शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परभणी : १ कोटी ७६ हजारांचे अनुदान झाले प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:44 IST

जिंतूर तालुक्यातील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना यासह आदी योजनांतील ८ हजार २५३ लाभार्थ्यांसाठी १ कोटी ७६ हजार २०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे़ या अनुदानाची रक्कम आठवडाभरात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे़

असगर देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा (परभणी) : जिंतूर तालुक्यातील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना यासह आदी योजनांतील ८ हजार २५३ लाभार्थ्यांसाठी १ कोटी ७६ हजार २०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे़ या अनुदानाची रक्कम आठवडाभरात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे़जिंतूर तालुक्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना आदी योजनेंतर्गत जवळपास साडेआठ हजार लाभार्थी आहेत़ या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून दरमहा ६०० रुपयांचे अनुदान देण्यात येते़ या अनुदानावर हे लाभार्थी महिनाभराची गुजराण करतात़मात्र या योजनेला गेल्या काही दिवसांपासून मरगळ आल्याचे दिसून येत आह़े़ या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून सहा-सहा महिने अनुदान उपलब्ध होत नाही़ झाले तर तहसील कार्यालयाकडून बँकेकडे वर्ग होण्यास विलंब होतो़तहसील कार्यालयातून बँकेकडे वर्ग झाल्यानंतर बँक प्रशासन लाभार्थ्यांच्या खात्यावर त्यांच्या अनुदानाची रक्कम वर्ग करण्यास टाळाटाळ करण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत़ या सर्व प्रकारात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, संजय गांधी, श्रावणबाळ आदी योजनांतील लाभार्थ्यांची फरफट होते़ परंतु, मागील काही दिवसांत जिंतूर तालुक्यातील ८ हजार २५३ लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने १ कोटी ७६ लाख २०० रुपयांचे अनुदान तहसील कार्यालयाकडे वर्ग केले आहे़ तहसील कार्यालयाकडून हे अनुदान बँकांकडे वर्ग होऊन हे अनुदान येत्या आठवडाभरात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे़ त्यामुळे तालुक्यातील या लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे़नवीन अनुदान पोस्टातनव्याने अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत़ परंतु, या लाभार्थ्यांचे अनुदान बँकेऐवजी पोस्ट कार्यालयात पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील प्रशासनाला आदेशही दिले आहेत़लाभार्थ्यांची गैरसोयपोस्टात जमा होणाºया अनुदानामुळे लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे़ कारण लाभार्थ्यांचे पोस्ट खाते नसल्यामुळे लाभार्थ्यांना चकरा माराव्या लागणार आहेत़ त्यामुळे पूर्वीप्रमाणेच बँकेतच अनुदानाची रक्कम जमा करावी, अशी मागणी लाभार्थ्यातून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी