शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
3
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
4
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
5
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
6
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
7
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
8
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
9
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
10
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
11
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
12
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
13
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
14
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
15
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
16
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
17
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
18
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
19
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
20
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा

परभणी :समाधान शिबीर भाजपाने केले ‘हायजॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:02 IST

प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हाभरात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेले समाधान शिबीर भाजपानेच ‘हायजॅक’ केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला असून, स्थानिक लोकप्रतिनिधींना या शिबिराचे निमंत्रणही दिले गेले नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हाभरात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेले समाधान शिबीर भाजपानेच ‘हायजॅक’ केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला असून, स्थानिक लोकप्रतिनिधींना या शिबिराचे निमंत्रणही दिले गेले नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे़जिल्हाभरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशातून ग्रामीण भागात समाधान शिबीर घेण्यात येत आहे़ आॅनलाईन सातबाराचे वाटप, निराधार योजनेचा लाभ, ग्रामविकास विभागाकडून दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र, जॉबकार्डचे वाटप, मागेल त्याला शेततळे उपक्रमांतर्गत शेततळयांचे कार्यारंभ आदेश वितरण करणे आदींसाठी हे शिबीर घेण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते़ राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत बुधवारी जिंतूर व सेलू येथे हे शिबीर घेण्यात आले़ याशिवाय परभणी येथे ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या संदर्भात कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे़ बुधवारी जिंतूर, सेलूत झालेल्या समाधान शिबिरासाठी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे या अधिकाºयांसह माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, मेघना बोर्डीकर, राहुल लोणीकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी विरोधी पक्षातील स्थानिक लोकप्रतिनिधींची फारशी उपस्थिती नव्हती़ व्यासपीठावर मात्र भाजपाच्याच कार्यकर्त्यांची रेलचेल होती़ दोन्ही ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असले तरी या शिबिराच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत भाजपाचा पक्षीय अजेंडा राबविला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील सदस्यांकडून केला जात आहे़ विशेष म्हणजे या शिबिराला स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रणच देण्यात आले नसल्याचे आ़ विजय भांबळे यांनी सांगितले़ त्यामुळे या शिबिराच्या आयोजना संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत़ सर्व ठिकाणच्या शिबिरांमध्ये पाणीपुरवठा मंत्री लोणीकर हे भाजपा सरकारचेच गुणगान करीत आहेत़ यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करणे ही दुर्दैवाची बाब आहे, असेही विरोधकांचे म्हणणे आहे़ भाजपा नेत्यांनी मात्र या आरोपांचा इन्कार करीत जनहितांच्या कामांसाठी हे शिबीर घेण्यात येत असल्याचे सांगून विरोधकांनी यात राजकारण करू नये, असा सल्लाही दिला आहे़जनहितासाठी समाधान शिबीर-अभय चाटेजनतेचा फायदा व्हावा, या उद्देशातून समाधान शिबिराचे जिल्हाभरात आयोजन करण्यात आले आहे़ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी स्तरावर मर्यादा येतात़ या उलट या शासकीय योजनांची अधिक जनजागृती व्हावी, या दृष्टीकोनातून भाजपाचे पदाधिकारी काम करीत आहेत़ सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या चांगल्या कामांचा हा एक भाग आहे़ विरोधकांनी नाहक राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांनी दिली़सरकारी यंत्रणेचा भाजपाकडून गैरवापर- विजय भांबळेराज्यातील भाजपा सरकारकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे़ जिल्ह्यातही तशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे़ आपण स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही या शिबिराचे निमंत्रण दिले गेले नाही़ पक्षीय अजेंडा या शिबिराच्या माध्यमातून राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ कर्जमाफीत शेतकºयांची फसवणूक झाली़ नरेगाच्या एकाही कामाला मंजुरी देण्यात आलेली नाही़ त्यामुळे रोजगारासाठी जिंतूर तालुक्यातील जवळपास २० हजार मजूर कामासाठी बाहेरगावी गेले आहेत़ हा प्रश्न सोडविण्याकडे सत्ताधाºयांचे लक्ष नाही़ पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे़ परंतु, त्याचे एकही काम मंजूर नाही़ त्यामुळे भाजप सरकारच्या सर्वच घोषणा फसव्या आहेत, असा आरोप आ़ विजय भांबळे यांनी केला़भाजपाकडून जनतेची दिशाभूल- राम खराबेसेलू व जिंतूर येथे झालेल्या समाधान शिबिरासाठी लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आले नाही़ योजनांच्या नावाखाली भाजपाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे़ जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी लोणीकर हे भाजपाचीच महती या शिबिरातून सांगत आहेत़, ही दुर्दैवी बाब आहे़ जिल्हाधिकारी, जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकाºयांच्या उपस्थितीत पक्षीय अजेंडा राबविणे हे चुकीचे आहे़, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिंतूर विधानसभाप्रमुख तथा जि़प़तील शिवसेनेचे गटनेते राम खराबे यांनी दिली़