकांना होती़ मात्र पेरणीपूर्व मशागत तोंडावर आली असताना शेतकºयांच्या घरात साठवण केलेली तूर तशीच पडून आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी