शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

परभणी : नुकसान भरपाईसाठी हवेत ३१२ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:26 IST

अतिवृष्टीने बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५६ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची आवश्यकता असून, तशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे नोंदविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीने बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५६ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची आवश्यकता असून, तशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे नोंदविली आहे.आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबिन, कापूस या प्रमुख पिकांसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे काम हाती घेतले. तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार ४ लाख ५६ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती, बागायती आणि फळ पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. राज्य शासनाच्या दुष्काळ अनुदान वाटपाच्या निकषानुसार जिरायती पिकांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे अनुदान वितरित केले जाते. त्याचप्रमाणे बागायती पिकांना हेक्टरी १३ हजार ५०० आणि फळ पिकांना १८ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरी नुकसान दिले जाते. या निकषानुसार जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे अनुदानाची मागणी केली आहे.या मागणीनुसार जिल्ह्यातील जिरायती पिकांच्या नुकसानीपोटी ३०९ कोटी १९ लाख ४९ हजार रुपये, नुकसानग्रस्त बागायती पिकांसाठी २ कोटी ३२ लाख १३ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईपोटी ९१ लाख ८३ हजार रुपयांची आवश्यकता भासणार आहे.या तिन्ही गटातील पिकांसाठी ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची आवश्यकता असून, तशी मागणी जिल्हा प्रशासनाने नोंदविली आहे. परभणी तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांसाठी ५५ कोटी ६४ लाख ३९ हजार रुपये, सेलू तालुक्यासाठी ३५ कोटी १ लाख २५ हजार रुपये, जिंतूर तालुक्यासाठी ४९ कोटी ९७ लाख ४७ हजार रुपये, पाथरी- २९ कोटी २८ लाख ४ हजार रुपये, मानवत २५ कोटी ५० लाख ९९ हजार रुपये, सोनपेठ १८ कोटी ९६ लाख २२ हजार रुपये, गंगाखेड ३३ कोटी ९९ लाख ५१ हजार रुपये, पालम २८ कोटी ७१ लाख २६ हजार रुपये आणि पूर्णा तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांसाठी ३५ कोटी ३४ लाख ९६ हजार रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे.जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने करुन विभागीय आयुक्तांकडे निधीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारची स्थापना झाली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नोंदविलेली मागणी कधी पूर्ण होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र प्रत्यक्ष मदतीसाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवसांची प्रतिक्षाच करावी लागेल, असे दिसते.साडेचार लाख हेक्टरवरील : जिरायती पिके अतिवृष्टीमुळे झाली बाधित४यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार ३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. अतिवृष्टीमध्ये ४ लाख ५४ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.४त्याचप्रमाणे १७१९ हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिकांचे आणि ५१५ हेक्टर क्षेत्रावरील फळ पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे.४परभणी तालुक्यामध्ये ८० हजार ५५०, सेलू ५१ हजार २१३, जिंतूर ७३ हजार ३९१, पाथरी ४२ हजार ९६३, मानवत ३७ हजार ४३८, सोनपेठ २७ हजार ८७७, गंगाखेड ४९ हजार ९७५, पालम ४२ हजार १९० आणि पूर्णा तालुक्यामध्ये ५१ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे़४ही सर्व पिके राज्य शासनाच्या नुकसान भरपाईसाठी पात्र असल्याने राज्य शासनाने नुकसान भरपाईसाठी विभागीय आयुक्ताकडे निधीची मागणी केली आहे़जिरायती पिकांसाठी लागणारा अपेक्षित निधी४जिल्ह्यात जिरायती पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे़ त्यामुळे याच पिकांच्या नुकसान भरपाईसाठी सर्वाधिक निधी लागणार आहे़४जिल्हा प्रशासनाने जिरायती पिकांसाठी ३०९ कोटी १९ लाख ४९ हजार रुपयांची मागणी नोंदविली आहे़ त्यात परभणी तालुक्यात ५३ कोटी ८९ लाख ७५ हजार, सेलू तालुक्यात ३४ कोटी ७० लाख ९६ हजार, जिंतूर तालुक्यात ४९ कोटी ८५ लाख ८ हजार, पाथरी २९ कोटी १५ लाख २६ हजार, मानवत २५ कोटी ४२ लाख २६ हजार, सोनपेठ १८ कोटी ९५ लाख ३६ हजार, गंगाखेड ३३ कोटी ९७ लाख ८ हजार, पालम २८ कोटी ६७ लाख ३ हजार आणि पूर्णा तालुक्यासाठी ३४ कोटी ५६ लाख ७१ हजार रुपये केवळ जिरायती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी लागणार आहेत़४या पिकांना प्रती हेक्टरी ६ हजार ८०० रुपये या प्रमाणे नुकसान भरपाईची ही रक्कम जिल्हा प्रशासनाकडून नोंदविण्यात आली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरीfundsनिधी