शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘एसआरटी’चे ९२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:59 IST

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सीबीसीएस पॅटर्नच्या धर्तीवर राबविलेल्या परीक्षा पद्धतीचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून विद्यापीठातील पहिल्या सत्रात कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेच्या निकालांची सरासरी केवळ ८.१६ टक्के असून ९२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

विजय चोरडिया।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सीबीसीएस पॅटर्नच्या धर्तीवर राबविलेल्या परीक्षा पद्धतीचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून विद्यापीठातील पहिल्या सत्रात कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेच्या निकालांची सरासरी केवळ ८.१६ टक्के असून ९२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रथम सत्राचे निकाल जाहीर झाले आहेत. विद्यापीठांतर्गत कला शाखेत प्रथम वर्षात १५ हजार ४३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ६९४ विद्यार्थी (४.५० टक्के) उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत ८ हजार ९२४ विद्यार्थ्यांपैकी केवळ १ हजार ११५ (१२.४९ टक्के) उत्तीर्ण झाले. तर विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात ८ हजार १०४ विद्यार्थ्यांपैकी ६०७ विद्यार्थी (७.४९ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या निकषाप्रमाणे व परीक्षा पद्धातीनुसार ज्ञानार्जन करुन विद्यार्थी परीक्षा देतात. मात्र विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.विद्यापीठाने सातत्याने परीक्षा पद्धतीत बदल केला. सेमिस्टर बंद करुन एमसीक्यू पॅटर्न लागू केला. कलांतराने हा पॅटर्नही बंद करुन सीजीपीए पॅटर्न सुरु केला. हा पॅटर्नही कालबाह्य असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने चॉईस बेस क्रेडीट सिस्टिम म्हणजे सीबीसीएस पॅटर्न लागू केला.या पद्धतीत एकावेळी दोन-दोन पेपर विद्यार्थ्यांना सोडवावे लागले. परीक्षेचा कालावधी कमी व्हावा, यासाठी विद्यापीठाने केलेला हा खटाटोप विद्यार्थ्याच्या आयुष्यातील जडणघडणीत अडचण ठरत आहे. याबाबत महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यापीठ समितीवरील तज्ञ व्यक्ती, विद्यापीठ व्यवस्थापन ब्र काढण्यासही तयार नाही; परंतु, दुसरीकडे या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे.बीसीए, बीसीएस विद्यार्थ्यांवर अन्याय४बीसीए, बीसीएस परीक्षा सेमिस्टरमध्ये घेत असताना विद्यापीठाने मोठी चूक केली. या विद्यार्थ्यांना लॉजिकल रेसलिंग नावाच्या पेपरला जुन्या व नव्या अभ्यासक्रमासाठी एकच पेपर दिला.४बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देताना सलग प्रश्न देण्यात आले. प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. ८० प्रश्न असताना ४० प्रश्नांच्या उत्तराचा चार्ट देण्यात आला. विशेष म्हणजे, नेमकी कोणती उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना द्यावी, याचा थोडाही अभ्यास विद्यापीठ व प्राध्यापकांना नव्हता.४परिणामी चुकीची उत्तरपत्रिका देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान केले. शिवाय विद्यापीठाची चूक असताना १६ महाविद्यालयांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागविले. या सर्व गोंधळामुळे चार महिन्यांपासून हे विद्यार्थी निकालापासून वंचित आहेत.तासिकांपेक्षा परीक्षांचा कालावधी अधिक४स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नियमानुसार महाविद्यालयाला १८० दिवस तासिका घ्याव्या लागतात. त्यात ४० ते ४५ दिवस पहिले सत्र (सेमिस्टर) व ४० ते ४२ दिवस दुसºया सत्रातील परीक्षा चालतात.४९० दिवस परीक्षांचा कालावधी केल्याने उरलेल्या ९० दिवसांत शासकीय सुट्ट्या, रविवार, महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रजा याचा विचार करता संपूर्ण अभ्यासक्रम केवळ ४० ते ४५ दिवसांमध्ये शिकवावा लागतो.४प्राध्यापकांची शिकविण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाची कुवत याचा कोणताही विचार विद्यापीठाने केल्याचे दिसत नाही.विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक व महाविद्यालयाच्या कामांचे दिवस यामध्ये ताळमेळ नाही. परिणामी लांब झालेल्या परीक्षेचा कालावधीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. सलग दीड तासाचे दोन पेपर एकाच वेळी विद्यार्थ्यांना सोडवावे लागत असल्याने अभ्यासाचा व पेपर सोडविण्याचा परिणाम निकालावर होत आहे.-अ‍ॅड.अशोक सोनी, माजी व्यवस्थापन समिती सदस्य, स्वारातीमवि.या परीक्षा पद्धतीत विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन प्रश्नपत्रिका देऊन सोयीनुसार त्यांना उत्तरे देण्याची मुभा देण्याची गरज असताना अनेक महाविद्यालयांना नेमकी परीक्षा पद्धती कशी? याचीच माहिती नव्हती. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर कोणत्या दिवशी आहे, याचीही माहिती नव्हती. विद्यापीठाने परीक्षेचा कालावधी कमी करण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाकडे पाहिले नाही.-डॉ.अंबादास कदम, सिनेट सदस्य, स्वारातीमवि, नांदेडसीबीसीएस परीक्षा पद्धतीनुसार घेतलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांचा निकाल का कमी लागला, याची विचारणा लेखी पत्राद्वारे कुलगुरुंकडे केली आहे. येत्या १२ मार्च रोजी होणाºया सिनेटच्या सभेत चर्चा होणार आहे.-नारायण चौधरी, सिनेट सदस्ययावर्षी एमसीक्यू पॅटर्न बंद करण्यात आला. थेअरीचे दोन पेपर एकत्र केल्या गेले. तसेच परीक्षा केंद्राची आदलाबदल केल्याने निकाल कमी लागला असावा, अशी शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी आता पूर्ण तयारीनिशी परीक्षा देणे गरजचे आहे.-रवि सरवदे, परीक्षा नियंत्रकस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

टॅग्स :parabhaniपरभणीexamपरीक्षाStudentविद्यार्थी