शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

परभणी : हमीभाव खरेदी केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:11 IST

जिल्ह्यातील नाफेडच्या सात हमीभाव खरेदी केंद्रावर १८ हजार १७३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी ३ हजार ३२१ शेतकºयांचीच ५५ हजार ४०१ क्विंटल तुर १८ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आली आहे़ त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १४ हजार ८५२ शेतकºयांची तूर खरेदीअभावी पडून आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील नाफेडच्या सात हमीभाव खरेदी केंद्रावर १८ हजार १७३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी ३ हजार ३२१ शेतकºयांचीच ५५ हजार ४०१ क्विंटल तुर १८ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आली आहे़ त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १४ हजार ८५२ शेतकºयांची तूर खरेदीअभावी पडून आहे़जिल्ह्यात यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे़ मात्र सुरुवातीच्या काळात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांना खाजगी बाजारपेठेत तूर विक्री करावी लागली; परंतु, व्यापाºयांनी शेतकºयांच्या तुरीची कवडीमोल दराने खरेदी सुरू केली़ त्यामुळे तूर उत्पादक अडचणीत आला़ त्यानंतर शेतकरी व काही संघटनांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर शासनाने फेब्रुवारी महिन्यात नाफेडचे सहा हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले़ तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाथरी येथे सातवे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पूर्णा आणि बोरी व पाथरीचा समावेश आहे़ या केंद्रांवर तुरीची खरेदी करण्याची गती कमी होती़ १८ एप्रिलपर्यंत हमीभावाने तूर खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले होते़ त्यानुसार जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडे १८ हजार १७३ शेतकºयांनी तूर विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली होती़ त्यापैकी १४ हजार ८५२ शेतकºयांची तूर खरेदी करणे शिल्लक आहे़ त्यातच राज्य शासनाने तूर खरेदीसाठी दिलेली मुदत १८ एप्रिल रोजी संपली आहे़ त्यामुळे उर्वरित तूर उत्पादकांची तूर खेरदी करण्यासाठी मुदत वाढून द्यावी, अशी मागणी होत आहे़अशी झाली नोंदणीतूर हमीभाव खरेदी केंद्रावर तूर उत्पादकांनी केलेली केंद्रनिहाय नोंदणी परभणी- ४०८९, जिंतूर- २९१७, गंगाखेड-३५१७, सेलू- ३०१८, पूर्णा- ८४९, बोरी-२७३२ तर नव्याने सुरू झालेल्या पाथरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर १८४ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ त्यापैकी केवळ १० शेतकºयांची तूर खरेदी झाली आहे़ उर्वरित १७४ शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत़हरभºयाला दोन केंद्रावर मुहूर्त मिळेनाराज्य शासनाने नाफेडच्या माध्यमातून जिल्ह्यातील सात हमीभाव खरेदी केंद्रावर तुरीबरोबरच हरभºयाची खरेदी करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार परभणी येथील केंद्रावर १८ शेतकºयांचा ३२६ क्विंटल, जिंतूर येथील १७ शेतकºयांचा २२७ क्विंटल, सेलू येथील २९ शेतकºयांचा ३७७ क्विंटल, पूर्णा येथील १६ शेतकºयांचा २०६ क्विंटल तर पाथरी येथील १० शेतकºयांचा १२० क्विंटल ५० किलो हरभºयाची खरेदी करण्यात आली आहे़ यासाठी राज्य शासनाने मे महिन्यापर्यंत मुदवाढ दिली आहे़जिल्ह्यातील गंगाखेड व बोरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर अद्यापपर्यंत हरभºयाची खरेदी सुरू झालेली नाही़ त्यामुळे नोंदणी केलेले हरभरा उत्पादक मुदतीअभावी अडचणीत येण्याची शक्यता आहे़ त्यामुळे हरभरा खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे़५५ हजार क्विंटल तुरीची खरेदीनाफेडकडून जिल्ह्यातील सात हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले होते़ या हमीभाव खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील १८ हजार १७३ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ राज्य शासनाने दिलेल्या १८ एप्रिलपर्यंतच्या मुदतीत केवळ ३ हजार ३२१ शेतकºयांची ५५ हजार ४०१ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली़यामध्ये परभणी केंद्रावर ३२० शेतकºयांची ५ हजार ९९१ क्विंटल, जिंतूर ७०३ शेतकºयांची १२ हजार ९, गंगाखेड ५७३ शेतकºयांची ८ हजार ७९७ क्विंटल ५० किलो, सेलू ७८१ शेतकºयांची ११ हजार ८५४ क्विंटल ५० किलो, पूर्णा ४८० शेतकºयांची ८ हजार १२५ क्विंटल, बोरी येथे ४३२ शेतकºयांची ८३२० क्विंटल तर पाथरी येथील १७ शेतकºयांची ३२३ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे़उर्वरित १४ हजार ८५२ शेतकºयांनी नोंदणी करूनही हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाकडून तुरीची खरेदी करण्यात आलेली नाही़ त्यामुळे या शेतकºयांमध्ये राज्य शासनाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे़ त्यामुळे १५ दिवसांत या शेतकºयांची तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे़शेतकरी अडचणीतहमीभाव खरेदी केंद्रावर वेळेत तुरीची खरेदी होईल अशी अपेक्षा तूर उत्पादकांना होती़ मात्र पेरणीपूर्व मशागत तोंडावर आली असताना शेतकºयांच्या घरात साठवण केलेली तूर तशीच पडून आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी