शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

परभणी : वृक्षारोपणासह संगोपनासाठी गाव घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:49 IST

सातत्याने निर्माण होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी आता पर्यावरण पूरक कामांवर भर दिला जात असून या तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले पार्डी हे गाव फक्त वृक्षारोपण करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने दत्तक घेतले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या गावात हिरवळ फुलण्याची आशा निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): सातत्याने निर्माण होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी आता पर्यावरण पूरक कामांवर भर दिला जात असून या तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले पार्डी हे गाव फक्त वृक्षारोपण करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने दत्तक घेतले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या गावात हिरवळ फुलण्याची आशा निर्माण झाली आहे.ऊसतोड मजुरांचे गाव म्हणून पार्डी या गावाची ओळख आहे. परिसरामध्ये वृक्षांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे दुष्काळाचा सर्वाधिक फटका या गावाला बसतो. याच गावात पर्यावरण पूरक कामे हाती घेण्याच्या उद्देशाने श्री तुळजाभवानी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. त्यातूनच हे गाव दत्तक घेतले असून गावात केवळ वृक्ष लागवड करणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता किमान दोन वर्षे देखभाल करुन ही झाडे जोपासण्याचा निर्णय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.वृक्षारोपणासाठी गाव दत्तक घेतल्यानंतर सेलू शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी श्रमदानासाठी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून या गावात वृक्षारोपण केले जाणाार आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, तुळजाभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद काष्टे, बचपन बचाव अभियानचे प्रमुख अ‍ॅड. कुमार महाजन, शशिकांत पाटील, सरपंच माऊली राठोड, रामेश्वर शेरे, शंकर चाकोते, उत्तम डोंबे, गजानन राऊत, राम मैफळ, रुपनर आदींनी गावाला भेट देऊन वृक्ष लागवडी संदर्भात पाहणी केली.गावातील रस्त्याच्या दुतर्फा, गायरान जमीन, स्मशानभूमी, शेतकºयांच्या बांधावर अशी साडेतीन हजारहून अधिक झाडे लावली जाणार आहेत.ही झाडे जगविण्याचा कृती आराखडा तयार केला असून माती परिक्षण करुनच योग्य त्या झाडांची लागवड केली जाणार आहे. तसेच विविध कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकºयांना पीक लागवडी संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे, असे पदाधिकाºयांनी सांगितले.संरक्षक जाळ्या बसविणार४पार्डी गावाच्या माळरानावर लागवड केलेल्या झाडांना ठिबक सिंचनाच्या सहाय्याने पाणी देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी झाडांना संरक्षित जाळ्या बसविल्या जाणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाºयांनी दिली.४पावसाळ्यापूर्वी बैठक घेऊन वृक्षारोपण व इतर अनुषंगिक बाबींचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी सेलू शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांचीही मदत घेतली जाणार असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळ