शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

परभणी :गोदावरीतून दररोज ५० ब्रास वाळू लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:33 IST

तालुक्यातील गौंडगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दररोज रात्रीच्या वेळी ५० ब्रास वाळू चोरी होत असल्याचा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू असून, या प्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील गौंडगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दररोज रात्रीच्या वेळी ५० ब्रास वाळू चोरी होत असल्याचा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू असून, या प्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात झोला, पिंपरी झोला, मसला, खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, मैराळ सावंगी, दुस्सलगाव, भांबरवाडी, महातपुरी, आनंदवाडी, धारखेड, नागठाणा व मुळी आदी गोदावरी नदीपात्राजवळील गावात वाळू उपसासाठीचे वाळूचे घाट आहेत.आजघडीला तालुक्यातील वरील एकाही वाळू घाटाचा महसूल प्रशासनाकडून लिलाव झालेला नाही. असे असताना सुद्धा गौंडगाव परिसरातील वाळू घाटावरून दररोज रात्री ट्रॅक्टरद्वारे ५० ब्रॉस वाळूचा राजरोसपणे उपसा केला जात आहे. त्यानंतर गोदावरी नदीपात्रातील उपसा केलेली वाळू ट्रॅक्टरच्या माध्यमातून पात्राबाहेर असलेल्या चिंचटाकळी रस्त्याच्या बाजूला साठा करून ठेवली जात आहे. या साठ्यातून हायवा, टिप्पर, ट्रॅक्टर आदी वाहने भरून त्याची विनापरवाना अवैधरित्या वाहतूक केल्या जाते.गौंडगाव येथील वाळू धक्याचा लिलाव झाला नसताना वाळू उपसा केला जात असल्याने गावातील काही ग्रामस्थांनी या अवैध वाळू उपशाला तीव्र विरोध केला. मात्र वाळूमाफियांकडून ग्रामस्थांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे वाळू घाटांचा लिलाव झाला नसतानाही दरदिवशी रात्रीच्या वेळी साडेतीन लाख रुपयांच्या वाळूचा राजरोसपणे विनापरवाना उपसा होत असताना महसूल प्रशासनातील तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.रात्रीच्या वाळू उपशाने होतेय झोपमोडगोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा करण्यासाठी रात्रभर ट्रॅक्टर, जेसीबी आदी वाहने चालू असल्याने या वाहनांच्या आवाजाचा मोठा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर वाळूची चोरटी वाहतूक करणारी वाहने ही भरधाव वेगात धावत असल्याने रस्त्याने चालताना सुद्धा भीती वाटत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. विशेष म्हणजे रस्त्याच्या बाजूला केलेले वाळू साठे संबधित गावाचे तलाठी, मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकाºयांच्या निदर्शनास कसे काय, येत नाहीत, अशी प्रतिक्रिया गौंडगाव येथील एका ग्रामस्थाने दिली.पर्यावरणास धोकागौंडगाव परिसरातून राजरोसपणे होणाºया वाळू उपशामुळे गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील नदीपात्रातून विना परवाना होणाºया वाळू उपशाकडे नूतन तहसीलदार स्वरुप कंकाळ हे लक्ष देऊन अनाधिकृत वाळू उपसा करणाºया वाळू माफियांना रोखतील का? असा सवाल ग्रामस्थांमधूून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूgodavariगोदावरी