शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ६० हजार हेक्टर सिंचन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:18 IST

पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने लाभक्षेत्रातील सुमारे ६० हजार हेक्टर जमिनीवरील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या शिवाय जिंतूर तालुक्यातील १३ लघू प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने पाणीप्रश्न अधिकच गंभीर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी) : पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने लाभक्षेत्रातील सुमारे ६० हजार हेक्टर जमिनीवरील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या शिवाय जिंतूर तालुक्यातील १३ लघू प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने पाणीप्रश्न अधिकच गंभीर होत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात येलदरी प्रकल्पामध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेष म्हणजे येलदरी प्रकल्पात पाच वर्षांपासून जेमतेम पाणीसाठा होत असल्याने तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प म्हणून येलदरीची ओळख आहे. या प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने अर्ध्या मराठवाडयात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागासह जिल्हा प्रशासनाला पाण्याचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यावर्षी जिंतूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली. दमदार पाऊस झाला नसल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. येलदरी प्रकल्पात पाणीसाठा झाला नसल्याने परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात २२५ हून अधिक गावांसह मोठ्या शहरांमध्ये टंचाई व चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.जिंतुरातील ११ लघू तलाव कोरडेचजिंतूर तालुक्यात लघू सिंचन विभागांतर्गत १३ लघू तलाव असून एक मध्यम प्रकल्प आहे. त्यापैकी देवगाव लघू तलावात ५७ टक्के, जोगवाडा ९० टक्के, बेलखेडा ८० टक्के, वडाळी ८९ टक्के, पाडळी ५५ टक्के, चारठाणा ८३ टक्के, कवडा ५२, भोसी ८, मांडवी ८०, दहेगाव १५, केहाळ २१, आडगाव १७ आणि चिंचोली लघू तलवात केवळ १६ टक्के पाणीसाठा आहे. १३ पैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. तर करपरा मध्यम प्रकल्पात ७६ टक्के पाणीसाठा असल्याने हे पाणी किती दिवस पुरेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरवर्षी साठ्यात घट१९७२ च्या दुष्काळानंतर प्रथमच येलदरी धरणात एवढा कमी पाणीसाठा जमा झाला आहे. दरवर्षी पाणीसाठ्यात घट होत असल्याने पुढील वर्षी पाणीसाठा शिल्लक राहतो की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.खडकपूर्णामुळे वाढल्या अडचणीपूर्णा नदीवर येलदरी धरणाच्या वर बुलढाणा जिल्ह्यात खडकपूर्णा धरण बांधण्यात आले. २०१३ पासून या धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला जात आहे. त्यामुळे २०१३ नंतर येलदरी प्रकल्पात पाणीसाठा जमा झाला नाही.परिणामी येलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या लाभक्षेत्रातील ६० हजार हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हावासियांसाठी खडकपूर्णा धरणामुळे अडचणी वाढल्या आहेत. यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीyelgao damयेळगाव धरणWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प