शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:36 IST

येलदरी प्रकल्पातील पाणी जलविद्युत केंद्रातून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने या केंद्रातील वीज निर्मिती करणारे संच सुरू झाले असून, दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे़ साधारणत: १० दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, या संपूर्ण काळात १०० मेगावॅट वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): येलदरी प्रकल्पातील पाणी जलविद्युत केंद्रातून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने या केंद्रातील वीज निर्मिती करणारे संच सुरू झाले असून, दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे़ साधारणत: १० दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, या संपूर्ण काळात १०० मेगावॅट वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे़जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पावर येलदरी धरण बांधण्यात आले आहे़ याच ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्रही कार्यरत आहे़ सध्या येलदरी धरणामध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ जिल्ह्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी येलदरी प्रकल्पातील पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्याची मागणी जोर धरत होती़ हे पाणी नदीपात्रात सोडल्याने २० ते २५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे़ शेतकºयांकडून होत असलेल्या मागणीची दखल घेऊन ३१ डिसेंबर रोजी दुपारी प्रकल्पातील पाणी जलविद्युत प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे़ राज्य विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता टी़एस़ चौधरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी़एम़ डांगे, एऩडी़ महाजन, जे़एस़ डांगे, एसक़े़ रामदास, एस़टी़ गांजवे, एस़डी़ गायकवाड, एस़बी़ शिराळे, मनोज बºहाटे, सुरक्षा अधिकारी पी़डी़ साबदे, तंत्रज्ञ एस़डी़ लांडगे, आऱई़ भंडारी, के़ डी़ माकोडे, शेख महेमूद, कलकुट्टी, डी़डी़ पत्की, व्ही़डी़ टाकरस, पी़पी़ वाकोडकर आदी कर्मचारी वीज निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत़या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याद्वारे दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे़ प्रकल्पामधून दररोज ५ दलघमी पाणी १० दिवसांपर्यंत सोडण्यात येणार असून, या माध्यमातून सुमारे १०० मेगावॅट विजेची निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे़५० वर्षांपूर्वी उभारलेला प्रकल्प४स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत येलदरी प्रकल्पावर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे़४या प्रकल्पास ५० वर्षे पूर्ण झाले असून, या ५० वर्षामध्ये हा प्रकल्प एकदाही बिघडला नाही किंवा बंद राहिला नाही़ हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये आहे़४या केंद्राला आयएसओ २००९-१० मानांकनही मिळाले आहे़ तत्कालीन आशिया कंपनीने या ठिकाणी वीजनिर्मिती संच बसविले असून, ते आजही पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत़४सध्या या प्रकल्पामध्ये ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, या पाण्यातून ३़५८ दशलक्ष युनिट वीज तयार होवू शकते, अशी माहिती केंद्रातील अधिकाºयांनी दिली़तीनपैकी दोन संच सुरू४येलदरी येथील वीज निर्मिती प्रकल्पामध्ये विजेची निर्मिती करणारे एकूण ३ संच आहेत़ सोमवारी वीज निर्मिती प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे दोन प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत़४एका प्रकल्पाची वीजनिर्मितीची क्षमता ७़५ मेगावॅट एवढी असून, तीनही संच पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यास २२़५ मेगावॅट विजेची निर्मिती होते़ पाण्याचा दाब कमी असल्याने १० मेगावॅट विजेची निर्मिती सध्या होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरण