शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

परभणी : बारा ग्रा.पं. इमारतीविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:50 IST

ग्रामपंचायती ह्या ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असतात; परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ग्रा.पं. महत्त्वाची संस्था असूनही तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे या ग्रा.पं.चा कारभार चक्क शाळेची इमारत, मंदिराच्या सभागृहातून चालतो.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : ग्रामपंचायती ह्या ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असतात; परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ग्रा.पं. महत्त्वाची संस्था असूनही तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे या ग्रा.पं.चा कारभार चक्क शाळेची इमारत, मंदिराच्या सभागृहातून चालतो.गावाचा कारभार हा ग्रामपंचायतीमधून पाहिला जातो. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर ग्रामस्थांकडून वसूल केले जातात. तसेच शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जातात. सद्यस्थितीत तालुक्यात ४२ ग्रामपंचायती आहेत; परंतु, ४२ पैकी १२ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार भाड्याच्या खोलीत किंवा पर्यायी जागेतून चालविला जातो. ग्रामस्थांना राज्य शासनाच्या विविध योजनांसह गावपातळीवरील सर्वच कामे गाव सचिवालय उभारून गावातूनच पाहिले जातात; परंतु, बारा ग्रामपंंचायतींना स्वत:ची इमारतच नसल्याने गावातील विकासाची कामे रेंगाळली आहेत.ग्रामपंचायतींचे : दस्तावेज असुरक्षित४गाव पातळीवरील ग्रामपंचायत हे शासकीय कार्यालय असते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच गाव, वाड्या, तांड्यावर पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. त्याचबरोबर गावातील विविध योजनेतील लाखो रुपयांची कामे ग्रामपंचायतीमार्फत राबविले जातात. या कामांची महत्त्वाची कागदपत्रे भाड्याच्या किंवा पर्यायी जागेत ठेवली जातात. त्यामुळे ही कागदपत्रे किती सुरक्षित राहत असतील? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.ग्रामसभा भरते ओट्यावरतालुक्यातील १२ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसल्याने वर्षभरात होणाऱ्या विविध ग्रामसभा, शाळा किंवा एखाद्या ओट्यावर घ्याव्या लागतात. त्यामुळे या ग्रामपंचायतींना इमारती बांधून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीgram panchayatग्राम पंचायतSchoolशाळा