शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

परभणी :२१ गावांत मनरेगावर छदामही खर्च नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:21 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर राज्य शासन भर देत असताना तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मनरेगांतर्गत एकही काम सुरू नाही़ विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षात या ग्रामपंचायत आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाही़ पर्यायाने गेल्या सहा महिन्यात मनरेगा योजनेवर या गाव क्षेत्रात छदामही खर्च झाला नसल्याची माहिती समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर राज्य शासन भर देत असताना तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मनरेगांतर्गत एकही काम सुरू नाही़ विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षात या ग्रामपंचायत आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाही़ पर्यायाने गेल्या सहा महिन्यात मनरेगा योजनेवर या गाव क्षेत्रात छदामही खर्च झाला नसल्याची माहिती समोर आली आहे़महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत केंद्र शासनाने विविध १९ प्रकारच्या कामांचा समावेश केला आहे़ त्याचबरोबर ११ कलमी कार्यक्रमही हाती घेतला आहे़ दरवर्षी १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत पुढील वर्षीच्या कामाचे आराखडे आणि लेबर बजेट तयार केले जाते़ वास्तविक पाहता केलेले नियोजन हे कागदावरच राहत असल्याचे चित्र मागील काही वर्षांपासून या योजनेतून दिसून येत आहे़ मनरेगा योजनेंतर्गत ५० टक्के कामे यंत्रणास्तर आणि ५० टक्के कामे जि़प़ अंतर्गत ग्रामपंपचायतस्तरावर केली जातात़ मागील काही वर्षांत ग्रामपंचायतस्तरावर बहुतांश कामे सिंचन विहिरींची घेतली जात आहेत़ ग्रामपंचायतीकडूनही त्याच कामांची मागणी होत आहे़यंत्रणास्तरावर शेत रस्ते, नाला सरळीकरण, वृक्ष लागवड, विहिर पुनर्भरण, शेततळी, तुती लागवड या कामांचा समावेश आहे़ यंत्रणास्तरावर सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रेशीम कार्यालय या विभागामार्फत कामे केली जातात; परंतु, मनरेगा योजनेच्या कामात सर्वच विभागातील यंत्रणा उदासिन असल्याचे दिसून येत आहे़त्यामुळे पाथरी तालुक्यातील २१ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे एकही काम सुरू नाही़ त्यामुळे गावात मजुरांना रोजगारही उपलब्ध होत नाही़ तसेच या योजनेवर या २१ गावांमध्ये अद्याप छदामही खर्च झाला नाही़ त्यावरून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे़वृक्ष लागवड : केवळ कागदावरचसामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला जातो़ जून महिन्यात या विभागाने २१ गावांमध्ये एकही काम हाती घेतले नाही़ त्यामुळे राज्य शाासनाचा महत्त्वकांक्षी १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम कागदावरच राहिला असल्याचे दिसून येत आहे़ तसेच पाथरी तालुक्यातील केवळ बोरगव्हाण या एका गावातच मनरेगा योजनेंतर्गत रेशीम शेतीसाठी तुती लागवड कार्यक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबविला जात आहे़सध्या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ सध्या शेतात कामे उपलब्ध नाहीत़ त्यामुळे मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे़ अशा परिस्थितीत प्रत्येक गावात मनरेगाची कामे सुरू होणे आवश्यक आहे़ही आहेत २१ गावेआनंदनगर, बंदरवाडा, बाणेगाव, डाकू पिंप्री, पिंप्री, ढालेगाव, गोपेगाव, जवळा झुटा, वाडी, कानसूर, खेडुळा, लिंबा, लोणी, मंजरथ, मरडसगाव, निवळी, पाटोदा, फुलारवाडी, रामपुरी खु़, सारोळा बु़ व तुरा या गावांमध्ये अद्याप महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एकही काम सुरू झालेले नाही़घरकुल कामासाठी मजूररमाई आवास आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी मनरेगा योजनेत १८ हजार रुपयांची मजुरी उपलब्ध करून दिली जाते़ सध्या तालुक्यात केवळ घरकूल बांधकामासाठीच ३३७ मजूर कामावर आहेत़ त्याशिवाय एकही काम सुरू नाही़ सिंचन विहिरींची कामेही अद्याप सुरू नाहीत़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी