शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

परभणी : श्री साईबाबांचे जन्मस्थळ ही आमची अस्मिता : ग्रामसभेत मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:20 IST

श्री साईबाबा यांचे जन्मस्थळ ही आमची अस्मिता असून, तो तमाम साईभक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे़ त्यामुळे या संदर्भात कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही़ श्री सार्इंच्या जन्मस्थळ विकास आराखड्यासाठीच निधी द्या, असा सूर मंगळवारी पाथरी येथील ग्रामसभेत उमटला़ यावेळी जिल्हाभरातील भाविक उपस्थित होते़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : श्री साईबाबा यांचे जन्मस्थळ ही आमची अस्मिता असून, तो तमाम साईभक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे़ त्यामुळे या संदर्भात कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही़ श्री सार्इंच्या जन्मस्थळ विकास आराखड्यासाठीच निधी द्या, असा सूर मंगळवारी पाथरी येथील ग्रामसभेत उमटला़ यावेळी जिल्हाभरातील भाविक उपस्थित होते़श्री साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळ विकास आराखड्यास शिर्डीकरांनी विरोध दर्शविला आहे़ या अनुषंगाने सोमवारी शिर्डीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पाथरीला तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा भाग म्हणून निधी देणार असल्याचे सांगितले़ पाथरीकरांना ही भूमिका मान्य नाही़ या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मंगळवारी पाथरी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते़ श्री सार्इंच्या महाआरतीनंतर झालेल्या ग्रामसभेस संस्थाचे अध्यक्ष सीताराम धानू, विश्वस्त संजय भुसारी, अ‍ॅड़ अतुल चौधरी, खा़ संजय जाधव, आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ सुरेश वरपूडकर, माजी आ़ मोहन फड, माजी आ़ माणिकराव आंबेगावकर, माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, जि़प़ सभापती मीराताई टेंगसे, माजी नगराध्यक्ष मुंजाजी भाले पाटील, माजी जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते, बाजार समिती सभापती अनिल नखाते, माजी जि़प़सभापती दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्राणी, नगरसेवक राजीव पामे, माणिकआप्पा घुंबरे आदींची उपस्थिती होती़यावेळी बोलताना संस्थानचे विश्वस्त आ़ बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, साई जन्मभूमी म्हणून शासनाकडे आराखडा दाखल झाला असून, त्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे़ एखाद्या मुद्यावरून वाद असेल तर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे़ मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही चर्चेसाठी बोलवावे़ त्यानंतरच निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले़ आ़ सुरेश वरपूडकर म्हणाले की, साईबाबा जन्मस्थळाच्या विकासासाठीच आम्ही निधी मागितला आहे़ मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली आहे़ शिर्डीकरांकडून विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जन्मभूमीचा वाद बाजुला ठेवू, असे सांगितले आहे; परंतु, आम्ही निर्णयावर ठाम आहोत़ त्यामुळे मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदारांना सोबत घेवून मुख्यमंत्र्यांपुढे बाजू मांडू, असे ते म्हणाले़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांनीही पाथरी हे श्री सार्इंचे जन्मस्थळ आहे व श्री सार्इंचे जन्मस्थळ हीच आमची अस्मिता आहे़ त्यामुळे आम्ही निर्णयावर ठाम आहोत़ यावेळी बोलताना खा़ बंडू जाधव म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळी सातत्याने मराठवाड्याविषयी आकस बाळगतात़ जायकवाडीचे पाणी देण्यावरून विरोध होतो़ आता साई जन्मभूमीवरून विरोध केला जातो़ त्यांचा विरोध अत्यंत चुकीचा आहे़ तुमच्याकडे जन्मभूमीचे पुरावे असतील तर द्या, अन्यथा आमचे पुरावे स्वीकारा़ मुख्यमंत्री आमची भूमिका ऐकून घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाहीत़ त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर भूमिका मांडणार आहोत़ या संदर्भात पुरातत्व खात्याकडून माहिती घ्या़ शासन स्तरावर समिती नियुक्त करा, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली़ या बैठकीत पाथरीच श्री सार्इंची जन्मभूमी आहे, असा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला़

टॅग्स :parabhaniपरभणीsaibabaसाईबाबा