शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

परभणी :२१ गावांत मनरेगावर छदामही खर्च नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:21 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर राज्य शासन भर देत असताना तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मनरेगांतर्गत एकही काम सुरू नाही़ विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षात या ग्रामपंचायत आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाही़ पर्यायाने गेल्या सहा महिन्यात मनरेगा योजनेवर या गाव क्षेत्रात छदामही खर्च झाला नसल्याची माहिती समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर राज्य शासन भर देत असताना तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मनरेगांतर्गत एकही काम सुरू नाही़ विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षात या ग्रामपंचायत आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाही़ पर्यायाने गेल्या सहा महिन्यात मनरेगा योजनेवर या गाव क्षेत्रात छदामही खर्च झाला नसल्याची माहिती समोर आली आहे़महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत केंद्र शासनाने विविध १९ प्रकारच्या कामांचा समावेश केला आहे़ त्याचबरोबर ११ कलमी कार्यक्रमही हाती घेतला आहे़ दरवर्षी १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत पुढील वर्षीच्या कामाचे आराखडे आणि लेबर बजेट तयार केले जाते़ वास्तविक पाहता केलेले नियोजन हे कागदावरच राहत असल्याचे चित्र मागील काही वर्षांपासून या योजनेतून दिसून येत आहे़ मनरेगा योजनेंतर्गत ५० टक्के कामे यंत्रणास्तर आणि ५० टक्के कामे जि़प़ अंतर्गत ग्रामपंपचायतस्तरावर केली जातात़ मागील काही वर्षांत ग्रामपंचायतस्तरावर बहुतांश कामे सिंचन विहिरींची घेतली जात आहेत़ ग्रामपंचायतीकडूनही त्याच कामांची मागणी होत आहे़यंत्रणास्तरावर शेत रस्ते, नाला सरळीकरण, वृक्ष लागवड, विहिर पुनर्भरण, शेततळी, तुती लागवड या कामांचा समावेश आहे़ यंत्रणास्तरावर सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रेशीम कार्यालय या विभागामार्फत कामे केली जातात; परंतु, मनरेगा योजनेच्या कामात सर्वच विभागातील यंत्रणा उदासिन असल्याचे दिसून येत आहे़त्यामुळे पाथरी तालुक्यातील २१ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे एकही काम सुरू नाही़ त्यामुळे गावात मजुरांना रोजगारही उपलब्ध होत नाही़ तसेच या योजनेवर या २१ गावांमध्ये अद्याप छदामही खर्च झाला नाही़ त्यावरून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे़वृक्ष लागवड : केवळ कागदावरचसामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला जातो़ जून महिन्यात या विभागाने २१ गावांमध्ये एकही काम हाती घेतले नाही़ त्यामुळे राज्य शाासनाचा महत्त्वकांक्षी १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम कागदावरच राहिला असल्याचे दिसून येत आहे़ तसेच पाथरी तालुक्यातील केवळ बोरगव्हाण या एका गावातच मनरेगा योजनेंतर्गत रेशीम शेतीसाठी तुती लागवड कार्यक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबविला जात आहे़सध्या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ सध्या शेतात कामे उपलब्ध नाहीत़ त्यामुळे मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे़ अशा परिस्थितीत प्रत्येक गावात मनरेगाची कामे सुरू होणे आवश्यक आहे़ही आहेत २१ गावेआनंदनगर, बंदरवाडा, बाणेगाव, डाकू पिंप्री, पिंप्री, ढालेगाव, गोपेगाव, जवळा झुटा, वाडी, कानसूर, खेडुळा, लिंबा, लोणी, मंजरथ, मरडसगाव, निवळी, पाटोदा, फुलारवाडी, रामपुरी खु़, सारोळा बु़ व तुरा या गावांमध्ये अद्याप महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एकही काम सुरू झालेले नाही़घरकुल कामासाठी मजूररमाई आवास आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी मनरेगा योजनेत १८ हजार रुपयांची मजुरी उपलब्ध करून दिली जाते़ सध्या तालुक्यात केवळ घरकूल बांधकामासाठीच ३३७ मजूर कामावर आहेत़ त्याशिवाय एकही काम सुरू नाही़ सिंचन विहिरींची कामेही अद्याप सुरू नाहीत़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी