शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:36 IST

येलदरी प्रकल्पातील पाणी जलविद्युत केंद्रातून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने या केंद्रातील वीज निर्मिती करणारे संच सुरू झाले असून, दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे़ साधारणत: १० दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, या संपूर्ण काळात १०० मेगावॅट वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): येलदरी प्रकल्पातील पाणी जलविद्युत केंद्रातून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने या केंद्रातील वीज निर्मिती करणारे संच सुरू झाले असून, दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे़ साधारणत: १० दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, या संपूर्ण काळात १०० मेगावॅट वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे़जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पावर येलदरी धरण बांधण्यात आले आहे़ याच ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्रही कार्यरत आहे़ सध्या येलदरी धरणामध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ जिल्ह्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी येलदरी प्रकल्पातील पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्याची मागणी जोर धरत होती़ हे पाणी नदीपात्रात सोडल्याने २० ते २५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे़ शेतकºयांकडून होत असलेल्या मागणीची दखल घेऊन ३१ डिसेंबर रोजी दुपारी प्रकल्पातील पाणी जलविद्युत प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे़ राज्य विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता टी़एस़ चौधरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी़एम़ डांगे, एऩडी़ महाजन, जे़एस़ डांगे, एसक़े़ रामदास, एस़टी़ गांजवे, एस़डी़ गायकवाड, एस़बी़ शिराळे, मनोज बºहाटे, सुरक्षा अधिकारी पी़डी़ साबदे, तंत्रज्ञ एस़डी़ लांडगे, आऱई़ भंडारी, के़ डी़ माकोडे, शेख महेमूद, कलकुट्टी, डी़डी़ पत्की, व्ही़डी़ टाकरस, पी़पी़ वाकोडकर आदी कर्मचारी वीज निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत़या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याद्वारे दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे़ प्रकल्पामधून दररोज ५ दलघमी पाणी १० दिवसांपर्यंत सोडण्यात येणार असून, या माध्यमातून सुमारे १०० मेगावॅट विजेची निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे़५० वर्षांपूर्वी उभारलेला प्रकल्प४स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत येलदरी प्रकल्पावर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे़४या प्रकल्पास ५० वर्षे पूर्ण झाले असून, या ५० वर्षामध्ये हा प्रकल्प एकदाही बिघडला नाही किंवा बंद राहिला नाही़ हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये आहे़४या केंद्राला आयएसओ २००९-१० मानांकनही मिळाले आहे़ तत्कालीन आशिया कंपनीने या ठिकाणी वीजनिर्मिती संच बसविले असून, ते आजही पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत़४सध्या या प्रकल्पामध्ये ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, या पाण्यातून ३़५८ दशलक्ष युनिट वीज तयार होवू शकते, अशी माहिती केंद्रातील अधिकाºयांनी दिली़तीनपैकी दोन संच सुरू४येलदरी येथील वीज निर्मिती प्रकल्पामध्ये विजेची निर्मिती करणारे एकूण ३ संच आहेत़ सोमवारी वीज निर्मिती प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे दोन प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत़४एका प्रकल्पाची वीजनिर्मितीची क्षमता ७़५ मेगावॅट एवढी असून, तीनही संच पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यास २२़५ मेगावॅट विजेची निर्मिती होते़ पाण्याचा दाब कमी असल्याने १० मेगावॅट विजेची निर्मिती सध्या होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरण