शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: ३ हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:10 IST

तीन वर्षापासून जिल्ह्यातील ३ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी कोटेशनची रक्कम भरुनही अद्याप त्यांना वीज जोडणीचे साहित्य महावितरण कंपनीकडून देण्यात आले नाही. परिणामी या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: तीन वर्षापासून जिल्ह्यातील ३ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी कोटेशनची रक्कम भरुनही अद्याप त्यांना वीज जोडणीचे साहित्य महावितरण कंपनीकडून देण्यात आले नाही. परिणामी या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळाचा सामना करीत असताना दुसरीकडे मात्र शेतकºयांच्या हितार्थ असलेल्या वीज वितरण कंपनीकडूनच कृषीपंपधारकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. महावितरण कंपनीने जिल्ह्यामध्ये राबविलेल्या महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत ज्या कृषी पंपाधारकांना वीज जोडणी आवश्यक आहे, त्या कृषीपंपधारकांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ३ हजार शेतकºयांनी प्रत्येकी ६ हजार रुपयांचे कोटेशन भरुन या योजनेत सहभाग नोंदविला. त्यामुळे लवकरच कृषी पंपाच्या वीज जोडणीचे साहित्य देण्यात येईल, ही अपेक्षा बाळगणाºया शेतकºयांकडे महावितरणे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. गेल्या तीन वर्षापासून या शेतकºयांना केवळ जोडणी दिली आहे; परंतु, जोडणीसाठी लागणारे साहित्य अद्यापही देण्यात आले नाही. त्यामुळे याकडे महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष देऊन तीन वर्षापासून साहित्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या कृषीपंपधारकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.‘मुख्यमंत्री सौर योजनेत प्राधान्य द्या’४महावितरण आपल्या दारी योजनेंतर्गत सहभागी होणाºया शेतकºयांना मुख्यमंत्री सौर योजनेत प्राधान्य देण्यात यावे, जेणेकरुन तीन वर्षापासून कृषीपंपाच्या साहित्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या शेतकºयांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी