शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

परभणी : ६० हजार हेक्टर सिंचन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:18 IST

पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने लाभक्षेत्रातील सुमारे ६० हजार हेक्टर जमिनीवरील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या शिवाय जिंतूर तालुक्यातील १३ लघू प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने पाणीप्रश्न अधिकच गंभीर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी) : पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने लाभक्षेत्रातील सुमारे ६० हजार हेक्टर जमिनीवरील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या शिवाय जिंतूर तालुक्यातील १३ लघू प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने पाणीप्रश्न अधिकच गंभीर होत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात येलदरी प्रकल्पामध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेष म्हणजे येलदरी प्रकल्पात पाच वर्षांपासून जेमतेम पाणीसाठा होत असल्याने तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प म्हणून येलदरीची ओळख आहे. या प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने अर्ध्या मराठवाडयात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागासह जिल्हा प्रशासनाला पाण्याचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यावर्षी जिंतूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली. दमदार पाऊस झाला नसल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. येलदरी प्रकल्पात पाणीसाठा झाला नसल्याने परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात २२५ हून अधिक गावांसह मोठ्या शहरांमध्ये टंचाई व चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.जिंतुरातील ११ लघू तलाव कोरडेचजिंतूर तालुक्यात लघू सिंचन विभागांतर्गत १३ लघू तलाव असून एक मध्यम प्रकल्प आहे. त्यापैकी देवगाव लघू तलावात ५७ टक्के, जोगवाडा ९० टक्के, बेलखेडा ८० टक्के, वडाळी ८९ टक्के, पाडळी ५५ टक्के, चारठाणा ८३ टक्के, कवडा ५२, भोसी ८, मांडवी ८०, दहेगाव १५, केहाळ २१, आडगाव १७ आणि चिंचोली लघू तलवात केवळ १६ टक्के पाणीसाठा आहे. १३ पैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. तर करपरा मध्यम प्रकल्पात ७६ टक्के पाणीसाठा असल्याने हे पाणी किती दिवस पुरेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरवर्षी साठ्यात घट१९७२ च्या दुष्काळानंतर प्रथमच येलदरी धरणात एवढा कमी पाणीसाठा जमा झाला आहे. दरवर्षी पाणीसाठ्यात घट होत असल्याने पुढील वर्षी पाणीसाठा शिल्लक राहतो की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.खडकपूर्णामुळे वाढल्या अडचणीपूर्णा नदीवर येलदरी धरणाच्या वर बुलढाणा जिल्ह्यात खडकपूर्णा धरण बांधण्यात आले. २०१३ पासून या धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला जात आहे. त्यामुळे २०१३ नंतर येलदरी प्रकल्पात पाणीसाठा जमा झाला नाही.परिणामी येलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या लाभक्षेत्रातील ६० हजार हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हावासियांसाठी खडकपूर्णा धरणामुळे अडचणी वाढल्या आहेत. यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीyelgao damयेळगाव धरणWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प