शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

परभणी: मनपाच्या २४ लाखांच्या प्रस्तावास दिली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:01 IST

चालू वर्षातील टंचाई कालावधीत उपाययोजना करण्यासाठी परभणी महानगरपालिकेच्या २३ लाख ७५ हजार रुपयांच्या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चालू वर्षातील टंचाई कालावधीत उपाययोजना करण्यासाठी परभणी महानगरपालिकेच्या २३ लाख ७५ हजार रुपयांच्या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आले.परभणी महानगरपालिकेने २०१८-१९ या वर्षातील पाणीटंचाई कालावधीत कामे करण्यासाठीचा प्रस्ताव औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. सदर प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे सादर केला. त्यामध्ये विहिरीतील गाळ काढणे, खोलीकरण आणि त्या अनुषंगिक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंजुरी दिली आहे. ही मंजुरी देत असताना मनपासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये या प्रस्तावांच्या खर्चाच्या ९० टक्के म्हणजेच २० लाख ४७ हजार रुपयांचे अनुदान शासन देणार असून उर्वरित १० टक्के म्हणजेच २ लाख २८ हजार रुपयांची रक्कम मनपाला लोकवर्गणीतून भरावयाची आहे. ही रक्कम मनपाने विभागीय आयुक्तामार्फत खर्ची टाकल्यानंतरच पूर्ण रक्कम शासन वितरित करणार आहे. या संदर्भातील कामांची निविदा प्रक्रिया २९ मे पर्यंत पूर्ण करुन कार्यादेश देणे आवश्यक आहे. २९ मे पर्यंत याबाबतची कारवाई पूर्ण न झाल्यास योजनेची मान्यता रद्द समजण्यात येईल, असेही या संदर्भातील आदेशात नमूद केले आहे. पाणीपुरवठा योजनेची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करुन पाणीपुरवठा सुरु होणे आवश्यक असून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी याबाबतचा प्रगती अहवाल शासनास सादर करावा, असेही या आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ