शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

परभणी : ११ लाख क्विंटल कापसाची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:30 IST

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका कापसाच्या उत्पन्नाला झाला असून यावर्षीच्या हंगामात तीन तालुक्यांमधील बाजार समित्यांच्या अंतर्गत ११ लाख ६० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आवक घटली असली तरी यावर्षी हमीभावाच्या अधिक तुलनेने भाव मिळाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका कापसाच्या उत्पन्नाला झाला असून यावर्षीच्या हंगामात तीन तालुक्यांमधील बाजार समित्यांच्या अंतर्गत ११ लाख ६० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आवक घटली असली तरी यावर्षी हमीभावाच्या अधिक तुलनेने भाव मिळाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.२०१७-१८ च्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात कापसाचा सर्वाधिक पेरा झाला होता; परंतु, या हंगामात शेवटच्या टप्प्यामध्ये कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली. हातातोंडाशी आलेला कापूस फस्त झाल्याने उत्पादकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. ही परिस्थिती लक्षात घेऊन २०१८-१९ च्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनाकडे पाठ फिरविली. त्यामुळे या हंगामात कापसाच्या पेऱ्यापेक्षा अधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे. बोंडअळीचा प्रादूर्भाव पुन्हा उद्भावेल आणि नुकसान सहन करावे लागले, या भितीने अनेक शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पन्न घेतले नाही. मात्र ज्या शेतकºयांनी कापूस लागवड केली, त्या शेतकºयांना दुष्काळाचा फटका सहन करावा लागत आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने कापसाच्या उताºयात घट आली आहे. त्यातच या कापसाला चांगला भाव मिळावा, अशी शेतकºयांची अपेक्षा होती.यावर्षी निसर्गाने फटका दिला असला तरी कापसाचे भाव मात्र बºयापैकी वाढले आहेत. परभणी, मानवत आणि सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात कापसाला प्रति क्विंटल ५ हजार ४०० रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे कापसाची आवक संथ गतीने होत होती; परंतु, जाहीर लिलावात कापसाचे भाव वाढत गेले. परभणीसह उर्वरित दोन्ही तालुक्यांमध्ये कापसाचे भाव ६ हजार ३५५ रुपयापर्यंत पोहचले आहेत. खुल्या बाजारपेठेमध्ये हमीभावापेक्षा अधिक भाव मिळणारे कापूस हे एकमेव उत्पादन ठरले आहे. कापसाची आवक मार्च महिन्यापासून वाढली. कापसाला वाढीव भाव मिळाल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी झाले असले तरी हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.मानवत बाजाराकडे विक्रेत्यांचा ओढामानवत कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत जिनिंग प्रेसिंगवर कापूस खरेदी केला जात आहे. जाहीर लिलावात मिळालेला भाव दिला जात असून हा भाव हमीभावापेक्षा अधिक आणि जिल्ह्यातील इतर बाजार समितींच्या तुलनेत मानवतमध्ये अधिक भाव मिळत असल्याने जिल्हाभरातून कापूस उत्पादकांनी मानवतमध्ये कापूस विक्री करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे इतर बाजार समित्यांच्या तुलनेत मानवत बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढली आहे. परभणी बाजार समितीत ३ लाख ५० हजार क्विंटल कापसाची आवक झाली. सेलू बाजार समितीमध्ये ३ लाख ६० हजार क्विंटल कापूस विक्री झाला आहे. तर दुसरीकडे मानवत कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये १ एप्रिलपर्यंत ४ लाख ५० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. त्यामुळे मानवत बाजार समितीकडेच शेतकºयांचा कल असल्याचे दिसत आहे.हमीभावापेक्षा एक हजार अधिक दरजिल्ह्यात यावर्षीच्या हंगामात कापसाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहे. कापूस खरेदीला सुरुवात झाली तेव्हापासून हमीभावापेक्षा कमी दर मिळाला नाही. इतर शेतीमालाच्या बाबतीत मात्र खुल्या बाजारपेठेमध्ये हमीदरापेक्षा कमी दर मिळतो. कापसाला ५ हजार १५० रुपये प्रति क्विंटल असा हमीदर असून यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून ५ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर सध्या ६ हजार ३५५ एवढा सर्वाधिक भाव कापसाला मिळाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती