शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

परभणी : परिस्थितीशी झुंज देत ‘बिºहाड’ची निर्र्मिती-अशोक पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:48 IST

बसस्थानकावर झोपून मिळेल ते अन्न खावून ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. या कादंबरीला महाराष्टÑ साहित्य अकादमीसह ४३ पुरस्कार मिळाले. मात्र जन्मगावी २६ वर्षात कोणी बोलविले नाही. या अनोख्या भेटीसाठी प्रेस क्लबने पुढाकार घेतल्याने २६ वर्षानंतर मातीशी संवाद साधता आला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व बिºहाडकार अशोक पवार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : बसस्थानकावर झोपून मिळेल ते अन्न खावून ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. या कादंबरीला महाराष्टÑ साहित्य अकादमीसह ४३ पुरस्कार मिळाले. मात्र जन्मगावी २६ वर्षात कोणी बोलविले नाही. या अनोख्या भेटीसाठी प्रेस क्लबने पुढाकार घेतल्याने २६ वर्षानंतर मातीशी संवाद साधता आला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व बिºहाडकार अशोक पवार यांनी केले.जिंतूर येथे तालुका प्रेस क्लबच्या वतीने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. सुभाष राठी, पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, विजय खिस्ते, खंडेराव आघाव, सत्यनारायण शर्मा, परमेश्वर काकडे, डॉ. दुर्गादास कान्हडकर, रमण तोष्णीवाल, प्रा. श्रीधर भोंबे, श्रीनिवास तोष्णीवाल, देवेंद्र भूरे, प्रा. दिनेश सन्यासी आदींची उपस्थिती होती.बिºहाडकार अशोक पवार यांचा जन्म तालुक्यातील येनोली या गावी एका पालामध्ये झाला. वडील दगड फोडण्याचे काम करीत असत. या कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, घरात आठराविश्व दारिद्रय असल्याने शिक्षण घेणे शक्य नव्हते. चौथी वर्गाची परीक्षा केवळ चार दिवस शाळेत जाऊन दिली. राहण्याचे ठिकाण निश्चित नसल्याने दहावी कसाबसा पास झालो. घरून शिक्षणासाठी विरोध, तरीही पालात राहून लोकांकडून भीक मागून वेळप्रसंगी हॉटेलातील उष्टे खावून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणाठी परभणीला गेलो, राहण्याचे ठिकाण नसल्याने उपाशी पोटी आठ दिवस बसस्थानकामध्ये झोपलो. पुढे चंद्रपूर गाठले. तेथे वास्तविक जीवनावर ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. तिला साहित्य अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कारांसह ४३ पुरस्कार मिळाले. इतर ५ साहित्यकृती लिहिल्या; परंतु, जन्मभूमी व कर्मभूमीत येता आले नाही. २६ वर्षांनी हा योग प्रेस क्लबने आणून दिल्याने गहिवरून आले आहे. ही भेट माझ्या जीवनातील पुरस्कारापेक्षा मोठी आहे, असे ते म्हणाले.या कार्यक्रमात अशोक पवार यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाबरोबरच ‘जोगवा’ही शब्द सुरांची मैफल आयोजित करण्यात आली होती. ‘जोगवा माघाया आलो तुझ्या दारी, जोगवा दे जोगवा दे’ या गिताने कार्यक्रमाची सांगता झाली. विजय चोरडिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. राहुल वाव्हुळे यांनी प्रास्ताविक तर मंचक देशमुख यांंनी आभार मानले.

टॅग्स :parabhaniपरभणी