शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

परभणी : हमीभाव खरेदी केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:11 IST

जिल्ह्यातील नाफेडच्या सात हमीभाव खरेदी केंद्रावर १८ हजार १७३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी ३ हजार ३२१ शेतकºयांचीच ५५ हजार ४०१ क्विंटल तुर १८ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आली आहे़ त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १४ हजार ८५२ शेतकºयांची तूर खरेदीअभावी पडून आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील नाफेडच्या सात हमीभाव खरेदी केंद्रावर १८ हजार १७३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी ३ हजार ३२१ शेतकºयांचीच ५५ हजार ४०१ क्विंटल तुर १८ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आली आहे़ त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १४ हजार ८५२ शेतकºयांची तूर खरेदीअभावी पडून आहे़जिल्ह्यात यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे़ मात्र सुरुवातीच्या काळात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांना खाजगी बाजारपेठेत तूर विक्री करावी लागली; परंतु, व्यापाºयांनी शेतकºयांच्या तुरीची कवडीमोल दराने खरेदी सुरू केली़ त्यामुळे तूर उत्पादक अडचणीत आला़ त्यानंतर शेतकरी व काही संघटनांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर शासनाने फेब्रुवारी महिन्यात नाफेडचे सहा हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले़ तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाथरी येथे सातवे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पूर्णा आणि बोरी व पाथरीचा समावेश आहे़ या केंद्रांवर तुरीची खरेदी करण्याची गती कमी होती़ १८ एप्रिलपर्यंत हमीभावाने तूर खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले होते़ त्यानुसार जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडे १८ हजार १७३ शेतकºयांनी तूर विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली होती़ त्यापैकी १४ हजार ८५२ शेतकºयांची तूर खरेदी करणे शिल्लक आहे़ त्यातच राज्य शासनाने तूर खरेदीसाठी दिलेली मुदत १८ एप्रिल रोजी संपली आहे़ त्यामुळे उर्वरित तूर उत्पादकांची तूर खेरदी करण्यासाठी मुदत वाढून द्यावी, अशी मागणी होत आहे़अशी झाली नोंदणीतूर हमीभाव खरेदी केंद्रावर तूर उत्पादकांनी केलेली केंद्रनिहाय नोंदणी परभणी- ४०८९, जिंतूर- २९१७, गंगाखेड-३५१७, सेलू- ३०१८, पूर्णा- ८४९, बोरी-२७३२ तर नव्याने सुरू झालेल्या पाथरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर १८४ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ त्यापैकी केवळ १० शेतकºयांची तूर खरेदी झाली आहे़ उर्वरित १७४ शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत़हरभºयाला दोन केंद्रावर मुहूर्त मिळेनाराज्य शासनाने नाफेडच्या माध्यमातून जिल्ह्यातील सात हमीभाव खरेदी केंद्रावर तुरीबरोबरच हरभºयाची खरेदी करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार परभणी येथील केंद्रावर १८ शेतकºयांचा ३२६ क्विंटल, जिंतूर येथील १७ शेतकºयांचा २२७ क्विंटल, सेलू येथील २९ शेतकºयांचा ३७७ क्विंटल, पूर्णा येथील १६ शेतकºयांचा २०६ क्विंटल तर पाथरी येथील १० शेतकºयांचा १२० क्विंटल ५० किलो हरभºयाची खरेदी करण्यात आली आहे़ यासाठी राज्य शासनाने मे महिन्यापर्यंत मुदवाढ दिली आहे़जिल्ह्यातील गंगाखेड व बोरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर अद्यापपर्यंत हरभºयाची खरेदी सुरू झालेली नाही़ त्यामुळे नोंदणी केलेले हरभरा उत्पादक मुदतीअभावी अडचणीत येण्याची शक्यता आहे़ त्यामुळे हरभरा खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे़५५ हजार क्विंटल तुरीची खरेदीनाफेडकडून जिल्ह्यातील सात हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले होते़ या हमीभाव खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील १८ हजार १७३ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ राज्य शासनाने दिलेल्या १८ एप्रिलपर्यंतच्या मुदतीत केवळ ३ हजार ३२१ शेतकºयांची ५५ हजार ४०१ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली़यामध्ये परभणी केंद्रावर ३२० शेतकºयांची ५ हजार ९९१ क्विंटल, जिंतूर ७०३ शेतकºयांची १२ हजार ९, गंगाखेड ५७३ शेतकºयांची ८ हजार ७९७ क्विंटल ५० किलो, सेलू ७८१ शेतकºयांची ११ हजार ८५४ क्विंटल ५० किलो, पूर्णा ४८० शेतकºयांची ८ हजार १२५ क्विंटल, बोरी येथे ४३२ शेतकºयांची ८३२० क्विंटल तर पाथरी येथील १७ शेतकºयांची ३२३ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे़उर्वरित १४ हजार ८५२ शेतकºयांनी नोंदणी करूनही हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाकडून तुरीची खरेदी करण्यात आलेली नाही़ त्यामुळे या शेतकºयांमध्ये राज्य शासनाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे़ त्यामुळे १५ दिवसांत या शेतकºयांची तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे़शेतकरी अडचणीतहमीभाव खरेदी केंद्रावर वेळेत तुरीची खरेदी होईल अशी अपेक्षा तूर उत्पादकांना होती़ मात्र पेरणीपूर्व मशागत तोंडावर आली असताना शेतकºयांच्या घरात साठवण केलेली तूर तशीच पडून आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी