शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: मनपाच्या २४ लाखांच्या प्रस्तावास दिली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:01 IST

चालू वर्षातील टंचाई कालावधीत उपाययोजना करण्यासाठी परभणी महानगरपालिकेच्या २३ लाख ७५ हजार रुपयांच्या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चालू वर्षातील टंचाई कालावधीत उपाययोजना करण्यासाठी परभणी महानगरपालिकेच्या २३ लाख ७५ हजार रुपयांच्या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आले.परभणी महानगरपालिकेने २०१८-१९ या वर्षातील पाणीटंचाई कालावधीत कामे करण्यासाठीचा प्रस्ताव औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. सदर प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे सादर केला. त्यामध्ये विहिरीतील गाळ काढणे, खोलीकरण आणि त्या अनुषंगिक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंजुरी दिली आहे. ही मंजुरी देत असताना मनपासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये या प्रस्तावांच्या खर्चाच्या ९० टक्के म्हणजेच २० लाख ४७ हजार रुपयांचे अनुदान शासन देणार असून उर्वरित १० टक्के म्हणजेच २ लाख २८ हजार रुपयांची रक्कम मनपाला लोकवर्गणीतून भरावयाची आहे. ही रक्कम मनपाने विभागीय आयुक्तामार्फत खर्ची टाकल्यानंतरच पूर्ण रक्कम शासन वितरित करणार आहे. या संदर्भातील कामांची निविदा प्रक्रिया २९ मे पर्यंत पूर्ण करुन कार्यादेश देणे आवश्यक आहे. २९ मे पर्यंत याबाबतची कारवाई पूर्ण न झाल्यास योजनेची मान्यता रद्द समजण्यात येईल, असेही या संदर्भातील आदेशात नमूद केले आहे. पाणीपुरवठा योजनेची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करुन पाणीपुरवठा सुरु होणे आवश्यक असून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी याबाबतचा प्रगती अहवाल शासनास सादर करावा, असेही या आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ