शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पालम तालुक्यात बोंडअळीग्रस्त कापसाचे पंचनामे संथ गतीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 17:05 IST

पालम तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे करण्याचे काम दहा दिवसांपासून सुरू आहे़ परंतु, कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने हे काम संथगतीने सुरू आहे़ 

पालम (परभणी ) : तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे करण्याचे काम दहा दिवसांपासून सुरू आहे़ परंतु, कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने हे काम संथगतीने सुरू आहे़ 

पालम तालुक्यात यावर्षी १२ हजार ७९१ हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली़ सुरुवातीपासूनच या पिकामागे शुक्लकाष्ट लागले आहे़ त्यामुळे कापूस पिकाने यावर्षी धोका दिला़ सुरुवातीला पावसाने दगा दिला़ काही शेतकर्‍यांनी उपलब्ध पाण्यावर पीक जगविले़ तसेच परतीच्या पावसाने पिकाला दिलासा मिळाला होता़ परंतु, काही दिवसातच कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला़ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे़ अख्खे कापसाचे क्षेत्र बोंडअळीच्या आहारी गेल्याने शेतकर्‍यांनी हजारो रुपये खर्च करून जगविलेल्या कापूस पिकातून फारसे उत्पन्न निघाले नाही़ 

कापूस पिकाचे पंचनामे करावेत, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत़ परंतु, पालम तालुक्यामध्ये पंचनाम्याच्या प्रक्रियेला फारशी गती आलेली नाही़ दहा दिवसांपासून पंचनामे सुरू असले तरी कर्मचारी वर्गाची कमतरता अडथळा ठरत आहे़ ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक हे संयुक्तरित्या सर्वेक्षण करीत आहेत़ जीपीएस टॅगींग व प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका  गावाला १० ते १२ दिवसांचा कालावधी लागत आहे़ या तिन्ही कर्मचा-यांकडे तीन ते चार गावांचा पदभार असल्याने कसरत करावी लागत आहे़ आतापर्यंत केवळ ३ ते ४ हजार हेक्टरचा सर्वे झाला आहे़ या सर्वेक्षणाला आणखी महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे़ पथकातील कर्मचारी इतर कामे बंद ठेवून पंचनामे करीत असल्याने इतर कामांवर त्याचा परिणाम होत आहे़ 

१ लाख ९१ हजार क्षेत्र बाधितपरभणी जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी सर्वच्या सर्व क्षेत्र बोंडअळीने बाधित झाले आहे़ पालम तालुक्यात १२ हजार ७९१ हेक्टर क्षेत्रावर ५ हजार २२० शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली आहे़ आतापर्यंत ३ ते ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे झाले आहेत़ आणखी ८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे करण्याचे आव्हान या कर्मचार्‍यांसमोर  आहे़ 

टॅग्स :cottonकापूसparabhaniपरभणी