शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :समाधान शिबीर भाजपाने केले ‘हायजॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:02 IST

प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हाभरात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेले समाधान शिबीर भाजपानेच ‘हायजॅक’ केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला असून, स्थानिक लोकप्रतिनिधींना या शिबिराचे निमंत्रणही दिले गेले नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हाभरात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेले समाधान शिबीर भाजपानेच ‘हायजॅक’ केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला असून, स्थानिक लोकप्रतिनिधींना या शिबिराचे निमंत्रणही दिले गेले नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे़जिल्हाभरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशातून ग्रामीण भागात समाधान शिबीर घेण्यात येत आहे़ आॅनलाईन सातबाराचे वाटप, निराधार योजनेचा लाभ, ग्रामविकास विभागाकडून दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र, जॉबकार्डचे वाटप, मागेल त्याला शेततळे उपक्रमांतर्गत शेततळयांचे कार्यारंभ आदेश वितरण करणे आदींसाठी हे शिबीर घेण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते़ राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत बुधवारी जिंतूर व सेलू येथे हे शिबीर घेण्यात आले़ याशिवाय परभणी येथे ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या संदर्भात कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे़ बुधवारी जिंतूर, सेलूत झालेल्या समाधान शिबिरासाठी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे या अधिकाºयांसह माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, मेघना बोर्डीकर, राहुल लोणीकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी विरोधी पक्षातील स्थानिक लोकप्रतिनिधींची फारशी उपस्थिती नव्हती़ व्यासपीठावर मात्र भाजपाच्याच कार्यकर्त्यांची रेलचेल होती़ दोन्ही ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असले तरी या शिबिराच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत भाजपाचा पक्षीय अजेंडा राबविला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील सदस्यांकडून केला जात आहे़ विशेष म्हणजे या शिबिराला स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रणच देण्यात आले नसल्याचे आ़ विजय भांबळे यांनी सांगितले़ त्यामुळे या शिबिराच्या आयोजना संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत़ सर्व ठिकाणच्या शिबिरांमध्ये पाणीपुरवठा मंत्री लोणीकर हे भाजपा सरकारचेच गुणगान करीत आहेत़ यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करणे ही दुर्दैवाची बाब आहे, असेही विरोधकांचे म्हणणे आहे़ भाजपा नेत्यांनी मात्र या आरोपांचा इन्कार करीत जनहितांच्या कामांसाठी हे शिबीर घेण्यात येत असल्याचे सांगून विरोधकांनी यात राजकारण करू नये, असा सल्लाही दिला आहे़जनहितासाठी समाधान शिबीर-अभय चाटेजनतेचा फायदा व्हावा, या उद्देशातून समाधान शिबिराचे जिल्हाभरात आयोजन करण्यात आले आहे़ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी स्तरावर मर्यादा येतात़ या उलट या शासकीय योजनांची अधिक जनजागृती व्हावी, या दृष्टीकोनातून भाजपाचे पदाधिकारी काम करीत आहेत़ सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या चांगल्या कामांचा हा एक भाग आहे़ विरोधकांनी नाहक राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांनी दिली़सरकारी यंत्रणेचा भाजपाकडून गैरवापर- विजय भांबळेराज्यातील भाजपा सरकारकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे़ जिल्ह्यातही तशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे़ आपण स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही या शिबिराचे निमंत्रण दिले गेले नाही़ पक्षीय अजेंडा या शिबिराच्या माध्यमातून राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ कर्जमाफीत शेतकºयांची फसवणूक झाली़ नरेगाच्या एकाही कामाला मंजुरी देण्यात आलेली नाही़ त्यामुळे रोजगारासाठी जिंतूर तालुक्यातील जवळपास २० हजार मजूर कामासाठी बाहेरगावी गेले आहेत़ हा प्रश्न सोडविण्याकडे सत्ताधाºयांचे लक्ष नाही़ पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे़ परंतु, त्याचे एकही काम मंजूर नाही़ त्यामुळे भाजप सरकारच्या सर्वच घोषणा फसव्या आहेत, असा आरोप आ़ विजय भांबळे यांनी केला़भाजपाकडून जनतेची दिशाभूल- राम खराबेसेलू व जिंतूर येथे झालेल्या समाधान शिबिरासाठी लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आले नाही़ योजनांच्या नावाखाली भाजपाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे़ जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी लोणीकर हे भाजपाचीच महती या शिबिरातून सांगत आहेत़, ही दुर्दैवी बाब आहे़ जिल्हाधिकारी, जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकाºयांच्या उपस्थितीत पक्षीय अजेंडा राबविणे हे चुकीचे आहे़, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिंतूर विधानसभाप्रमुख तथा जि़प़तील शिवसेनेचे गटनेते राम खराबे यांनी दिली़