शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

परभणी : ५९ कोटींवर शेतकऱ्यांची केली बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:57 IST

गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने केवळ ५८ कोटी ८६ लाख रुयांचाच पीक विमा मंजूर केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गेल्या दोन खरीप हंगामापासून शेतकºयांच्या तोंडाला पीक विमा कंपन्या पाने पुसत असल्याचे दिसून येत आहे.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने केवळ ५८ कोटी ८६ लाख रुयांचाच पीक विमा मंजूर केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गेल्या दोन खरीप हंगामापासून शेतकºयांच्या तोंडाला पीक विमा कंपन्या पाने पुसत असल्याचे दिसून येत आहे.गतवर्षी खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकºयांनी सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग या पिकांचा विमा उतरविला होता. इफ्को टोकियो विमा कंपनीकडे ५ लाख ८२ हजार १५४ शेतकºयांनी तब्बल २८ कोटी ६८ लाख रुपयांच्या विम्याच्या हप्त्याचा भरणा केला होता. पावसाचा अनियमितपणा आणि निसर्ग साथ देत नसल्याने शेतकºयांनी विम्यावर भरोसा ठेवला होता. निसर्गाकडून फटका बसला तर विमा कंपनीकडून भरपाई मिळेल, अशी आशा शेतकºयांनाहोती.गतवर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे खरीप हंगामात शेतकºयांनी पेरणी केलेल्या पिकातून कवडीचेही उत्पन्न हाती लागले नाही. त्यामुळे उसणवारी व बँकांच्या दारात उभे राहून मिळालेल्या पैशातून केलेली पेरणी वाया गेली. त्यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची रक्कम विमा कंपन्यांकडून मिळेल आणि त्यातून वर्षाची आर्थिक घडी बसविता येईल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती.इफ्को टोकियो विमा कंपनीकडे जिल्ह्यातील ५ लाख ८२ हजार १५४ शेतकºयांनी विम्याचा हप्ता भरला होता. त्यापैकी केवळ १ लाख ६० हजार १२६ शेतकºयांना ५८ कोटी ८६ लाख रुपयांची पीक विमा रक्कम मंजूर केली आहे. जिल्ह्यातील ५६ हजार १५३ कापूस उत्पादक शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली होती. त्यापैकी केवळ २१ हजार ९४५ शेतकºयांना केवळ १२ कोटी ३२ लाख रुपयांचे वाटप केले आहेत. त्याच बरोबर ७७ हजार ९१७ शेतकºयांनी आपले तूर पीक विमा कंपनीकडे संरक्षित केले होते. त्यापैकी ६० हजार ७८ शेतकºयांना २२ कोटी ५२ लाख ७५ हजार ६७५ रुपयांचे वाटप केले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक २ लाख ४० हजार शेतकºयांनी इफ्को टोकियो या विमा कंपनीकडे आपले पीक संरक्षित केले होते, अशी माहिती कंपनीच्या विभागीय अधिकाºयांनी दिली. मात्र केवळ ४६ हजार १९९ शेतकºयांनाच १८ कोटी ६९ लाख रुपयांचे वाटप केले आहे.२०१७-१८ : मधील पीक विम्याचा प्रश्नही राहिला आधांतरीच४२०१७-१८ मधील खरीप हंगामात जिल्ह्याला १४७ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला होता. हा विमा मंजूर करताना विमा कंपनीने भेदभाव केला. गाव हा घटक गृहित धरण्याऐवजी तालुका घटक धरुन विमा मंजूर केल्याने अनेक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. हा प्रश्न राज्यभरात गाजला. विशेष म्हणजे खरीप पीक विम्यासाठी शेतकºयांनी २३ दिवस जिल्ह्यामध्ये आंदोलन केले होते.४ त्यानंतर कृषी मंत्री व मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत वंचित शेतकºयांना विमा रक्कम देण्याचे आश्वासनही शासनाने दिले होते. मुख्यमंत्री ज्या ज्या वेळी जिल्ह्याच्या दौºयावर आले. त्या त्या वेळी विमा प्रकरणात जिल्ह्यातील शेतकºयांवर अन्याय झाल्याचे बोलून दाखविले ; परंतु, वंचित राहिलेल्या ४ लाख शेतकºयांना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यामुळे शेतकºयांच्या मनात संताप आहे.४ लाख २२ हजार शेतकरी यावर्षीही वंचित४मागील दोन वर्षाच्या खरीप हंगामापासून विमा कंपन्यांकडे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विमा रकमेचा भरणा करीत आहेत. परंतु, या कंपन्या शेतकºयांना झालेल्या नुकसानीची मदत देताना मात्र पंतप्रधान विमा योजनेमधील असलेल्या अटी, नियमाचा धाक दाखवून लाभ देण्यापासून पळ काढीत आहेत. २०१७-१८, २०१८-१९ या खरीप हंगामासह रबी हंगामातीलही पीक विम्याची मदत देताना विमा कंपन्यांनी जिल्ह्यातील शेतकºयांवर अन्यायच केला आहे.४शेतकºयांवर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शेतकºयांशी संबंधित असलेल्या संघटनांचे आहे; परंतु, २०१७-१८ मधील खरीप हंगामात ४ लाख व २०१८-१९ च्या हंगामात ४ लाख २२ हजार शेतकरी विम्यापासून वंचित असतानाही लोकप्रतिनिधीं मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा