शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

परभणी : दहावी, बारावी परीक्षेसाठी चुकीच्या पद्धतीने पर्यवेक्षकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:53 IST

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीने चुकीच्या पद्धतीने पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून एका तालुक्यातील शिक्षकास तालुका सोडून दूर अंतरावरील शाळेत पर्यवेक्षकाची नियुक्ती दिल्याने संताप व्यक्त होत आहे. याविरुद्ध १८ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे समन्वयक माजी आ.विजय गव्हाणे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दहावी आणि बारावी परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीने चुकीच्या पद्धतीने पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून एका तालुक्यातील शिक्षकास तालुका सोडून दूर अंतरावरील शाळेत पर्यवेक्षकाची नियुक्ती दिल्याने संताप व्यक्त होत आहे. याविरुद्ध १८ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे समन्वयक माजी आ.विजय गव्हाणे यांनी दिली.दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीने पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या करताना शिक्षक, मुख्याध्यापकांसह संस्थाचालकांवर अविश्वास दाखविण्यात आला. परभणी तालुक्यातील शाळांमधील सर्वच शिक्षकांना दुसऱ्या तालुक्यातील दूर अंतरावरील शाळेत पर्यवेक्षणाची जबाबदारी दिली आहे. तसेच शिक्षण संस्थेमधील सर्वच्या सर्व शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती दिली. त्यामुळे परीक्षेच्या काळामध्ये शाळा चालवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शैक्षणिक कामकाज ठप्प होणार आहे. याशिवाय महिला शिक्षकांना पर्यवेक्षणासाठी जाणे जिकिरीचे होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेणेही शक्य होणार नाही. याविरुद्ध १८ फेब्रुवारी रोजी शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक तीव्र धरणे आंदोलन करणार आहेत. तसेच सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर येतील, असेही माजी आ. गव्हाणे यांनी सांगितले. या प्रश्नी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनावर उदय देशमुख, बळवंत खळीकर, रामकिशन रौंदळे, प्रा.अरुणकुमार लेमाडे, प्रा. विजय घोडके, निसार पटेल, डी.सी.डुकरे, शेख सगीर, महेश पाटील, गजानन जुंबडे, नंदकिशोर साळवे, सुभाष चव्हाण, मुजाहेद अली, पठाण रहीम खान, मा.मा. सुर्वे, ए.यु. कुलकर्णी, अनंत पांडे, गणेश शिंदे आदींची नावे आहेत.४बारावी परीक्षेचे पर्यवेक्षणाचे कार्य मूळ आस्थापनावर द्यावे, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने केली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी हे इतर महाविद्यालयातील असतात. तसेच पर्यवेक्षणाचे कार्य संपल्याबरोबर उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे कार्य करावे लागते. हे काम वेळेवर झाले नाही तर निकाल वेळेवर लागणार नाहीत. शिवाय तालुक्यांतील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. ही बाब लक्षात घेता राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे परभणी जिल्ह्यातही मूळ आस्थापनेवर नियुक्ती द्यावी, अशी मागणी जुक्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय घोडके, सरचिटणीस अरुणकुमार लेमाडे आदींनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीexamपरीक्षा