शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

परभणी : जिंतूर तालुक्यात २४ बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:38 PM

जलसंधारण विभागांतर्गत ग्रामीण भागामध्ये २४ सिंचन बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली असून त्यावर ३२ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत. या बंधाऱ्यामुळे परिसरातील हजारो एकर शेत जमीन सिंचनाखाली येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर: जलसंधारण विभागांतर्गत ग्रामीण भागामध्ये २४ सिंचन बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली असून त्यावर ३२ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत. या बंधाऱ्यामुळे परिसरातील हजारो एकर शेत जमीन सिंचनाखाली येणार आहे.जिंतूर तालुक्यामध्ये मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे झाली. जांब, चारठाणा, भोसी आदी गावांमध्ये जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे या भागात पाणीपातळी वाढण्यासाठी मोठा फायदा झाला. यावर्षी जलसंधारण विभागाने जिंतूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बंधाºयाची कामे हाती घेतली आहेत.या संदर्भात जलसंधारण विभागाकडून इटोली येथे दोन बंधारे, साईनगर एक, मांडवावाडी १, रवळगाव १, पाचेगाव १ अशा ६ बंधाऱ्यांच्या कामांवर ७ कोटी ३२ लाख रुपये खर्च होणार आहेत. त्याच बरोबर वाईबोथी २, चिकलठाणा २, गिरगाव १, रवळगाव १ या ६ बंधाºयांसाठी ६ कोटी ९९ लाख रुपये मंजूर झाले आहेत.याशिवाय तालुक्यातील आडगाव येथे ४, असोला २ या सहा बंधाºयांच्या कामावर ६ कोटी ७५ लाख रुपये मंजूर आहेत. तालुक्यातील वाईबोथी, गिरगाव, रवळगाव, कवडगव्हाण या चार कामांसाठी ५ कोटी २५ लाख रुपये मंजुरी मिळाली आहे. याशिवाय आडगाव, पाचेगाव, साईनगर, मांडवावाडी येथे प्रत्येकी १ या प्रमाणे एकूण ४ कामांवर ५ कोटी १६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या सर्व कामांना मंजुरी देण्यात आली असून २४ बंधाºयावर ३२ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत. या कामाला निवडणुकीपूर्वीच मान्यता देण्यात आली असून संबंधित कामांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. जिंतूर तालुक्यातील दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.जलयुक्त शिवारमधील बंधारे चौकशीच्या फेºयात४जिंतूर तालुक्यामध्ये मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत अनेक बंधाºयांची कामे झाली होती. ही कामे करीत असताना बंधाºयांसाठी लागणारे साहित्य व दर्जा तपासण्यात आला नाही. त्यामुळे अनेक बंधाºयांची कामे बोगस झाल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांनी या तक्रारींच्या अनुषंगाने बंधाºयाची कोरबोर टेस्ट घेण्याचे ठरविले. यामध्ये मोहखेडा, वझर, सावंगी भांबळे, नागणगाव, साखरतळा, असोला वरुड नृसिंह, सुकळी वाडी, गणेशनगर, आडगाव बाजार, आंगलगाव, आंगलगाव तांडा येथील कामांची कोरबोर टेस्ट घेतल्यानंतर अनेक ठिकाणी बोगस कामे झाल्याचे टेस्टमध्ये आढळून आले.पाणीपातळी वाढणार४जिंतूर तालुक्यात नवीन होणाºया या बंधाºयांमुळे त्या त्या भागातील पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्याच बरोबर बंधारा परिसरातील हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. विशेष म्हणजे यातील अनेक बंधारे डोंगराळ भागात होणार आहेत. या भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने याचा फायदा जवळच्या गावांना होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प