शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

परभणी : परिस्थितीशी झुंज देत ‘बिºहाड’ची निर्र्मिती-अशोक पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:48 IST

बसस्थानकावर झोपून मिळेल ते अन्न खावून ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. या कादंबरीला महाराष्टÑ साहित्य अकादमीसह ४३ पुरस्कार मिळाले. मात्र जन्मगावी २६ वर्षात कोणी बोलविले नाही. या अनोख्या भेटीसाठी प्रेस क्लबने पुढाकार घेतल्याने २६ वर्षानंतर मातीशी संवाद साधता आला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व बिºहाडकार अशोक पवार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : बसस्थानकावर झोपून मिळेल ते अन्न खावून ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. या कादंबरीला महाराष्टÑ साहित्य अकादमीसह ४३ पुरस्कार मिळाले. मात्र जन्मगावी २६ वर्षात कोणी बोलविले नाही. या अनोख्या भेटीसाठी प्रेस क्लबने पुढाकार घेतल्याने २६ वर्षानंतर मातीशी संवाद साधता आला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व बिºहाडकार अशोक पवार यांनी केले.जिंतूर येथे तालुका प्रेस क्लबच्या वतीने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. सुभाष राठी, पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, विजय खिस्ते, खंडेराव आघाव, सत्यनारायण शर्मा, परमेश्वर काकडे, डॉ. दुर्गादास कान्हडकर, रमण तोष्णीवाल, प्रा. श्रीधर भोंबे, श्रीनिवास तोष्णीवाल, देवेंद्र भूरे, प्रा. दिनेश सन्यासी आदींची उपस्थिती होती.बिºहाडकार अशोक पवार यांचा जन्म तालुक्यातील येनोली या गावी एका पालामध्ये झाला. वडील दगड फोडण्याचे काम करीत असत. या कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, घरात आठराविश्व दारिद्रय असल्याने शिक्षण घेणे शक्य नव्हते. चौथी वर्गाची परीक्षा केवळ चार दिवस शाळेत जाऊन दिली. राहण्याचे ठिकाण निश्चित नसल्याने दहावी कसाबसा पास झालो. घरून शिक्षणासाठी विरोध, तरीही पालात राहून लोकांकडून भीक मागून वेळप्रसंगी हॉटेलातील उष्टे खावून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणाठी परभणीला गेलो, राहण्याचे ठिकाण नसल्याने उपाशी पोटी आठ दिवस बसस्थानकामध्ये झोपलो. पुढे चंद्रपूर गाठले. तेथे वास्तविक जीवनावर ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. तिला साहित्य अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कारांसह ४३ पुरस्कार मिळाले. इतर ५ साहित्यकृती लिहिल्या; परंतु, जन्मभूमी व कर्मभूमीत येता आले नाही. २६ वर्षांनी हा योग प्रेस क्लबने आणून दिल्याने गहिवरून आले आहे. ही भेट माझ्या जीवनातील पुरस्कारापेक्षा मोठी आहे, असे ते म्हणाले.या कार्यक्रमात अशोक पवार यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाबरोबरच ‘जोगवा’ही शब्द सुरांची मैफल आयोजित करण्यात आली होती. ‘जोगवा माघाया आलो तुझ्या दारी, जोगवा दे जोगवा दे’ या गिताने कार्यक्रमाची सांगता झाली. विजय चोरडिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. राहुल वाव्हुळे यांनी प्रास्ताविक तर मंचक देशमुख यांंनी आभार मानले.

टॅग्स :parabhaniपरभणी