शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

परभणी : ५९८ क्विं. मुगाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:29 IST

तालुक्यासाठी सुरु केलेल्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मुदतीअखेर ५९८.६६ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली आहे. २७१ शेतकऱ्यांनी हमीदराने मूग विक्री केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यासाठी सुरु केलेल्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मुदतीअखेर ५९८.६६ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली आहे. २७१ शेतकऱ्यांनी हमीदराने मूग विक्री केला आहे.जिल्ह्यात यावर्षी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र उशिराने सुरु झाले. त्यामुळे अनेक शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची विक्री करावी लागली. वारंवार मागणी करुनही हमीभाव खरेदी केंद्र सुरु होत नसल्याने अनेक शेतकºयांनी नोंदणी केल्यानंतरही खाजगी बाजारपेठेत शेतमाल विक्री केला आहे. परभणी तालुक्यासाठी येथील खरेदी- विक्री संघामध्ये १७ डिसेंबर रोजी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रावर मुगाची विक्री करण्यासाठी ६१५ शेतकºयांनी नोंदणी केली होती. २३ डिसेंबरपर्यंत मूग खरेदी करण्याची मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात या तारखेपर्यंत सर्व शेतकºयांच्या मुगाची खरेदी होऊ शकली नाही. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ६१५ पैकी केवळ २७१ शेतकºयाचा मूग हमीभावाने खरेदी करण्यात आला आहे. उर्वरित सर्व शेतकºयांची खरेदी होऊ शकली नाही.यावर्षी परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातच पावसाने हात दिल्यामुळे पिके हाती लागली नाहीत. जो शेतीमाल शेतकºयांच्या पदरात पडला त्याला किमान हमीभाव मिळावा, अशी शेतकºयांची अपेक्षा होती. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली; परंतु, हमीभाव खरेदी केंद्र वेळेत सुरु झाले नाही. १७ डिसेंबर रोजी परभणी तालुक्यातील हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. केवळ आठच दिवस या केंद्रावर खरेदी करण्यात आली. माल विक्री करण्यासाठी शेतकºयांकडे पुरेसा वेळ उपलब्ध नव्हता. त्यामुळे सर्व शेतकºयांच्या मुगाची खरेदी होऊ शकली नाही. परिणामी अनेक शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दराने मूग विक्री करावा लागला. उर्वरित शेतकºयांना फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी होत आहे.मुदत संपल्याने : ३४४ शेतकºयांना आर्थिक फटकापरभणी तालुक्यासाठी सुरु करण्यात आलेले हमीभाव खरेदी केंद्र केवळ आठच दिवस चालले. या केंद्रावर ६१५ शेतकºयांनी नोंदणी केली होती. मुगाला ६ हजार ९७५ प्रति क्विंटल असा हमीभाव शासनाने जाहीर केला आहे; परंतु, खरेदी करण्यासाठी कमी कालावधी असल्याने सर्व शेतकºयांच्या मुगाची खरेदी होऊ शकली नाही. यामुळे तब्बल ३४४ शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दराने मुगाची विक्री करावी लागली. शासनाच्या धोरणामुळे या शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. दरम्यान, या संदर्भात हमीभाव खरेदी केंद्राशी संपर्क साधला असता सर्व शेतकºयांना खरेदीसाठी भ्रमणध्वनीवर मेसेज टाकले होते; परंतु, शेतकºयांनी वेळेत आपला माल विक्रीसाठी आणला नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती