शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

परभणी : वंचितांच्या हक्कासाठी बहुजन आघाडी-प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:11 IST

समाजातील वंचित घटकातील नागरिकांच्या प्रश्नांकडे आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्ता हीच गुरुकिल्ली आहे. त्यामुळे वंचितांचा वंचितपणा संपविण्यासाठी बहुजन वंचित आघाडी स्थापन केली असून या आघाडीची एकजुट दाखवून द्यावी, असे आवाहन बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : समाजातील वंचित घटकातील नागरिकांच्या प्रश्नांकडे आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्ता हीच गुरुकिल्ली आहे. त्यामुळे वंचितांचा वंचितपणा संपविण्यासाठी बहुजन वंचित आघाडी स्थापन केली असून या आघाडीची एकजुट दाखवून द्यावी, असे आवाहन बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सोमवारी आयोजित मातंग समाज सत्ता संपादन परिषदेत अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी लालसेनेचे कॉ.गणपत भिसे तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित आघाडीचे नाशिक, अहमदनगर, परभणी जिल्हा प्रभारी प्रा.किशन चव्हाण, उस्मानाबाद येथील जोशीलाल लोमटे, बीड येथील राजेश क्षीरसागर, लालसेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, मुंबई प्रदेशाध्यक्ष बालाजी घुमारे, कबीरानंंद, धम्मसंगीनी, कॉ.अशोक उफाडे, डॉ.प्रवीण कनकुटे, देविदास खरात, अंबादास कांबळे, रमेश नेटारे, ज्ञानेश्वर जाधव आदींची उपस्थिती होती.प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाने देशाचा तमाशा केला आहे आणि आरएसएसच्या इशाºयावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष नाचत आहेत. त्यामुळे देशातील वंचित घटकांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठीच बहुजन वंचित आघाडीची स्थापना झाली आहे. सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आता आम्ही मागणे सोडले असून आम्ही देणारे झालो आहोत. मी सत्ताधारी होणार, ही मानसिकता प्रत्येकामध्ये झाली पाहिजे.वंचित घटकातील व्यक्ती ही सत्तेच्या खुर्चीत बसला पाहिजे. हा बदलच परिवर्तनाची नांदी ठरेल. त्यामुळे आधी स्वत:ची मानसिकता बदला आणि मी सत्ताधारी होणार, अशी खूण गाठ बांधा. देशातील आरक्षण संपविण्याचा प्रयत्न होत आहे. नोकर भरती बंद करुन कंत्राटी पद्धत अवलंबिली जात आहे. देशामध्ये स्पष्टपणे बोलण्याचेही स्वातंत्र्य राहिले नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी सत्ता हातात घेणे आवश्यक आहे. सत्तेतूनच आपले व इतरांचे दु:ख निरसण करायचे आहे. तेव्हा बहुजन वंचित आघाडीने दिलेला उमेदवार कोणताही असो, त्याला मत द्यायचे, अशी खूणगाठ बांधा. समाजातील वंचितपणा संपविण्यासाठी एकत्र या, असे आवाहन अ‍ॅड.आंबेडकर यांनी केले.कॉ.गणपत भिसे यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, राजकीय पक्षांनी मातंग समाजाचा केवळ वापर करुन घेतला. त्यामुळे समाजाचे प्रश्न जैसे थे आहेत. या उलट सर्वच पक्षांकडून मातंग समाजावर अन्याय अत्याचार होत असून बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली राजकीय भूमिका योग्य असल्यानेच समाजाने बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानाची सत्ता केवळ बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातूनच मिळणार आहे.कुठल्याही राजकीय लालसेने आम्ही त्यांच्या सोबत नसून सत्ता पदांवर लायक माणसे बसावीत, या उद्देशानेच आम्ही बहुजन वंचित आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून सामाजिक संरक्षणही मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अशोक उफाडे यांनी सूत्रसंचालन केले.उत्तम गोरे यांनी आभार मानले. मेळाव्यास परभणी जिल्ह्यातून बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर