शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

परभणी : ‘पीक कर्ज वाटपाची गती बँकांनी वाढवावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:26 IST

यावर्षीचा खरीप हंगाम संपत आला असला तरी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडून ४५ हजार शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जवळपास ५ लाख शेतकरी अद्यापही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीचा खरीप हंगाम संपत आला असला तरी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडून ४५ हजार शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जवळपास ५ लाख शेतकरी अद्यापही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.२०१८- १९ च्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खाजगी, जिल्हा मध्यवर्ती बँक व ग्रामीण बँकेने आतापर्यंत ६७ हजार शेतकºयांना ३५० कोटींच्या जवळपास पीककर्ज वाटप केले होते. ज्याची टक्केवारी २३.१५ टक्के होती; परंतु, २०१९-२० हा खरीप हंगाम जवळपास संपत आलेला आहे.रब्बी हंगामाची चाहूल लागलेली आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; परंतु, अद्यापपर्यंत केवळ ५० हजार शेतकºयांना २३० कोटी १३ लाख रुपयांच्या जवळपास पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ज्याची टक्केवारी १६ टक्के एवढी आहे.त्यामुळे मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाºया शेतकºयांनी खरीप हंगामातील पेरणीही उसणवारी करुन पूर्ण केली आहे. उसणवारी केलेले पैसे परतफेडीसाठी शेतकºयांकडे सध्या पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकºयांना सध्या पैशाची नितांत आवश्यकता आहे; परंतु, पीक कर्ज वाटप करताना कर्जमाफीचाही मोठा अडथळा निर्माण होत असल्याने बँकांकडून पीक कर्ज वाटप करण्याची गती खरीप हंगाम संपत आला तरी अद्याप वाढलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पीक कर्ज वाटपाची गती वाढवून शेतकºयांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज