शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:36 IST

येलदरी प्रकल्पातील पाणी जलविद्युत केंद्रातून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने या केंद्रातील वीज निर्मिती करणारे संच सुरू झाले असून, दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे़ साधारणत: १० दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, या संपूर्ण काळात १०० मेगावॅट वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): येलदरी प्रकल्पातील पाणी जलविद्युत केंद्रातून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने या केंद्रातील वीज निर्मिती करणारे संच सुरू झाले असून, दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे़ साधारणत: १० दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, या संपूर्ण काळात १०० मेगावॅट वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे़जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पावर येलदरी धरण बांधण्यात आले आहे़ याच ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्रही कार्यरत आहे़ सध्या येलदरी धरणामध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ जिल्ह्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी येलदरी प्रकल्पातील पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्याची मागणी जोर धरत होती़ हे पाणी नदीपात्रात सोडल्याने २० ते २५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे़ शेतकºयांकडून होत असलेल्या मागणीची दखल घेऊन ३१ डिसेंबर रोजी दुपारी प्रकल्पातील पाणी जलविद्युत प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे़ राज्य विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता टी़एस़ चौधरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी़एम़ डांगे, एऩडी़ महाजन, जे़एस़ डांगे, एसक़े़ रामदास, एस़टी़ गांजवे, एस़डी़ गायकवाड, एस़बी़ शिराळे, मनोज बºहाटे, सुरक्षा अधिकारी पी़डी़ साबदे, तंत्रज्ञ एस़डी़ लांडगे, आऱई़ भंडारी, के़ डी़ माकोडे, शेख महेमूद, कलकुट्टी, डी़डी़ पत्की, व्ही़डी़ टाकरस, पी़पी़ वाकोडकर आदी कर्मचारी वीज निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत़या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याद्वारे दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे़ प्रकल्पामधून दररोज ५ दलघमी पाणी १० दिवसांपर्यंत सोडण्यात येणार असून, या माध्यमातून सुमारे १०० मेगावॅट विजेची निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे़५० वर्षांपूर्वी उभारलेला प्रकल्प४स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत येलदरी प्रकल्पावर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे़४या प्रकल्पास ५० वर्षे पूर्ण झाले असून, या ५० वर्षामध्ये हा प्रकल्प एकदाही बिघडला नाही किंवा बंद राहिला नाही़ हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये आहे़४या केंद्राला आयएसओ २००९-१० मानांकनही मिळाले आहे़ तत्कालीन आशिया कंपनीने या ठिकाणी वीजनिर्मिती संच बसविले असून, ते आजही पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत़४सध्या या प्रकल्पामध्ये ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, या पाण्यातून ३़५८ दशलक्ष युनिट वीज तयार होवू शकते, अशी माहिती केंद्रातील अधिकाºयांनी दिली़तीनपैकी दोन संच सुरू४येलदरी येथील वीज निर्मिती प्रकल्पामध्ये विजेची निर्मिती करणारे एकूण ३ संच आहेत़ सोमवारी वीज निर्मिती प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे दोन प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत़४एका प्रकल्पाची वीजनिर्मितीची क्षमता ७़५ मेगावॅट एवढी असून, तीनही संच पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यास २२़५ मेगावॅट विजेची निर्मिती होते़ पाण्याचा दाब कमी असल्याने १० मेगावॅट विजेची निर्मिती सध्या होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरण