शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

परभणी : ६३ टक्के बालकांना वाचता येतो धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:18 IST

जिल्ह्यातील तिसरी ते पाचवीच्या ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येत असल्याची बाब असर या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अहवालात समोर आली आहे़ २०१८ मध्ये असरच्या वतीने देशभरात या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते़ त्याचा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील तिसरी ते पाचवीच्या ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येत असल्याची बाब असर या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अहवालात समोर आली आहे़ २०१८ मध्ये असरच्या वतीने देशभरात या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते़ त्याचा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला़शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या असर या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने देशभर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची स्थिती, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा आदी बाबतचे सर्वेक्षण केले जाते़ असर संस्थेच्या वतीेने २०१८ मध्ये देशभर या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले़ याबाबतचा अहवाल सोमवारी संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे़ त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील शिक्षणाची स्थिती काय आहे? याबाबतची माहिती असर या संस्थेचे मुंबई येथील अधिकारी भालचंद्र सहारे यांच्याकडून घेतली असता, परभणी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची स्थिती बºयापैकी असल्याची बाब समोर आली आहे़ असरच्या अहवालानुसार राज्यात ६ वर्षापर्यंत ९९़२ टक्के बालके शाळेमध्ये जातात़ तर परभणी जिल्ह्यातील ९९़८ टक्के म्हणजेच जवळपास १०० टक्के बालके शाळेत जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे़ राज्यातील ३७़६ टक्के मुले खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेतात़ त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील २०़७ टक्के मुले खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याचे आढळून आल्याचे असरचे म्हणणे आहे़ त्यामुळे इंग्रजी शाळांचे वाढते पेव फुटले असताना पालकांचा अद्यापही जिल्हा परिषद शाळांवर विश्वास असल्याचे या माध्यमातून अधोरेखित झाले आहे़ तिसरी ते पाचवी या वर्गापर्यंतच्या जिल्ह्यातील ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे वाचता येतात़ महाराष्ट्रात मात्र ५५़५ टक्के बालकांना धडे वाचता येतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे़ तिसरी ते पाचवीपर्यंतच्या जिल्ह्यातील ४९़५ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी व भागाकार येतो तर हेच प्रमाण राज्यात ४४़८ टक्के आहे़ यामध्ये राज्यात रत्नागिरी जिल्हा प्रथम असून, सातारा जिल्हा द्वितीय तर पुणे जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे़ परभणी जिल्ह्याची याबाबतीत पिछेहट असल्याचे समोर आले आहे़राज्यात परभणी जिल्हा चौथ्या क्रमांकावरसहावी ते आठवी वर्गातील जिल्ह्यातील ८८़५ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येतो़ राज्यात हे प्रमाण ७७़५ टक्के आहे़ याबाबीमध्ये परभणी जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे़ पहिल्या क्रमांकावर पुणे, दुसºया क्रमांकावर रत्नागिरी तर तिसºया क्रमांकावर सिंधूदुर्ग जिल्हा आहे़ सहावी ते आठवीमधील जिल्ह्यातील ४०़३ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी व भागाकार येतो़ राज्यामध्ये हे प्रमाण ३८़३ टक्के आहे़ यात सिंधूदुर्ग जिल्हा प्रथम, रत्नागिरी द्वितीय तर पुणे जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे़ याबाबीत मात्र परभणी जिल्हा पिछाडलेला दिसून येत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थी