शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

परभणी : ४ एकर पपई पिकावर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:41 IST

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नरवाडी येथील एका शेतकऱ्याने पपई पिकावर नांगर फिरविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. पाण्याअभावी नोव्हेंबर महिन्यातच फळबाग उत्पादक अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नरवाडी येथील एका शेतकऱ्याने पपई पिकावर नांगर फिरविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. पाण्याअभावी नोव्हेंबर महिन्यातच फळबाग उत्पादक अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील पाणीपातळीत दिवसेंदिवस मोठी घट होत आहे. ज्या शेतकºयांकडे पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा शेतकºयांनी फळपीक व रबी हंगामातील ज्वारी, गव्हाची पेरणी केली; परंतु, वाढते तापमान व अत्यल्प पावसामुळे नोव्हेंबर महिन्यातच तालुक्यातील भूजलपातळीमध्ये मोठी घट होत आहे. त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथे सर्वे ३/४ मध्ये नंदकुमार जोगदंड यांनी आपल्या शेतात उपलब्ध पाण्यावर पपई फळाची लागवड केली; परंतु, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जलस्त्रोतांची पाणीपातळी खालावली. पपई पिकाला पाणी देणे जोगदंड यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे बहरात आलेल्या पपई फळ पिकावर नाविलाजास्तव नांगर फिरवावा लागला. त्यामुळे जोगदंड यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.सोनपेठ तालुक्यात यापूर्वीही एका शेतकºयाने कापसात जनावरे सोडून दिल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पपई उत्पादकाने बाग मोडल्याने दुष्काळाची दाहकता वाढत असल्याचेच दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी