शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

परभणी : ४ एकर पपई पिकावर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:41 IST

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नरवाडी येथील एका शेतकऱ्याने पपई पिकावर नांगर फिरविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. पाण्याअभावी नोव्हेंबर महिन्यातच फळबाग उत्पादक अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नरवाडी येथील एका शेतकऱ्याने पपई पिकावर नांगर फिरविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. पाण्याअभावी नोव्हेंबर महिन्यातच फळबाग उत्पादक अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील पाणीपातळीत दिवसेंदिवस मोठी घट होत आहे. ज्या शेतकºयांकडे पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा शेतकºयांनी फळपीक व रबी हंगामातील ज्वारी, गव्हाची पेरणी केली; परंतु, वाढते तापमान व अत्यल्प पावसामुळे नोव्हेंबर महिन्यातच तालुक्यातील भूजलपातळीमध्ये मोठी घट होत आहे. त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथे सर्वे ३/४ मध्ये नंदकुमार जोगदंड यांनी आपल्या शेतात उपलब्ध पाण्यावर पपई फळाची लागवड केली; परंतु, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जलस्त्रोतांची पाणीपातळी खालावली. पपई पिकाला पाणी देणे जोगदंड यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे बहरात आलेल्या पपई फळ पिकावर नाविलाजास्तव नांगर फिरवावा लागला. त्यामुळे जोगदंड यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.सोनपेठ तालुक्यात यापूर्वीही एका शेतकºयाने कापसात जनावरे सोडून दिल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पपई उत्पादकाने बाग मोडल्याने दुष्काळाची दाहकता वाढत असल्याचेच दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी