शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
2
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
3
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
4
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
7
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
8
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
9
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
10
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
11
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
12
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
13
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
14
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
15
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
16
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
17
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
18
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
19
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ

परभणी :...अखेर कालव्याचे पाणी केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:02 IST

शेतीसाठी करपरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुलावरील नादुरुस्तीमुळे वाया जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालव्याचे पाणी बंद केले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): शेतीसाठी करपरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुलावरील नादुरुस्तीमुळे वाया जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालव्याचे पाणी बंद केले आहे़करपरा धरणातील पाणी शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी वापरता यावे, यासाठी कालव्याद्वारे सोडण्यात आले होते; परंतु, कालव्यावर असलेल्या पुलांची पाटबंधारे विभागाने दुरुस्ती केली नव्हती़ त्यामुळे १५ दिवसांपूर्वी पाणी सोडूनही २४ किमी पैकी केवळ १० किमी पर्यंतच पाणी पोहचले़ त्यामुळे शेतकºयांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला़ याबाबत ‘लोकमत’ने १२ नोव्हेंबर रोजीच्या अंकात ‘९० टक्के पाण्याची नासाडी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेत पाटबंधारे उपविभागाचे अभियंता बी़बी़ तोटावार यांनी कालव्याला सोडण्यात आलेले पाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे आता पुलांची दुरुस्ती होवून शेतकºयांना चार ते पाच दिवसानंतर पाणी मिळणार आहे़ त्यामुळे शेतकºयांनी सहकार्य करावे, असे आवाहन बी़बी़ तोटावार यांनी केले आहे़विशेष म्हणजे दुष्काळी परिस्थिती असल्याने मंत्रालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत पाणी प्रश्नावर तातडीच्या बैठका घेऊन नियोजन केले जात आहे़; परंतु, उपलब्ध पाण्याची नासाडी झाल्यामुळे करपरा धरणाच्या कालव्यावरील लाभक्षेत्रातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ या पुढे पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़‘दोषींवर कार्यवाही करा’४कालव्यावरील पुलांची दुरुस्ती न करताच करपरा धरणातील पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे जिंतूर तालुक्यातील निवळी ते वर्णा दरम्यान असलेल्या चार पुलांवरून ९० टक्के पाण्याची नासाडी झाली़ दुष्काळी परिस्थितीत पाण्याची नासाडी करणाºया शाखा अभियंत्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प