शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

परभणी : वृक्षारोपणासह संगोपनासाठी गाव घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:49 IST

सातत्याने निर्माण होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी आता पर्यावरण पूरक कामांवर भर दिला जात असून या तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले पार्डी हे गाव फक्त वृक्षारोपण करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने दत्तक घेतले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या गावात हिरवळ फुलण्याची आशा निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): सातत्याने निर्माण होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी आता पर्यावरण पूरक कामांवर भर दिला जात असून या तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले पार्डी हे गाव फक्त वृक्षारोपण करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने दत्तक घेतले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या गावात हिरवळ फुलण्याची आशा निर्माण झाली आहे.ऊसतोड मजुरांचे गाव म्हणून पार्डी या गावाची ओळख आहे. परिसरामध्ये वृक्षांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे दुष्काळाचा सर्वाधिक फटका या गावाला बसतो. याच गावात पर्यावरण पूरक कामे हाती घेण्याच्या उद्देशाने श्री तुळजाभवानी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. त्यातूनच हे गाव दत्तक घेतले असून गावात केवळ वृक्ष लागवड करणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता किमान दोन वर्षे देखभाल करुन ही झाडे जोपासण्याचा निर्णय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.वृक्षारोपणासाठी गाव दत्तक घेतल्यानंतर सेलू शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी श्रमदानासाठी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून या गावात वृक्षारोपण केले जाणाार आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, तुळजाभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद काष्टे, बचपन बचाव अभियानचे प्रमुख अ‍ॅड. कुमार महाजन, शशिकांत पाटील, सरपंच माऊली राठोड, रामेश्वर शेरे, शंकर चाकोते, उत्तम डोंबे, गजानन राऊत, राम मैफळ, रुपनर आदींनी गावाला भेट देऊन वृक्ष लागवडी संदर्भात पाहणी केली.गावातील रस्त्याच्या दुतर्फा, गायरान जमीन, स्मशानभूमी, शेतकºयांच्या बांधावर अशी साडेतीन हजारहून अधिक झाडे लावली जाणार आहेत.ही झाडे जगविण्याचा कृती आराखडा तयार केला असून माती परिक्षण करुनच योग्य त्या झाडांची लागवड केली जाणार आहे. तसेच विविध कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकºयांना पीक लागवडी संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे, असे पदाधिकाºयांनी सांगितले.संरक्षक जाळ्या बसविणार४पार्डी गावाच्या माळरानावर लागवड केलेल्या झाडांना ठिबक सिंचनाच्या सहाय्याने पाणी देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी झाडांना संरक्षित जाळ्या बसविल्या जाणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाºयांनी दिली.४पावसाळ्यापूर्वी बैठक घेऊन वृक्षारोपण व इतर अनुषंगिक बाबींचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी सेलू शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांचीही मदत घेतली जाणार असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळ