शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : खरिपाचे ५९ टक्के क्षेत्र पडिक राहण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:45 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात जुलै महिन्याचा पहिला आठवडा ओलांडला तरीही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने सुमारे ५९ टक्के खरिपाचे क्षेत्र पेरणीअभावी पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़ सध्या जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असून, मोठ्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात जुलै महिन्याचा पहिला आठवडा ओलांडला तरीही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने सुमारे ५९ टक्के खरिपाचे क्षेत्र पेरणीअभावी पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़ सध्या जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असून, मोठ्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़मागील वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी करूनही अपेक्षित उत्पादन मिळाले नव्हते़ तर रबी हंगामात पावसाअभावी पेरणीच झाली नव्हती़ जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली़ खरीप आणि रबी या दोन्ही हंगामात मोठे नुकसान सहन केल्यानंतर यावर्षीच्या खरीप हंगामातून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या़ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला़ त्यामुळे सलग दोन वर्षापासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाºया येथील शेतकºयांनी यावर्षीच्या हंगामातून मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत़ मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच शेतकरी खरीप पेरण्यांच्या तयारीला लागले़ शेत जमिनींची मशागत करण्यात आली़ बी-बियाणे, खतांची खरेदीही झाली आहे़ मात्र पावसाने खोडा घातल्याने जिल्हाभरात चिंतेचे वातावरण आहे़ जून महिन्यात थोडाफार पाऊस झाला असला तरी जमिनीत ओल निर्माण झाली नाही़ मृग नक्षत्रापासूनच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत़ मात्र अद्यापही मोठा पाऊस झाला नाही़जून महिन्यामध्ये झालेल्या अल्प पावसावर काही शेतकºयांनी कापूस लागवडीचे धाडस केले आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत ४१ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी त्यात कापसाचीच सर्वाधिक लागवड आहे़ अनेक भागांत धूळ पेरण्या करण्यात आल्या़जुलै महिन्यातील पहिला आठवडा सरला तरीही दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत़ जिल्ह्यात सद्यस्थितीला झालेल्या ४१ टक्के पेरण्या वगळता उर्वरित ५९ टक्के क्षेत्र पेरणीअभावी पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़ त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागते की काय, या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत़१ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरणी४परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र खरीपाच्या पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे़ त्यापैकी १ लाख ७७ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत़ उर्वरित क्षेत्रावर पेरण्या करण्यासाठी आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना लागली आहे़४कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यामध्ये कापसाची लागवड सर्वाधिक झाली आहे़ परभणी तालुक्यात १३ हजार ९०० हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे तर गंगाखेड तालुक्यात ७ हजार ४०० हेक्टर, पाथरी १३ हजार ४०० हेक्टर, जिंतूर ३ हजार ५००, पूर्णा ४ हजार ५००, पालम ७०० हेक्टर, सेलू २५ हजार ७०० हेक्टर, सोनपेठ १० हजार ७०० हेक्टर आणि मानवत तालुक्यात १७ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे़४काही भागात बाजरी, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची पेरणी झाली आहे़ उर्वरित क्षेत्रात पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात असून, सध्याची परिस्थिती पाहता शिल्लक राहिलेले ५९ टक्के क्षेत्र पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़जिल्ह्यात आतापर्यंत १२ टक्के पाऊसपरभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४़६२ मिमी असून, सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १२़५ टक्के पाऊस झाला आहे़ गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक १७़९ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ तर सोनपेठ तालुक्यामध्ये १६़९ टक्के, मानवत तालुक्यात १५ टक्के, जिंतूर ११़७ टक्के, पूर्णा १२़४, पालम १२़२ टक्के, पाथरी १०़९ टक्के, परभणी १०़६ टक्के आणि सेलू तालुक्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ७़६ टक्के पाऊस झाला आहे़ १ जूनपासून ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात ९७़१८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक १२४़५० मिमी पाऊस झाला असून, त्याखालोखाल मानवत तालुक्यात १२२़३३ मिमी पाऊस झाला आहे़ तालुक्याच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत गंगाखेड आणि सोनपेठ या दोनच तालुक्यांत चांगला पाऊस झाला असून, उर्वरित तालुक्यांत मात्र पावसाने पाठ फिरविली आहे़१५ जुलैपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाल्यास शेतकºयांना कापूस, तूर, सोयाबीन ही पिके घेता येतील़ शेतकºयांनी कमी कालावधीचे वाण पेरणीसाठी निवडावे़ तसेच अंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा़-यु़एऩ आळसे, कृषी विद्यावेत्ता, वनामकृवि, परभणी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस