शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

परभणी : २० टक्के पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:26 IST

जिल्ह्यात मागील आठवड्यामध्ये दमदार पाऊस झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही जिल्ह्यामध्ये २० टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नसून आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मागील आठवड्यामध्ये दमदार पाऊस झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही जिल्ह्यामध्ये २० टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नसून आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट कायम आहे.जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७७४ मि.मी. पाऊस होतो. १ जूनपासून ते २२ सप्टेंबरपर्यंत सरासरी ६७३.५१ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ५३३.७० मि.मी. पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत २० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत. मागील आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत नसल्याने चिंता वाढल्या आहेत. येलदरी प्रकल्पात आताकुठे केवळ १ टक्का उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. तर निम्न दुधना प्रकल्प अजूनही मृतसाठ्यात आहे. या दोन्ही प्रकल्पांवर जिल्हाभरातील पाणीपुरवठा योजनांची भिस्त आहे. मात्र प्रकल्पात पाणी उपलब्ध झाले नाही.परभणी, सेलू, जिंतूर तालुक्यात कमी पाऊस४परभणी तालुक्यामध्ये अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५७.५ टक्के पाऊस झाला आहे. तर पालम तालुक्यात ८७.२ टक्के, पूर्णा ९२.०३, गंगाखेड ८९.२, सोनपेठ ८२.७, सेलू ६८.७, पाथरी ८९.७, जिंतूर ६८.६ आणि मानवत तालुक्यात ८२.६ टक्के पाऊस झाला आहे. पूर्णा वगळता इतर तालुक्यांत पावसाचे प्रमाण असमाधानकारक आहे. त्यातही परभणी, सेलू आणि जिंतूर तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प