शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

परभणी : जिंतूर तालुक्यात २४ बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:38 IST

जलसंधारण विभागांतर्गत ग्रामीण भागामध्ये २४ सिंचन बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली असून त्यावर ३२ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत. या बंधाऱ्यामुळे परिसरातील हजारो एकर शेत जमीन सिंचनाखाली येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर: जलसंधारण विभागांतर्गत ग्रामीण भागामध्ये २४ सिंचन बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली असून त्यावर ३२ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत. या बंधाऱ्यामुळे परिसरातील हजारो एकर शेत जमीन सिंचनाखाली येणार आहे.जिंतूर तालुक्यामध्ये मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे झाली. जांब, चारठाणा, भोसी आदी गावांमध्ये जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे या भागात पाणीपातळी वाढण्यासाठी मोठा फायदा झाला. यावर्षी जलसंधारण विभागाने जिंतूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बंधाºयाची कामे हाती घेतली आहेत.या संदर्भात जलसंधारण विभागाकडून इटोली येथे दोन बंधारे, साईनगर एक, मांडवावाडी १, रवळगाव १, पाचेगाव १ अशा ६ बंधाऱ्यांच्या कामांवर ७ कोटी ३२ लाख रुपये खर्च होणार आहेत. त्याच बरोबर वाईबोथी २, चिकलठाणा २, गिरगाव १, रवळगाव १ या ६ बंधाºयांसाठी ६ कोटी ९९ लाख रुपये मंजूर झाले आहेत.याशिवाय तालुक्यातील आडगाव येथे ४, असोला २ या सहा बंधाºयांच्या कामावर ६ कोटी ७५ लाख रुपये मंजूर आहेत. तालुक्यातील वाईबोथी, गिरगाव, रवळगाव, कवडगव्हाण या चार कामांसाठी ५ कोटी २५ लाख रुपये मंजुरी मिळाली आहे. याशिवाय आडगाव, पाचेगाव, साईनगर, मांडवावाडी येथे प्रत्येकी १ या प्रमाणे एकूण ४ कामांवर ५ कोटी १६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या सर्व कामांना मंजुरी देण्यात आली असून २४ बंधाºयावर ३२ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत. या कामाला निवडणुकीपूर्वीच मान्यता देण्यात आली असून संबंधित कामांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. जिंतूर तालुक्यातील दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.जलयुक्त शिवारमधील बंधारे चौकशीच्या फेºयात४जिंतूर तालुक्यामध्ये मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत अनेक बंधाºयांची कामे झाली होती. ही कामे करीत असताना बंधाºयांसाठी लागणारे साहित्य व दर्जा तपासण्यात आला नाही. त्यामुळे अनेक बंधाºयांची कामे बोगस झाल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांनी या तक्रारींच्या अनुषंगाने बंधाºयाची कोरबोर टेस्ट घेण्याचे ठरविले. यामध्ये मोहखेडा, वझर, सावंगी भांबळे, नागणगाव, साखरतळा, असोला वरुड नृसिंह, सुकळी वाडी, गणेशनगर, आडगाव बाजार, आंगलगाव, आंगलगाव तांडा येथील कामांची कोरबोर टेस्ट घेतल्यानंतर अनेक ठिकाणी बोगस कामे झाल्याचे टेस्टमध्ये आढळून आले.पाणीपातळी वाढणार४जिंतूर तालुक्यात नवीन होणाºया या बंधाºयांमुळे त्या त्या भागातील पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्याच बरोबर बंधारा परिसरातील हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. विशेष म्हणजे यातील अनेक बंधारे डोंगराळ भागात होणार आहेत. या भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने याचा फायदा जवळच्या गावांना होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प