शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

परभणी: ३ हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:10 IST

तीन वर्षापासून जिल्ह्यातील ३ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी कोटेशनची रक्कम भरुनही अद्याप त्यांना वीज जोडणीचे साहित्य महावितरण कंपनीकडून देण्यात आले नाही. परिणामी या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: तीन वर्षापासून जिल्ह्यातील ३ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी कोटेशनची रक्कम भरुनही अद्याप त्यांना वीज जोडणीचे साहित्य महावितरण कंपनीकडून देण्यात आले नाही. परिणामी या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळाचा सामना करीत असताना दुसरीकडे मात्र शेतकºयांच्या हितार्थ असलेल्या वीज वितरण कंपनीकडूनच कृषीपंपधारकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. महावितरण कंपनीने जिल्ह्यामध्ये राबविलेल्या महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत ज्या कृषी पंपाधारकांना वीज जोडणी आवश्यक आहे, त्या कृषीपंपधारकांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ३ हजार शेतकºयांनी प्रत्येकी ६ हजार रुपयांचे कोटेशन भरुन या योजनेत सहभाग नोंदविला. त्यामुळे लवकरच कृषी पंपाच्या वीज जोडणीचे साहित्य देण्यात येईल, ही अपेक्षा बाळगणाºया शेतकºयांकडे महावितरणे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. गेल्या तीन वर्षापासून या शेतकºयांना केवळ जोडणी दिली आहे; परंतु, जोडणीसाठी लागणारे साहित्य अद्यापही देण्यात आले नाही. त्यामुळे याकडे महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष देऊन तीन वर्षापासून साहित्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या कृषीपंपधारकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.‘मुख्यमंत्री सौर योजनेत प्राधान्य द्या’४महावितरण आपल्या दारी योजनेंतर्गत सहभागी होणाºया शेतकºयांना मुख्यमंत्री सौर योजनेत प्राधान्य देण्यात यावे, जेणेकरुन तीन वर्षापासून कृषीपंपाच्या साहित्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या शेतकºयांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी