शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

परभणी : अधिकाऱ्यांच्या टेबलावर फेकली खराब फळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:19 IST

येथील जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर नुकसानग्रस्त फळे टाकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर नुकसानग्रस्त फळे टाकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले आहे़१ फेब्रुवारी रोजी रात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह पाऊस झाला़ या पावसामुळे संत्रा या फळपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे़ नुकसानी संदर्भात शेतकºयांनी २ फेब्रुवारी रोजी तक्रारीही दाखल केल्या आहेत़ विशेष म्हणजे बहुतांश शेतकºयांनी पीक विमा भरला असून, अद्याप शेतकºयांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही़ परभणी तालुक्यातील जांब, मांडाखळी या दोन गावांमध्ये नुकसानीचा आकडा अधिक आहे़ तसेच गंगाखेड, सोनपेठ, पालम या तालुक्यातही अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे़ तेव्हा या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे़हीच मागणी कृषी विभागाच्या अधिकाºयांकडे मांडण्यासाठी संघटनेचे किशोर ढगे, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लोडे, केशव आरमळ, उस्मान पठाण आदी कार्यकर्ते कृषी विभागात दाखल झाले; परंतु, त्यावेळी कृषी अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांना त्यांचे म्हणणे मांडता आले नाही़ त्यामुळे खराब झालेले संत्रे या कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाºयांच्या टेबलवर टाकून रोष व्यक्त केला़ दरम्यान, फळपिकांचे पंचनामे तातडीने न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfruitsफळेagitationआंदोलनagricultureशेती