शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

परभणी: येलदरीत ९८ तर सिद्धेश्वरमध्ये ७५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 23:58 IST

येथील येलदरी धरणामध्ये सद्यस्थितीत ९८.११ टक्के जीवंत पाणीसाठा झाला असून सिद्धेश्वर धरणामध्ये ७५.५२ टक्के पाणी झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी ): येथील येलदरी धरणामध्ये सद्यस्थितीत ९८.११ टक्के जीवंत पाणीसाठा झाला असून सिद्धेश्वर धरणामध्ये ७५.५२ टक्के पाणी झाले आहे.बुुलढाणा जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने येलदरीच्या वरील खडकपूर्णा धरण भरले आहे. त्यामुळे खडकपूर्णाच्या पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत करण्यात आला. त्यामुळे पूर्णेतून हे पाणी येलदरी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाले. त्यामुळे अनेक वर्षानंतर येलदरी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आता धरणात ७९३.९८९ दलघमी म्हणजेच ९८.११ टक्के जीवंत पाणीसाठा झाला आहे. गेल्या २४ तासांत या धरणात ६.५२८ दलघमी पाणी दाखल झाले. यातील ६.३८७ दलघमी पाण्याचा विद्युत निर्मिती केंद्रातून विसर्ग करण्यात येत आहे. येलदरीतून सोडलेले पाणी हिंगोली जिल्ह्यात असलेल्या सिद्धेश्वर धरणामध्ये जमा झाले आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरणातही सद्यस्थितीला ७५.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या २४ तासांत या धरणात ७.२३१ दलघमी पाणी दाखल झाले. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. येलदरी व सिद्धेश्वर या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा वाढल्याने परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील अनेक गावांचा व शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शिवाय सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी