शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

परभणी: मनपाच्या २४ लाखांच्या प्रस्तावास दिली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:01 IST

चालू वर्षातील टंचाई कालावधीत उपाययोजना करण्यासाठी परभणी महानगरपालिकेच्या २३ लाख ७५ हजार रुपयांच्या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चालू वर्षातील टंचाई कालावधीत उपाययोजना करण्यासाठी परभणी महानगरपालिकेच्या २३ लाख ७५ हजार रुपयांच्या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आले.परभणी महानगरपालिकेने २०१८-१९ या वर्षातील पाणीटंचाई कालावधीत कामे करण्यासाठीचा प्रस्ताव औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. सदर प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे सादर केला. त्यामध्ये विहिरीतील गाळ काढणे, खोलीकरण आणि त्या अनुषंगिक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंजुरी दिली आहे. ही मंजुरी देत असताना मनपासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये या प्रस्तावांच्या खर्चाच्या ९० टक्के म्हणजेच २० लाख ४७ हजार रुपयांचे अनुदान शासन देणार असून उर्वरित १० टक्के म्हणजेच २ लाख २८ हजार रुपयांची रक्कम मनपाला लोकवर्गणीतून भरावयाची आहे. ही रक्कम मनपाने विभागीय आयुक्तामार्फत खर्ची टाकल्यानंतरच पूर्ण रक्कम शासन वितरित करणार आहे. या संदर्भातील कामांची निविदा प्रक्रिया २९ मे पर्यंत पूर्ण करुन कार्यादेश देणे आवश्यक आहे. २९ मे पर्यंत याबाबतची कारवाई पूर्ण न झाल्यास योजनेची मान्यता रद्द समजण्यात येईल, असेही या संदर्भातील आदेशात नमूद केले आहे. पाणीपुरवठा योजनेची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करुन पाणीपुरवठा सुरु होणे आवश्यक असून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी याबाबतचा प्रगती अहवाल शासनास सादर करावा, असेही या आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ