शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

परभणी:  ७०४ ग्रा.पं.साठी २३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:45 IST

१४ व्या वित्त आयोगांतर्गत विकासकामे करण्यासाठी जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसाठी राज्य शासनाने २३ कोटी १४ लाख ७२ हजार रुपयांचा निधी दिला आहे. या संदर्भातील आदेश २२ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: १४ व्या वित्त आयोगांतर्गत विकासकामे करण्यासाठी जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसाठी राज्य शासनाने २३ कोटी १४ लाख ७२ हजार रुपयांचा निधी दिला आहे. या संदर्भातील आदेश २२ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आला आहे.१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरीता जनरल बेसिक ग्रॅन्टच्या दुसऱ्या हप्त्यापोटी १५०२ कोटी १८ लाख ५० हजार रुपयांचा निधी वित्त विभागाने १२ फेब्रुवारी २०१९ रोजी मुक्त केला होता. तत्पूर्वी शासनाने जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामपंचायतींकडील पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलाच्या थकबाकीच्या रक्कमेपैकी दंड व व्याज कमी करुन ५० टक्के रक्कम वित्त आयोगाच्या निधीमधून थेट महावितरण कंपनीस अदा करावी, असे आदेश ३१ मार्च २०१८ रोजी काढले होते. उर्वरित ५० टक्के रक्कम संबंधित जि.प., प्राधिकरण व ग्रामपंचायतींनी महावितरणकडे भरावी, असे निर्देशित करण्यात आले होते. त्यानुसार १४ व्या वित्त आयोगाकडून राज्य शासनाला मिळालेल्या निधीपैकी २५ टक्के रक्कम महावितरण कंपनीस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित ७५ टक्के म्हणजेच ११२६ कोटी ६३ लाख ८९ हजार रुपयांची रक्कम राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्याचा निर्णय २२ फेब्रुवारी रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्याला २३ कोटी १४ लाख ७२ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा निधी शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार म्हणजेच लोकसंख्या, क्षेत्रफळ या निकषाआधारे जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींना विकासकामे करण्यासाठी देण्यात येणार आहे. येत्या ५ ते ६ दिवसांत हा निधी जिल्हा परिषदेकडून सर्व ग्रामपंचायतींना इलेक्ट्रॉनिक्स क्लेरन्स सिस्टिम, एनईएफटी किंवा आरटीजीएस या आधुनिक बॅकिंग सिस्टिमच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. निधी वितरणास विलंब झाल्यास भारतीय रिझर्व बँकेच्या दराने ग्रामपंचायतींना व्याज देणे संबंधित जिल्हा परिषदेला बंधनकारक राहणार आहे. या निधीतून ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत विकास आराखड्यानुसार विकास कामे करावयाची असून या संदर्भातील सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी