शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

परभणी : २० टक्के पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:26 IST

जिल्ह्यात मागील आठवड्यामध्ये दमदार पाऊस झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही जिल्ह्यामध्ये २० टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नसून आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मागील आठवड्यामध्ये दमदार पाऊस झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही जिल्ह्यामध्ये २० टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नसून आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट कायम आहे.जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७७४ मि.मी. पाऊस होतो. १ जूनपासून ते २२ सप्टेंबरपर्यंत सरासरी ६७३.५१ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ५३३.७० मि.मी. पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत २० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत. मागील आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत नसल्याने चिंता वाढल्या आहेत. येलदरी प्रकल्पात आताकुठे केवळ १ टक्का उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. तर निम्न दुधना प्रकल्प अजूनही मृतसाठ्यात आहे. या दोन्ही प्रकल्पांवर जिल्हाभरातील पाणीपुरवठा योजनांची भिस्त आहे. मात्र प्रकल्पात पाणी उपलब्ध झाले नाही.परभणी, सेलू, जिंतूर तालुक्यात कमी पाऊस४परभणी तालुक्यामध्ये अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५७.५ टक्के पाऊस झाला आहे. तर पालम तालुक्यात ८७.२ टक्के, पूर्णा ९२.०३, गंगाखेड ८९.२, सोनपेठ ८२.७, सेलू ६८.७, पाथरी ८९.७, जिंतूर ६८.६ आणि मानवत तालुक्यात ८२.६ टक्के पाऊस झाला आहे. पूर्णा वगळता इतर तालुक्यांत पावसाचे प्रमाण असमाधानकारक आहे. त्यातही परभणी, सेलू आणि जिंतूर तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प