शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : परिस्थितीशी झुंज देत ‘बिºहाड’ची निर्र्मिती-अशोक पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:48 IST

बसस्थानकावर झोपून मिळेल ते अन्न खावून ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. या कादंबरीला महाराष्टÑ साहित्य अकादमीसह ४३ पुरस्कार मिळाले. मात्र जन्मगावी २६ वर्षात कोणी बोलविले नाही. या अनोख्या भेटीसाठी प्रेस क्लबने पुढाकार घेतल्याने २६ वर्षानंतर मातीशी संवाद साधता आला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व बिºहाडकार अशोक पवार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : बसस्थानकावर झोपून मिळेल ते अन्न खावून ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. या कादंबरीला महाराष्टÑ साहित्य अकादमीसह ४३ पुरस्कार मिळाले. मात्र जन्मगावी २६ वर्षात कोणी बोलविले नाही. या अनोख्या भेटीसाठी प्रेस क्लबने पुढाकार घेतल्याने २६ वर्षानंतर मातीशी संवाद साधता आला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व बिºहाडकार अशोक पवार यांनी केले.जिंतूर येथे तालुका प्रेस क्लबच्या वतीने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. सुभाष राठी, पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, विजय खिस्ते, खंडेराव आघाव, सत्यनारायण शर्मा, परमेश्वर काकडे, डॉ. दुर्गादास कान्हडकर, रमण तोष्णीवाल, प्रा. श्रीधर भोंबे, श्रीनिवास तोष्णीवाल, देवेंद्र भूरे, प्रा. दिनेश सन्यासी आदींची उपस्थिती होती.बिºहाडकार अशोक पवार यांचा जन्म तालुक्यातील येनोली या गावी एका पालामध्ये झाला. वडील दगड फोडण्याचे काम करीत असत. या कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, घरात आठराविश्व दारिद्रय असल्याने शिक्षण घेणे शक्य नव्हते. चौथी वर्गाची परीक्षा केवळ चार दिवस शाळेत जाऊन दिली. राहण्याचे ठिकाण निश्चित नसल्याने दहावी कसाबसा पास झालो. घरून शिक्षणासाठी विरोध, तरीही पालात राहून लोकांकडून भीक मागून वेळप्रसंगी हॉटेलातील उष्टे खावून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणाठी परभणीला गेलो, राहण्याचे ठिकाण नसल्याने उपाशी पोटी आठ दिवस बसस्थानकामध्ये झोपलो. पुढे चंद्रपूर गाठले. तेथे वास्तविक जीवनावर ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. तिला साहित्य अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कारांसह ४३ पुरस्कार मिळाले. इतर ५ साहित्यकृती लिहिल्या; परंतु, जन्मभूमी व कर्मभूमीत येता आले नाही. २६ वर्षांनी हा योग प्रेस क्लबने आणून दिल्याने गहिवरून आले आहे. ही भेट माझ्या जीवनातील पुरस्कारापेक्षा मोठी आहे, असे ते म्हणाले.या कार्यक्रमात अशोक पवार यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाबरोबरच ‘जोगवा’ही शब्द सुरांची मैफल आयोजित करण्यात आली होती. ‘जोगवा माघाया आलो तुझ्या दारी, जोगवा दे जोगवा दे’ या गिताने कार्यक्रमाची सांगता झाली. विजय चोरडिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. राहुल वाव्हुळे यांनी प्रास्ताविक तर मंचक देशमुख यांंनी आभार मानले.

टॅग्स :parabhaniपरभणी