शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

परभणी : ६३ टक्के बालकांना वाचता येतो धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:18 IST

जिल्ह्यातील तिसरी ते पाचवीच्या ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येत असल्याची बाब असर या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अहवालात समोर आली आहे़ २०१८ मध्ये असरच्या वतीने देशभरात या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते़ त्याचा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील तिसरी ते पाचवीच्या ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येत असल्याची बाब असर या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अहवालात समोर आली आहे़ २०१८ मध्ये असरच्या वतीने देशभरात या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते़ त्याचा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला़शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या असर या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने देशभर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची स्थिती, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा आदी बाबतचे सर्वेक्षण केले जाते़ असर संस्थेच्या वतीेने २०१८ मध्ये देशभर या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले़ याबाबतचा अहवाल सोमवारी संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे़ त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील शिक्षणाची स्थिती काय आहे? याबाबतची माहिती असर या संस्थेचे मुंबई येथील अधिकारी भालचंद्र सहारे यांच्याकडून घेतली असता, परभणी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची स्थिती बºयापैकी असल्याची बाब समोर आली आहे़ असरच्या अहवालानुसार राज्यात ६ वर्षापर्यंत ९९़२ टक्के बालके शाळेमध्ये जातात़ तर परभणी जिल्ह्यातील ९९़८ टक्के म्हणजेच जवळपास १०० टक्के बालके शाळेत जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे़ राज्यातील ३७़६ टक्के मुले खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेतात़ त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील २०़७ टक्के मुले खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याचे आढळून आल्याचे असरचे म्हणणे आहे़ त्यामुळे इंग्रजी शाळांचे वाढते पेव फुटले असताना पालकांचा अद्यापही जिल्हा परिषद शाळांवर विश्वास असल्याचे या माध्यमातून अधोरेखित झाले आहे़ तिसरी ते पाचवी या वर्गापर्यंतच्या जिल्ह्यातील ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे वाचता येतात़ महाराष्ट्रात मात्र ५५़५ टक्के बालकांना धडे वाचता येतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे़ तिसरी ते पाचवीपर्यंतच्या जिल्ह्यातील ४९़५ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी व भागाकार येतो तर हेच प्रमाण राज्यात ४४़८ टक्के आहे़ यामध्ये राज्यात रत्नागिरी जिल्हा प्रथम असून, सातारा जिल्हा द्वितीय तर पुणे जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे़ परभणी जिल्ह्याची याबाबतीत पिछेहट असल्याचे समोर आले आहे़राज्यात परभणी जिल्हा चौथ्या क्रमांकावरसहावी ते आठवी वर्गातील जिल्ह्यातील ८८़५ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येतो़ राज्यात हे प्रमाण ७७़५ टक्के आहे़ याबाबीमध्ये परभणी जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे़ पहिल्या क्रमांकावर पुणे, दुसºया क्रमांकावर रत्नागिरी तर तिसºया क्रमांकावर सिंधूदुर्ग जिल्हा आहे़ सहावी ते आठवीमधील जिल्ह्यातील ४०़३ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी व भागाकार येतो़ राज्यामध्ये हे प्रमाण ३८़३ टक्के आहे़ यात सिंधूदुर्ग जिल्हा प्रथम, रत्नागिरी द्वितीय तर पुणे जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे़ याबाबीत मात्र परभणी जिल्हा पिछाडलेला दिसून येत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थी