शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

परभणी :...अखेर कालव्याचे पाणी केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:02 IST

शेतीसाठी करपरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुलावरील नादुरुस्तीमुळे वाया जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालव्याचे पाणी बंद केले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): शेतीसाठी करपरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुलावरील नादुरुस्तीमुळे वाया जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालव्याचे पाणी बंद केले आहे़करपरा धरणातील पाणी शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी वापरता यावे, यासाठी कालव्याद्वारे सोडण्यात आले होते; परंतु, कालव्यावर असलेल्या पुलांची पाटबंधारे विभागाने दुरुस्ती केली नव्हती़ त्यामुळे १५ दिवसांपूर्वी पाणी सोडूनही २४ किमी पैकी केवळ १० किमी पर्यंतच पाणी पोहचले़ त्यामुळे शेतकºयांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला़ याबाबत ‘लोकमत’ने १२ नोव्हेंबर रोजीच्या अंकात ‘९० टक्के पाण्याची नासाडी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेत पाटबंधारे उपविभागाचे अभियंता बी़बी़ तोटावार यांनी कालव्याला सोडण्यात आलेले पाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे आता पुलांची दुरुस्ती होवून शेतकºयांना चार ते पाच दिवसानंतर पाणी मिळणार आहे़ त्यामुळे शेतकºयांनी सहकार्य करावे, असे आवाहन बी़बी़ तोटावार यांनी केले आहे़विशेष म्हणजे दुष्काळी परिस्थिती असल्याने मंत्रालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत पाणी प्रश्नावर तातडीच्या बैठका घेऊन नियोजन केले जात आहे़; परंतु, उपलब्ध पाण्याची नासाडी झाल्यामुळे करपरा धरणाच्या कालव्यावरील लाभक्षेत्रातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ या पुढे पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़‘दोषींवर कार्यवाही करा’४कालव्यावरील पुलांची दुरुस्ती न करताच करपरा धरणातील पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे जिंतूर तालुक्यातील निवळी ते वर्णा दरम्यान असलेल्या चार पुलांवरून ९० टक्के पाण्याची नासाडी झाली़ दुष्काळी परिस्थितीत पाण्याची नासाडी करणाºया शाखा अभियंत्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प