शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

पालम तालुक्यात बोंडअळीग्रस्त कापसाचे पंचनामे संथ गतीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 17:05 IST

पालम तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे करण्याचे काम दहा दिवसांपासून सुरू आहे़ परंतु, कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने हे काम संथगतीने सुरू आहे़ 

पालम (परभणी ) : तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे करण्याचे काम दहा दिवसांपासून सुरू आहे़ परंतु, कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने हे काम संथगतीने सुरू आहे़ 

पालम तालुक्यात यावर्षी १२ हजार ७९१ हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली़ सुरुवातीपासूनच या पिकामागे शुक्लकाष्ट लागले आहे़ त्यामुळे कापूस पिकाने यावर्षी धोका दिला़ सुरुवातीला पावसाने दगा दिला़ काही शेतकर्‍यांनी उपलब्ध पाण्यावर पीक जगविले़ तसेच परतीच्या पावसाने पिकाला दिलासा मिळाला होता़ परंतु, काही दिवसातच कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला़ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे़ अख्खे कापसाचे क्षेत्र बोंडअळीच्या आहारी गेल्याने शेतकर्‍यांनी हजारो रुपये खर्च करून जगविलेल्या कापूस पिकातून फारसे उत्पन्न निघाले नाही़ 

कापूस पिकाचे पंचनामे करावेत, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत़ परंतु, पालम तालुक्यामध्ये पंचनाम्याच्या प्रक्रियेला फारशी गती आलेली नाही़ दहा दिवसांपासून पंचनामे सुरू असले तरी कर्मचारी वर्गाची कमतरता अडथळा ठरत आहे़ ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक हे संयुक्तरित्या सर्वेक्षण करीत आहेत़ जीपीएस टॅगींग व प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका  गावाला १० ते १२ दिवसांचा कालावधी लागत आहे़ या तिन्ही कर्मचा-यांकडे तीन ते चार गावांचा पदभार असल्याने कसरत करावी लागत आहे़ आतापर्यंत केवळ ३ ते ४ हजार हेक्टरचा सर्वे झाला आहे़ या सर्वेक्षणाला आणखी महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे़ पथकातील कर्मचारी इतर कामे बंद ठेवून पंचनामे करीत असल्याने इतर कामांवर त्याचा परिणाम होत आहे़ 

१ लाख ९१ हजार क्षेत्र बाधितपरभणी जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी सर्वच्या सर्व क्षेत्र बोंडअळीने बाधित झाले आहे़ पालम तालुक्यात १२ हजार ७९१ हेक्टर क्षेत्रावर ५ हजार २२० शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली आहे़ आतापर्यंत ३ ते ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे झाले आहेत़ आणखी ८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे करण्याचे आव्हान या कर्मचार्‍यांसमोर  आहे़ 

टॅग्स :cottonकापूसparabhaniपरभणी