शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

परभणी:  ७०४ ग्रा.पं.साठी २३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:45 IST

१४ व्या वित्त आयोगांतर्गत विकासकामे करण्यासाठी जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसाठी राज्य शासनाने २३ कोटी १४ लाख ७२ हजार रुपयांचा निधी दिला आहे. या संदर्भातील आदेश २२ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: १४ व्या वित्त आयोगांतर्गत विकासकामे करण्यासाठी जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसाठी राज्य शासनाने २३ कोटी १४ लाख ७२ हजार रुपयांचा निधी दिला आहे. या संदर्भातील आदेश २२ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आला आहे.१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरीता जनरल बेसिक ग्रॅन्टच्या दुसऱ्या हप्त्यापोटी १५०२ कोटी १८ लाख ५० हजार रुपयांचा निधी वित्त विभागाने १२ फेब्रुवारी २०१९ रोजी मुक्त केला होता. तत्पूर्वी शासनाने जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामपंचायतींकडील पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलाच्या थकबाकीच्या रक्कमेपैकी दंड व व्याज कमी करुन ५० टक्के रक्कम वित्त आयोगाच्या निधीमधून थेट महावितरण कंपनीस अदा करावी, असे आदेश ३१ मार्च २०१८ रोजी काढले होते. उर्वरित ५० टक्के रक्कम संबंधित जि.प., प्राधिकरण व ग्रामपंचायतींनी महावितरणकडे भरावी, असे निर्देशित करण्यात आले होते. त्यानुसार १४ व्या वित्त आयोगाकडून राज्य शासनाला मिळालेल्या निधीपैकी २५ टक्के रक्कम महावितरण कंपनीस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित ७५ टक्के म्हणजेच ११२६ कोटी ६३ लाख ८९ हजार रुपयांची रक्कम राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्याचा निर्णय २२ फेब्रुवारी रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्याला २३ कोटी १४ लाख ७२ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा निधी शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार म्हणजेच लोकसंख्या, क्षेत्रफळ या निकषाआधारे जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींना विकासकामे करण्यासाठी देण्यात येणार आहे. येत्या ५ ते ६ दिवसांत हा निधी जिल्हा परिषदेकडून सर्व ग्रामपंचायतींना इलेक्ट्रॉनिक्स क्लेरन्स सिस्टिम, एनईएफटी किंवा आरटीजीएस या आधुनिक बॅकिंग सिस्टिमच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. निधी वितरणास विलंब झाल्यास भारतीय रिझर्व बँकेच्या दराने ग्रामपंचायतींना व्याज देणे संबंधित जिल्हा परिषदेला बंधनकारक राहणार आहे. या निधीतून ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत विकास आराखड्यानुसार विकास कामे करावयाची असून या संदर्भातील सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी