शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

परभणी : ६३ टक्के बालकांना वाचता येतो धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:18 IST

जिल्ह्यातील तिसरी ते पाचवीच्या ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येत असल्याची बाब असर या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अहवालात समोर आली आहे़ २०१८ मध्ये असरच्या वतीने देशभरात या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते़ त्याचा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील तिसरी ते पाचवीच्या ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येत असल्याची बाब असर या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अहवालात समोर आली आहे़ २०१८ मध्ये असरच्या वतीने देशभरात या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते़ त्याचा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला़शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या असर या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने देशभर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची स्थिती, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा आदी बाबतचे सर्वेक्षण केले जाते़ असर संस्थेच्या वतीेने २०१८ मध्ये देशभर या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले़ याबाबतचा अहवाल सोमवारी संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे़ त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील शिक्षणाची स्थिती काय आहे? याबाबतची माहिती असर या संस्थेचे मुंबई येथील अधिकारी भालचंद्र सहारे यांच्याकडून घेतली असता, परभणी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची स्थिती बºयापैकी असल्याची बाब समोर आली आहे़ असरच्या अहवालानुसार राज्यात ६ वर्षापर्यंत ९९़२ टक्के बालके शाळेमध्ये जातात़ तर परभणी जिल्ह्यातील ९९़८ टक्के म्हणजेच जवळपास १०० टक्के बालके शाळेत जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे़ राज्यातील ३७़६ टक्के मुले खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेतात़ त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील २०़७ टक्के मुले खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याचे आढळून आल्याचे असरचे म्हणणे आहे़ त्यामुळे इंग्रजी शाळांचे वाढते पेव फुटले असताना पालकांचा अद्यापही जिल्हा परिषद शाळांवर विश्वास असल्याचे या माध्यमातून अधोरेखित झाले आहे़ तिसरी ते पाचवी या वर्गापर्यंतच्या जिल्ह्यातील ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे वाचता येतात़ महाराष्ट्रात मात्र ५५़५ टक्के बालकांना धडे वाचता येतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे़ तिसरी ते पाचवीपर्यंतच्या जिल्ह्यातील ४९़५ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी व भागाकार येतो तर हेच प्रमाण राज्यात ४४़८ टक्के आहे़ यामध्ये राज्यात रत्नागिरी जिल्हा प्रथम असून, सातारा जिल्हा द्वितीय तर पुणे जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे़ परभणी जिल्ह्याची याबाबतीत पिछेहट असल्याचे समोर आले आहे़राज्यात परभणी जिल्हा चौथ्या क्रमांकावरसहावी ते आठवी वर्गातील जिल्ह्यातील ८८़५ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येतो़ राज्यात हे प्रमाण ७७़५ टक्के आहे़ याबाबीमध्ये परभणी जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे़ पहिल्या क्रमांकावर पुणे, दुसºया क्रमांकावर रत्नागिरी तर तिसºया क्रमांकावर सिंधूदुर्ग जिल्हा आहे़ सहावी ते आठवीमधील जिल्ह्यातील ४०़३ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी व भागाकार येतो़ राज्यामध्ये हे प्रमाण ३८़३ टक्के आहे़ यात सिंधूदुर्ग जिल्हा प्रथम, रत्नागिरी द्वितीय तर पुणे जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे़ याबाबीत मात्र परभणी जिल्हा पिछाडलेला दिसून येत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थी